Thursday, August 31, 2023

N. P. 10 /11               ८ मार्च     

                                                    


नर्मदा पुरमहून प्रस्थान, नेहमी प्रमाणे ६ ला  प्रवास सुरू


आज ओंकारेश्वर ला जायचे आहे. वाटेत कोणा थोर 

पुरुषाच्या समाधी मंदिराचे दर्शन  आहे.

हा additional भाग "स्पेशल केस" म्हणून

आमच्यासाठी add केला आहे असे सांगितले गेले. 



श्री धुनीवाले बाबा , ज्यांच्या अनेक वेळा झालेल्या

मृत्यूचे गूढ आणि त्यांचे कार्य

याविषयी देसाई सिनियर यांनी माहिती दिली.

त्यांनी या बाबांवर एक पुस्तक लिहिले आहे. 

असे म्हटले जाते की श्री दादाजी होशंगाबाद मध्ये

दिगंबर रूपात रामलालदादाच्या नावाने राहत |

तिथे त्यांनी अनेक चमत्कार दाखवले |

तेथे ते तीन वर्षे राहिले आणि नंतर त्यांनी विहिरीत

आपला देह त्याग केला |

काही दिवसांनंतर पुन्हा सोहागपूरच्या इम्लिया जंगलात

ते दिगंबर रूपात

एका झाडाखाली धुनीभोवती रममाण होऊन बसलेले दिसले

|

गावकऱ्यांच्या आग्रहास्तव नर्मदा किनाऱ्यापासून

जवळपास १०-१२ किलोमीटर

दूर असलेल्या नर्सिंगपूरला रवाना झाले तेथेही त्यांनी आपले

अद्भुत चमत्कार दाखवले आणि काही काळानंतर

समाधी घेतली

ते पुन्हा सीसीरी संदुक ग्राम जिल्ह्यात रामफल नावाने

प्रकट झाले .

जवळपास १९०१ मध्ये ते लोकांचे दुःख दूर करण्यासाठी

आणि लोकांना पापातून मुक्त करण्यासाठी साईखेडा

येथे आले तिथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले

आणि अगणित चमत्कार दाखवले |

साई खेड्यात श्री दादाजी पहिल्यांदा दिसले तेव्हा ते

कोणाच्यातरी घराच्या

छतावर उभे असलेले दिसले | तेथून ते मातीचे तुटलेले कौल

खाली उभ्या असलेल्या मुलांना मारत असत |

त्यामुळे मुले गोंधळ करायची आणि म्हणायची,

“अरे पगला बाबा आ गया, पगला बाबा आ गया”

(पागल बाबा आला , पागल बाबा आला)

पण ज्या रोग्याला त्यांनी मारलेला कौल किंवा दगड

लागायचा तो रोगातुन मुक्त व्हायचा |

साईखेड्यातील मुले श्री दादाजींच्या

मागे पुढे फिरायचे आणि त्यांना पागल बाबा म्हणून त्रास द्यायचे |

मुलांना दूर पळवण्यासाठी श्री दादाजी हातात एक डंडा

(काठी) ठेवू लागले |

तेव्हापासून लोक त्यांना ‘डंडेवाले दादाजी’ म्हणू लागले |

ज्यांच्यावर त्यांचा हा डंडा

पडायचा त्यांचा उद्धार व्हायचा | ते दिवसभर जंगलात

किंवा शेतात फिरायचे आणि गाई चारायचे |

संध्याकाळी एका सुकलेल्या आंब्याच्या झाडाच्या

ढोलीत बसायचे | एकदा श्री दादाजीनीं त्या सुकलेल्या

झाडाच्या लाकडांची धुनी पेटवली आणि तेव्हापासून लोक

त्यांना ‘धुनीवाले दादाजी’ असे सुद्धा म्हणू लागले |

30 वर्षांपर्यंत श्री दादाजी साईखेडा

आणि त्याच्या आसपासच्याच्या परिसरात फिरायचे आणि

जेथे त्यांची इच्छा व्हायची

तेथे विश्राम करायचे | ते कधी नर्मदाकिनारी, कधी शेतात,

कधी झाडाखाली

तर कधी कोणाच्या घरात विश्रांती घ्यायचे |

श्री दादाजींनी कधी संसारिक साम्राज्य स्थापन केले नाही |

त्यांची गृहस्थी म्हणजे डंडा, चिमटा, जलपात्र आणि कांबळ

अशी अद्वितीय होती |

ज्यांना कुणाला श्री दादाजींकडून शिवी मिळायची

किंवा डंडा पडायचा त्याचे कल्याण व्हायचे |

याप्रमाणे त्यांची एवढी प्रसिद्धी झाली की एक दिवस

स्वतंत्रता सेनानी मदन मोहन मालवीय हे

पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी

यांना दादाजींकडे दर्शनासाठी घेवून आले |


प्रथम महात्मा गांधीजींनी नमस्कार केला |

पण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नमस्कार केले तेव्हा

श्री दादाजी जे सदैव रूद्र रूपात

असायचे त्यांनी नेहरूजींना डंडा मारून सांगितले की

“यह मोडा लायक है, याहै स्वराज दी है” |

(हा व्यक्ती लायक आहे | यांना स्वराज्य दिले)

आणि त्यांना आपला डंडा दिला |


सन १९७७ मध्ये इंदिरा गांधी

२४ अकबर रोड ए |आय |सी |सी हेडक्वार्टर मध्ये

राहत होत्या |

तेव्हा श्री श्री १००८ श्री छोटे सरकारजी त्यांना

दर्शन देण्यासाठी गेले |


आणि इंदोरचे श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी

दिलेला मोगऱ्याचा गजरा त्यांच्या हातात बांधून


इंदिराजींना सांगितले की

इंदोरच्या श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी निरोप दिला

आहे की,

“आप फिरसे प्रधानमंत्री बनोगी”

|(तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री बनाल)

त्यावेळेस श्री छोटे सरकारजींनी त्यांना आठवण करून दिली

की त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरूजींना साईखेड्यात

श्री बडे दादाजींनी डंडा मारून त्यांना तो डंडा दिला होता |

इंदिराजींनी ही गोष्ट मान्य केली

आणि श्री श्री 1008 श्री छोटे सरकारजींना आपल्यापूजाघरात नेऊन त्यांना तो डंडा दाखवला |

इंदिराजींनी सांगितले की,

“माझे वडील पंडित जवाहरलाल नेहरू त्या डंड्याला

आपल्या काखेत दाबून नेहमी

आपल्याजवळच ठेवायचे” | काही महिन्यानंतरच इंदिराजी

चिकमगलूर मधून काँग्रेसमधूनर्ण बहुमताने निवडून पुन्हा एकदा भारताच्या

प्रधानमंत्री बनल्या |)


देसाई (पप्पा) यांची  १५-१६ अशी विविध विषयांवरील

पुस्तके प्रसिद्ध असून त्यातून होणारे सर्व उत्पन्न ते

श्री शंकर महाराज प्रतिष्ठान या त्यांनी स्थापन केलेल्या

संस्थेला देतात. संस्था  शंकर महाराज यांच्या

कार्याचा प्रचार करते. 


 


धुनीवाले बाबा यांच्या मठात  बऱ्याच लोकांनी अखंड सुरु

असलेल्या धुनीत

पाणी नसलेल्या नारळाचे हवन केले.

तेथे मागितली मागणे पूर्ण होते असा  विश्वास किंवा

लोकांची श्रद्धा आहे.

याच संकुलाच्या भोजन गृहात आमच्या जेवणाचे

आयोजन केले गेले.

येथे रोजची बुफे सिस्टम नव्हती.

स्वतः रागिणी ताई आणि प्रभंजन वाढप करीत होते. 


वाटेत प्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार

यांचे स्मारक बसमधूनच पाहिले.

पुढे ओंकारेश्वर हॉटेल ला आलो. हे  हाटेल

जेथे आम्ही सुरवातीस राहिलो होतो,

गावापासून १५ कि,मी, दूर आहे, सर्व हॉटेल

दुसऱ्या दिवशी लग्न समारंभासाठी

बुक असल्याने त्यांनी आमची under construction

असलेल्या पर्यायी जागेत सोय केली.

काही गोष्टी सोडल्या तर हे हि हॊटेल ठीक होते. 



  N. P. 10 /12                                                                     पुढे 


 

 N. P. 11 / 11                 ९ मार्च २०२३                                                         


सकाळी उठून सर्व आवरून ८ च्या सुमारास ओंकारेश्वर कडे निघालो. 



नर्मदेवर जाऊन स्नान केले. नंतर सर्वांनी एकत्र बसून घाटावर यात्रा समाप्ती पूजन, आरती, नर्मदाष्टक वगरे सर्व कार्यक्रम झाले त्यानंतर ममलेश्वर दर्शन केले, गर्दी त्या मानाने खूप कमी होती . दर्शन शांततेत झाले. 


दर्शन घेऊन मग घाटावर आलो. झुलता बुल बंद असल्याने होडीने पैलतीरी ओंकारेश्वर दर्शनासाठी आलो. वाटेत नदी मध्यात घरी नेण्यासाठी आणि ओंकारेश्वर चढविण्यासाठी नर्मदाजल बाटल्यात भरून घेतले. 


ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती, दुपारी १२ २० ला मंदिर बंद होण्या अगोदर दर्शन व्हायला हवे होते. आमचे एक सह प्रवासी येथून वरॊदरा येथे जाण्यासाठी १ वाजे पर्यत निघायचे होते.  दर्शन क्षणभरच झाले. नर्मदा जल ओंकारेश्वर पिंडीवर चढविले. (अभिषेक केला, किंवा ,म्हणा ओतले. कारण तेथे प्रचंड गर्दीचा रेटा होता). प्रवासात सर्वत्र आणलेले आणि ठीक ठिकाणी भरून घेतलेले नर्मदा जल , श्री पटेल बोरिवली यांनी ओंकारेश्वरी चढवले आणि आणि सांगता झाली. 




नंतर बाहेर आलो. प्रसादाचे लाडू अनिकेतला  (अनिकेत सोनार, वय ३३ वर्षे , सर्वात तरुण सह-प्रवासी) आणायला सांगितले. तो सर्वांना यथाशक्ती मदत करीत असे. नंतर वर असलेल्या महाकालेश्वर मंदिरात अतिशय शांततेत रुद्र पाठ गुरुजींनी केला. आरती झाली आणि मग तेथून सर्व बाहेर पडलो. परत नर्मदा पात्र पार करून ममलेश्वरी आलो. वाटेत बाजारात नर्मदा गोटे, शिवलिंग आदी खरेदी केली. काही गोटे अगोदरच स्नान करताना नेमावर (नाभस्थान) येथे पात्रातून बुडी मारून काढले होते. येथून न्यायला आणि घरी भेट द्यायला प्रसाद आणि अशा गोष्टी उपलब्ध असतात. 








आटोपून लॉजवर आलो तेव्हा तीन वाजून गेले होते. नंतर साग्रसंगीत जेवण झाले. सायंकाळीं पाच वाजल्या नंतर तेथील गुरुजी कुमारिकांना घेऊन येणार होते. नर्मदा यात्रेत कुमारिका पूजनाचे विशेष महत्व आहे. ते आज सायंकाळी करायचे आहे. 


(नर्मदा हि कुमारिका आहे अशी मान्यता असल्याने या यात्रेत कुमारिका पूजेचे महत्व आहे. देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे. दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान-पान केले जाते. यांनाच कुमारिका असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या कन्येला कल्याणी, पाच वर्षांच्या कन्येला रोहिणी, सहा वर्षाच्या कन्येला कालिका, आठ वर्षांच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात.)


कुमारिकांना देण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी, खाऊ यांची २० -२५ पाकीटे  अगोदरच स्मिताने तयार करून दिली होती. वाटेत  अनेक लहान वयातील गरजू मुली भेटल्या तेव्हा त्याचे वाटप आणि १५/२० रुपये असे प्रत्येकीस वाटले होतेच. आज होणारे कुमारिका आणि सुवासिनीपूजन हे विधिवत होते.) 


सायंकाळी ६ नंतर शाळा सुटल्यानंतर गुरुजी पाच कुमारिका आणि एक सुवासिनी सह आमच्या निवास स्थानी आले. मग त्या सर्वांना एकत्र बसवून भगिनी यात्रिकांनी त्यांची पूजा, सन्मान करून भेट वस्तू आणि यथाशक्ती धन दान केले, सुहासिनींची ओटी भरून त्यांचाही सन्मान आणि दान केले. बंधू यात्रिकांनी देखील कुमारिका पूजन केले . सुवासिनी पूजनासाठी भगिनी यात्रिकांची मदत घेतली. 


या व्यतिरिक्त गुरुजींनी जे सेवा कार्य, पूजा आणि अन्य धार्मिक कार्य केले त्यासाठी सर्व यात्रिकांनी आपापली वर्गणी दिली (एकूण रु. (१०० +३००) प्रत्येकी). हि सर्व रकम एकत्रितपणे गुरुजींना दक्षिण म्हणून दिली. 

येथे सर्व यात्रा उपक्रम संपन्न होतो. 

सायंकाळी सर्व जण परिसरात आरामात ग्रुपमध्ये गप्पा मारत फिरत होते. काही भगिनी साधक विशेषतः कोल्हापूरच्या भगिनी माझ्या  कडे येऊन काही गोष्टी सांगा म्हणाल्या, त्यांना मनाचे श्लोक निर्माण झाले त्याची गोष्ट सांगितली. भक्ती म्हणजे, उपासना म्हणजे काय ? रोजच्या कर्माला साधनेचे स्वरूप समता हेतू ने कसे द्यायचे , देव भक्ती म्हणजे देव आदर्शचे  आचरण, समता हा निसर्ग नियम, विश्वाच्या संचलनात समता दिसते, पण याच विश्वाचा अत्यंत सूक्ष्म घटक असलेल्या माणसास विषमता प्रिय असते. आणि म्हणून विश्व नियमांचे पालन थोड्या तरी निस्वार्थ वर्तनाने कसे साधता येईल, आणि जीवन सुखी कसे करता येईल या बद्दल स्वामीजींनी सांगितलेल्या , मनशक्तीत समजलेल्या काही गोष्टी सांगितल्या. त्या त्यांना खूप भावल्याचे दिसले, अर्थात वेळेची मर्यदा असल्याने हा भाग ३० -४० मिनिटात संपवावा लागला. त्या अगोदर आमचे सहा-प्रवासी असलेले श्री आणि सौ हवासखान यांचा लग्न वाढदिवस केक कापून आणि सर्वानी शुभेच्छा देऊन साजरा झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रभू ट्रॅव्हल्स तर्फे आठवणीने करण्यात आले, हे विशेष आहे. 



ही  यात्रा सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी प्रभू ट्रॅव्हल्सच्या बस बरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा होता. उत्तम प्रवास, वेळेवर पोहोचणे, सुग्रास नाश्ता, जेवण,आणि सर्वांना योग्य तर्हेने सेवा पुरविणाऱ्या बरोबरच्या सात प्रभू ट्रॅव्हल्स स्टाफचा कौतुक, अभिनंदन आणि प्रोत्साहन सोहळा मग सर्व यात्रेकरुंना मिळून साजरा केला. प्रत्येकी रुपये ७०० वर्गणी जमा करून आलेली रक्कम पाकिटातून योग्य त्या कौतुक शब्दांसह त्यांच्या कडे देण्यासाठी एक छोटेखानी पण गोड समारंभ साजरा झाला. मग मंडळी आपापल्या निवास स्थानी विश्रांती साठी गेली. परिक्रमेचा १३ वा दिवस आणि यात्रेचा १४ व दिवस संपन्न झाला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला मुंबई कडे प्रवास सुरु झाला, एखाद तास ट्राफिक मध्ये अधिक गेला. 


Link   रोकडोबा मंदिर 


https://photos.google.com/photo/AF1QipPyePts203JjRn8AnFqjYsEIczwEuBXCU2-MIju



आर्वी येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात बस थांबली. 

वाटेत भोजनासाठी थांबलो तो राम हनुमान मंदिर देऊळ वाडा, तेथे चालू असलेली अखंड रामधून आणि परिसरात उन्हात निश्चल बसलेला हट योगी हे सर्व वैशिष्ठयपूर्ण होते. मंदिर परिसरातील झाडांच्या पारावर यात्रेतील हे शेवटचे भोजन. तो  स्वाद सर्वानी घेतला. 



रात्री सुमारे ११ वाजता ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल जवळ बस मधून उतरलो. नंतर उबेर कॅब करून पनवेल ला रात्री १२ च्या नंतर पोहोचलो. बरोबर पुण्याचे खवासखान जोडपे होते. त्यांना कारंजाडयात त्यांच्या मुलीकडे जावयाचे होते. मला घरी ड्रॉप करून ते पुढे करंजाडयास गेले. 


१५ दिवसाची नर्मदा परिक्रमा सफल संपन्न झाली. 


ओम नर्मदे हर ! मंगल मूर्ती मोरया. !!  हरी ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु !!!





विजय रा. जोशी.




    (समाप्त) 


Wednesday, August 23, 2023

 मनाचे श्लोक - समारोप पाठ. 



हे दोनशे मनाचे श्लोक ऐकले (आणि त्यातील शिकवण वर्तनात आणण्याचा प्रयत्न झाला) म्हणजे सारे दोष नष्ट होतात. औषध घेतले म्हणजे रोग जातो तसेच हे आहे. आपले मन नाना विषयांच्या विचारांनी व्यापलेले असते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, निर्दोष-सदोष अशा सर्व प्रकारच्या विकारांनी मनात गर्दी केलेली असते. काळे ढग जसे आकाश आच्छादित करून वातावरणात अंधार पसरवत असतात तसेच हे मनातले दोष आपल्या जीवनात अंधार आणतात. पण जेव्हा वारा त्या ढगांना उडवून लावतो आणि आकाश पुन्हा स्वच्छ, निरभ्र होते तसे हे मनाच्या श्लोकांचे श्रवण ते दोष उडवून लावतात आणि मनाला भक्तिमार्गावर घेऊन जातात.  पण ऐकणाऱ्याने ते नुसते ऐकणे पुरे असत नाही. 

‘अर्थांतर पाहिल्याविण l उगेचि करी जो श्रवण l तो श्रोता नव्हे पाषाण l मनुष्यवेषें ll 

(दासबोध, द८, स६, श्लो७). 

अर्थ समजून घ्यायचा तर लक्षपूर्वक, विश्वासून ऐकले पाहिजे. तेव्हा कोठे आपले दोष समजून येतील, आपण कुठे चुकत होतो ते समजेल आणि मग भक्तिमार्गाची साधना करता येईल. ही साधना केवळ बुध्दिमंत साधकच करू शकेल असे नाही, तर मतीमंद व्यक्तिदेखील करू शकेल असा परिणाम हे श्लोक साधतील. 

इथे मतीमंद म्हणजे आज आपण जो अर्थ घेतो तसा मंदबुध्दी, लवकर बोध न होणारा असा नाही घ्यायचा. तर ज्याच्याकडे बुध्दी आहे परंतु तिच्यावर अज्ञानाचे, दुराग्रहाचे – ज्याला इंग्रजीत ईगो म्हणतात –  जळमट साठलेले आहे, आत्मज्ञान करून घेण्याकडे प्रवृत्ती नाही असा. योग्य प्रकारे केलेले, श्रध्दापूर्वक, केलेले या मनाच्या श्लोकांचे श्रवण अशा माणसांच्या बुध्दीवर आलेला झाकोळ नाहीसे करते. आणि मग काय होते? तर अशा झाकोळरहित, जागृत, शुध्द बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश मिळतो, विकारांपासून सुटका होते, वैराग्याचे सामर्थ्य मिळते आणि मनुष्यजीवनातले अंतिम ध्येय असलेली मोक्षप्राप्ती होते. याची ग्वाही समर्थ या अंतिम श्लोकात देत आहेत.

फलश्रुतीचा श्लोक. तुमच्यावर काय परिणाम होईल ते सांगणारा श्लोक. 

श्रवण केलियाचे फळ, क्रिया पाळते तात्काळ -- दासबोध फलश्रुती. 

(वर्तन बदलेल, सुधारु लागेल. बाकी काही चमत्कार होणार नाही.)

उपासक (साधक) कसा असावा याबाबत मार्गदर्शन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 

"अवगुणांचा करूनि त्याग ! जेणे धरिला संतसंग !!१!! तयासी बोलिजे मग ! साधक ऐसा !!२ 

देहबुद्धी विवेके वारी ! आत्मबुद्धी सदृढ धरी !! श्रवण मनन केलेचि करी ! या नाव साधक !!"

स्वतःच्या अवगुणांची जाणीव, त्यांचा त्याग करण्याचा संकल्प, सद्गुरुंच्या सहाय्याने ते शक्य होते. 

बऱ्याचदा आपले दोष आपल्याला कळत नाही. आपण आपल्या वागण्याचे (चुकीच्या देखील) समर्थन करत असतो. अर्थात मनाचे श्लोक वाचताना, समजून घेताना आपण जे करू ते सर्व शुद्ध बुद्धीने, पूर्ण श्रद्धेने हवे. दासभक्ती भावाने व्हावे तर मुक्तीचा सोहळा आपण अनुभवू शकू. असा समर्थनाचा आपल्याला आशीर्वाद आहे. 

हरी ओम तत्सत ! 



विजय रा. जोशी. 



श्लोक २०१ - २०४ 




सारांश 

आत्मज्ञाना नंतर अंतरात होणारी क्रान्ति समर्थ या पुढील ५ श्लोकात सांगत आहेत. आपण खरे कसे आहोत त्या पासून (खऱ्या मी ) आपण आपल्यला काय खरे मानतो , समजतो (खोटा मी), यातील अंतर हेच ते द्वैत आहे. यावर उपाय एकांत आहे. एकाच अंत करणे आहे, आपल्यातील खोटा मी सम्पवणे आहे. हा एकांत मिळण्यासाठी उपाय “ध्यान” आहे

साधक परमात्म भेटीचे वर्णन केले आहे. दोघे एकरूप झाले, गंगा, यमुना एकरूप झाल्या, संगम झाला. द्वैत सरले, अद्वैत घडून आले.

सत्य ज्ञान प्राप्ती जरी जीवनात अवतरली तरी साधनेचे महत्व, प्रयत्नांचे महत्व कधीही समाप्त नाही. सत्संगती आणि सतशास्त्र श्रवण हे अखंड चालू राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यात कर्तव्य पालनासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी जो जीवन प्रवास आवश्यक आहे तो तर प्रत्येकाला करावाच लागेल, पण त्या व्यतिरिक्त अन्य संग मनाच्यानिश्चयाने सोडून द्यावेत. आणि अन्य सर्व काळ संत संगतीत, त्यांच्या विचारांच्या श्रवणात, वाचना, चर्चेत घालवावा.

साधना बीज सद्गुरू आपल्या अंतरात लावतो आणि  मग आपण आपल्या संकल्पाने, निष्ठेने, श्रद्धेने सातत्याने सर्व अडचणींवर मात करून जर ते बीज जोपासले, वाढवले तर या मानवी जीवनात सर्वांगीण प्रगती घडून आपला जन्म सर्वार्थाने सार्थकी लागतो. मृत्यू नंतर देखील सदगती मिळते. संत संगती साधकाला भव बंधनातून सोडविते आणि शरीरबुद्धी आत्मबुद्धीत पालटून अद्वैत साधनेकडे प्रगती घडते. 


विजय रा.  जोशी

Thursday, October 20, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 196 ते 200 :  ध्वनिफीत :





सारांश - श्लोक  : १९६ -२००. 

संपूर्ण आसमंतात वावरत असलेल्या अणुरेणूंमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर-तत्वाला श्रीसमर्थ राघव असे

 संबोधतात  आणि म्हणतात की या राघवाने व्यापल्यामुळे  आसमंतात रिकामी अशी जागाच उरलेली नाही.

राघवाचे रूप कसे आहे हे सांगताना समर्थाना आकाशाची आठवण होते. 

मन आभाळा एवढे विशाल केले, स्वतःशी मर्यादित आपले  भावना/विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले,

तर अर्थात आपण समर्थांच्या / रामाच्या जवळ जाऊ. आणि त्याच्या सानिध्याने आपल्या सर्व भव-चिंता, 

संसार-काळज्या नष्ट होतील. आपण भयातीत होऊ. आणि भयातून पूर्ण मुक्ती हाच मोक्ष असतो. 

परमात्मा आकाशा  सारखा आहे असे सांगतात,  नंतर ती उपमा अपुरी आहे असंही सांगतात. उपमा हि कधीच

 पूर्णत्वाने घेता येत नाही, फक्त समजून घेण्यास  त्या उपमा मदत करतात. 

नभाच्या मर्यादेत तो नाही. तो सर्वत्र ओतप्रोत आहे, म्ह्णून त्याला मर्यादित करता येत नाही. श्रीरामाचे रूप विस्तीर्ण,

अतिशय पुरातन असे आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. अतिशय गूढ असे हे ईश्वरतत्व आहे. 

पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचे ते अद्वितीय असलेले रूप सुलभपणे समजून येते. 

ज्ञान शब्दांनी आपण ऐकतो, नंतर अनुभवाने त्याची प्रचिती येते तेव्हा ते आकळते. 

मग साक्षी अवस्थाही आटून जाते. ध्यानात उन्मनी अवस्था येते त्यात दिवसाचे क्षण होतात. 

कृतार्थतेची अनुभूती येते .         श्रीराम !!


विजय रा.जोशी. 





  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 191 ते 195 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक :  १९१-१९५ . 

स्वत:च्या ऐहिक सुखातच गुंतून पडलेल्या जीवाला आध्यात्माचा, परमात्म्याचा  विचार करायला फुरसत  मिळत

नाही. म्हणून ब्रह्मज्ञान अगदी कल्पान्त झाला तरी आकलन होणे शक्य नाही. 

शरीर, मन आणि बुद्धी यापलीकडे न गेल्यास परमात्म्याचे स्वरूप कळणार नाही. 

देहबुद्धी निरास म्हणजे अध्यात्म/समाधी तयारी. 

जाणीव आणि नेणीव या मानवी स्थितीतल्या कल्पना आहे, त्या सर्वसाक्षी परमात्म्याला लागू नाहीत.

जन्म हा आपल्या जीवनाची सुरवात नाही आणि मृत्यू आपल्या जीवनाचा अंत नाही , एका अनंत प्रवाहाचा 

एक छोटा भाग म्हणजे आपले जीवन.

देव हा आकाशासारखा असतो.  आकाश म्हणजे काय? आकाशाची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो हे

जसे समजत नाही तसेच हा देवराणा कुठून येतो? कुठे जातो? हे ही कळत नाही.

देव म्हणजे काय ? देह सोडल्यावर जीव कोठे जातो ? मानवी मनाचे हे चिरंतन प्रश्न आहेत.

‘देहबुद्धी, मीपणा न ठेवता मनुजाने परमेश्वराच्या भक्तीत आपले आयुष्य व्यतीत करावे अन्यथा ब्रह्मज्ञान होणे नाही’ 

अशी जाग देण्याचे काम समर्थ या श्लोकात करत आहेत. 

या सर्व विषयांची सोप्या तर्हेने मांडणी असलेले विवेचन जरूर एक, आपला अभिप्रायही जरूर नोंदवा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 

 




Sunday, October 9, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 186 ते 190 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८६-१९०. 

परम वस्तूचा पत्ता, परमात्म्याचा  समर्थ आपल्याला सान्गताहेत. म्हणतात तो तुझ्या जवळच सानिध्यात आहे. 

त्याचा वियोग  सहन न होऊन तू त्याला तळमळीने जेव्हा हाक घालशील तेव्हा तो लगेच तुला भेटेल. 

या विश्वात प्रचंड सु-रचना, शिस्त , अनुशासन आहे. पंचमहाभूतांचे कार्य अतिशय सुसूत्रपणे हे सर्व विश्व निर्माण

करते. पण हे सर्व करणारी जी शक्ती आहे (निसर्ग / प्रकृती), ती त्या सर्वांच्या पलीकडे आहे. 

अस्तित्वहीन असा तो परमात्मा आहे. 

या विशाल विश्वात आपण माणसांनी आपली दृष्टी संकुचित ठेवली आहे. 

अन म्हणून आपल्याला हे सत्य न दिसेनासे झाले.

यावर उपाय म्हणजे , आपली धारणा, जी असत्यावर आधारित आहे ती बदलणे,  वृत्ती बदलणे हा आहे.

पंचमहाभूतांनी समृद्ध असलेल्या या सृष्टीत आपण आकंठ बुडालेले असतो. आणि त्यामुळे सहाजिकच दृश्य जग 

हेच सत्य असा आपला घट्ट समज असतो. पण ते खरे नाही. 

आसक्ती सोडा. जगाकडे पाठ फिरवून रुक्ष जीवन जगू नका,  पण त्यास सर्वस्वही मानू नका. 

समर्थ येथे सांगतात कि दृश्याचे ते बंधन ज्ञान शस्त्राने  तोडावे. 

ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |  पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान                        

आपली व्यवहारातील ज्ञान-संकल्पना अध्यात्मात उपयोगी नाही.

समर्थ म्हणतात , ज्याने मायेच्या योगाने ही सृष्टी रचना केली तोच देव आहे असे ओळखावे .त्याला पाहता आले तर

जीवाच्या मागे लागलेली संसारपीडा संपते व मोक्ष प्राप्त होतो . वाणीचे मूळ स्थान जी परावाणी ती सुध्दा त्याचे वर्णन

करू शकत नाही. परावाणी च्या तो पलीकडे आहे. तो वाचातीत आहे. 

भ्रम ,माया या देवाला स्पर्श करू शकत नाही. 

निर्गुणाला कल्पित जावे असे समर्थ सांगतात. निर्विकल्प असे स्वरूप आपल्यात भरून आहे . 

अशी कल्पना करून आपला अहंभाव सोडायला समर्थ सांगतात.   अध्यात्मातील या सर्व संकल्पना खूप गहन

 आहेत पण समर्थ त्या कशा सोप्या करून सांगत आहेत ते आपल्यास या ध्वनिफितीत कळेल.    ... श्रीराम !


विजय रा. जोशी.