Friday, January 29, 2021


 गीता अध्याय  8 भाग  2: ध्वनी फीत 

   

या भागात जे विषय पहायचे आहेत ते असे आहेत : 

शेवटचा दिवस गोड कसा होईल. 

बहुत सुकृताची जोडी, म्हणुनी विठ्ठलीं आवडी. 

संस्कार कसे ठसतात. 

शुभ संस्काराचा संचय. 

ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंड पेशीत भरतात. 

आपली नियती आपणच बनवत असतो 

मरणाचे स्मरण असावे. 

सत्कृत्य संकल्प कसोशीने पालन. 

चांगली कामे करताना संघर्ष/संकटे (रात्रंदिन आम्हा युध्हाचा प्रसंग). 


अखंड साधनेने परिवर्तन 

ज्याचे जया ध्यान I तेचि होय त्याचे मन II १ II 

म्हणउनी अवघें सारा I पांडुरंग दृढ धरा II २ II संत श्रेष्ठ तुकाराम. 

माणसाला ज्या वस्तूचे ध्यान लागते त्या वस्तूचे रूप त्याच्या मनाला येते. म्हणून सर्व काही बाजूला सारावे 

आणि मनाने घट्टपणे ईश्वराचे ध्यान करावे. 

गतीचे गीत = जीवन.

ज = जग.                ग = गमन.

जन्म आणि गमन यांच्या मध्ये आहे ते जीवन. जन्मक्षणी गती सुरु होते. गमन-क्षणी गती थांबते.

या दोन क्षणा मधील गतीचे गीत म्हणजे जीवन.

जीवनात जी गती अपरिहार्य आहे ती सद-हेतू साठी व्हावी जीवन सफल होईल. गमन-क्षण गोड होईल.

सतत हेतू शुद्ध ठेऊन आपण वागलो तर आपल्याला भक्तीचा नेमका अर्थ कळेल.

 उत्तम मरण काळ.

अग्नी पेटलेला आहे –  अंतकाळ पर्येंत कर्म सुरु आहे.

सूर्य प्रकाशात आहे. – बुद्धीची प्रभा शेवट पर्येंत झगझगीत आहे. 

चंद्रकला वाढत आहे (शुक्ल पक्ष) –  मरणकाळी पवित्र भावना विकास होत आहे. 

आकाश (निरभ्र, सुंदर, उत्तरायणात असते.) – हृदय आकाशात आसक्तीचे ढग जरादेखील नाहीत. 

शेवटच्या श्वासा पर्येंत सेवाकर्म होत आहे,  सद्भावनेची पौर्णिमा प्रकाशात आहे, 

हृद्य-आकाशात यत्किंचितही आसक्ती नाही,  बुद्धी सतेज आहे. 

अशा प्रकारे जर देहांतर होईल तो परमात्म्यात विलीन होतो. 

सविस्तर वर्णन ध्वनिफितीत ऎका . 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  8 भाग  2: ध्वनी फीत 







Friday, January 22, 2021

 

गीता अध्याय  8 भाग  1: ध्वनी चित्रफी


८ व्या अध्यायांतले अर्जुनाचे सात प्रश्न. 

१. ब्रह्म म्हणजे काय ?

२. अध्यात्म म्हणजे काय ?

३. कर्म म्हणजे काय ?

४. अधि-भूत म्हणजे काय ?

५. अधि-दैव कशाला म्हणतात ?

६. शरीरात अधि–यज्ञ कोणता ?

७. चित्ताला वश केलेले मरणकाली तुम्हाला कसे जाणतात ?

सर्वात महत्वाचा प्रश्न : मुख्य प्रश्न,ज्याचे भगवंतांनी विस्ताराने उत्तर दिले तो असा: चित्ताला वश केले मरणकाळी 

तुम्हाला कसे जाणतात ?



अंतकाळी हि माझेचि चित्ती स्मरण राखुनी,

देह सोडोनी गेला तो, मिळे मज न संशय.                   ८/५. 

म्हणून सगळा काळ , मज आठव झुंज तूं 

मन बुद्धी समर्पूनि , मज निःशंक पावसी                     ८/७

अंतकाळी जो माझेच स्मरण करीत शरीर सोडतो तो माझ्या (ईश्वर) भावाला प्राप्त होतो यांत संदेह नाही.

ज्याचे आपण अखंड चिंतन करतो तो विषय सतत मनासमोर येतो.  त्या विषय आकाराचे आपले मन होते. म्हणून ज्याचे सतत चिंतन कराल ते मनासमोर येईल. म्हणून भगवंत सांगतात “तू माझे अखंड चिंतन कर”. भगवंताचे अखंड चिंतन म्हणजे भगवंत गुण आदर्शांचे आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न.).

काय करावे ?

जीवनाचे शेवटील टोक मरणाकडे गेलेले आहे हे लक्षात घेऊन तो शेवटचा क्षण अत्यंत पावन, पुण्यमय, गोड कसा होईल याचा अभ्यास आयुष्यभर केला पाहिजे.उत्कृष्ठांतील उत्कृष्ठ संस्कार मनावर कसे रहातील याचा विचार ज्ञान झाल्या क्षणा पासून सुरु झाला पाहिजे. आत्म-परीक्षण रोज करीत गेले पाहिजे. इंद्रिये, मन, चित्त काय करते याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.ज्या क्षणी आपले चुकते आहे असे समजले त्या क्षणापासून सुधारायला सुरुवात केली पाहिजे. तसे न केले तर वाईटाचा अभ्यास पुन्हा सुरु होईल.

साधना सातत्य राखण्याचे महत्व आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न याची माहिती आपण या अध्यायात बघणार आहोत. 


विजय रा  जोशी.


 गीता अध्याय  8 भाग  1: ध्वनी चित्रफी












Friday, January 15, 2021

 गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


ज्ञान विज्ञान योग.  

गीता उपदेश जगन्मान्य असून त्याचा सर्वत्र उपयोग जाणकार, जिज्ञासू करीत आहेत. गीतेतील अध्यात्मिक तत्वे , संकल्पना, परिभाषा जी अगोदर समजायला अवघड आहे ती विविध माहितीच्या आधारे समजवायचा हा एक प्रयत्नआहे. 

समजणे एकवेळ सोपे पण उमजणे, प्रत्यक्ष वर्तनात आणणे  अतिशयअवघड याच अनुभव मी रोज घेतो आहे. श्रोते गोड  मानून घेत आहेत म्हणून प्रत्येक वेळी अधिक उत्साहाने , जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करायला प्रेरणा आहे. 



पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे. प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो. 

श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार. 

श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो. 

सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वात एकच अविनाशी पदार्थ भरून राहिला आहे हे समजणे  याचे नाव “ज्ञान”. एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. यासच क्षराक्षर विचार असे म्हणतात, (१३/३०) 

प्रपंचाला विज्ञान म्हणतात. 

तो सत्य समजणे हे अज्ञान. 

जाणिवेचा जिथे शिरकावच होत नाही ते ज्ञान. (आत्मज्ञान).

भक्ती (गीता रहस्य). श्लोक (वीस ते तीस) अन्वयार्थ

उपासना सर्वांना पाहिजेच. मग ती व्यक्ताची करा, अगर अव्यक्ताची करा. पण या दोहोत व्यक्ताची उपासना सुलभ असल्याने तिचेच येथे वर्णन आहे. व तिलाच भक्ती असे नाव आहे. तथापि स्वार्थ-बुद्धी मनात ठेऊन काही विशिष्ठ हेतूसाठी परमेश्वराची भक्ती करणे ही भक्तीची पायरी कनिष्ठ असून, परमेश्वराचे ज्ञान व्हावे अशा हेतूने भक्ती करणारे (जिज्ञासू) देखील कच्चेच म्हंटले पाहिजेत, कारण त्यांचे ज्ञान परिपूर्ण नसते. . तथापि हे सर्व भक्ती करणारे असल्यामुळे सर्वच चांगल्या मार्गाने जाणारे असे म्हंटले आहे (श्लोक १८). पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे ज्ञानप्राप्तीने कृतार्थ होऊन या जगात ज्यांना करावयाचे किंवा मिळवायचे शिल्लक उरले नाही ते ज्ञानी पुरुष निष्काम बुद्धीने जी भक्ती करतात ती सर्वात श्रेष्ठ होय. त्यामुळे “भक्तियोग म्हणजे परमेश्वराची निर्हेतुक व निरंतर भक्ती” असे भागवतात भक्तीचे लक्षण केले आहे. आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या त्या स्वर्गादिक फळांच्या कामवासनांनी वेडावलेले लोक तो तो उपासनेचा नियम पाळून दुसऱ्या निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात (७/२०) 

भक्तीसाठी संपूर्ण, विनाशर्त समर्पण हवे.

माझे जन्म-जन्माचे सर्वस्व मी आणीन ओतले तरी देवाचे देण पूर्ण होणार नाही हा आंतरिक भाव हवा. असा भाव असेल तर देव पूर्ण प्रसन्न होईल. देव भक्ताची सेवा हि करेल. भक्तीसारखी सोपी पण तेवढीच अवघड गोष्ट नाही.

ज्ञाता व ज्ञेय, परा व अपरा प्रकृती याच्या पलीकडे असलेले व सर्व सामावलेले असे एक स्वतंत्र तत्व आहे  त्याला “सत्य” म्हणतात. त्यालाच परब्रह्म म्हणतात.या ब्रह्माला पहाण्याची इछ्या बाळगणे, त्याचे अनुसंधान ठेवणे, व ते ठेवतानाच इछ्या, द्वेष रहित होऊन ब्रह्माचे ध्यान करणे ही ७ व्या अध्यायातील प्रमुख गोष्ट आहे. ज्ञानी भक्त जन्म-जन्माच्या साधनेतून ते साध्य करतो.

पूर्ण माहितीसाठी  ध्वनिफित . 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


Friday, January 8, 2021

गीता अध्याय  ७, भाग  १: ध्वनी फीत


ज्ञान विज्ञान योग.  

अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे. गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.

या अध्यायातील पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे.  प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु  दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो. 



श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार. 

श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा  क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो. 

माणसाला भेद का दिसतो? मोह का वाटतो

सर्व गोष्टींच्या मुळाशी एकाच चैतन्य असून माणसास भेद का दिसतो? मोह का वाटतो? प्रेमी माणसाचा चेहरा गोड वाटतो, दुसऱ्याचा कंटाळवाणा वाटतो. एकाला भेटावे, दुसऱ्याला टाळावे असे का वाटते? हा माझा, हा परका असे जे विचार येतात व ज्यामुळे प्रसंगी माणूस कर्तव्य ही टाळू पाहतो, त्याला कारण मोह आहे. 

वरवर पाहण्याची वृत्ती सोडून मुळात जाऊन पहिले पाहिजे. सृष्टी निर्मात्याच्या करांगुलीची करामत समजून घेतली पाहिजे. बृहदारण्यक उपनिषदात नगाऱ्याचा दृष्टांत दिला आहे. एकाच नगाऱ्यातून नाना नाद निघतात. काहींना मी भितो तर काहींवर नाचतो . हे सर्व भाव जिंकून घायचे असेल तर नगारा वाजविणाऱ्याला पकडले पाहिजे. त्याला पकडले कि सर्व आवाज आणि नाद माहीत होतात. 

भगवान एकाच वाक्यात सांगतात

जो मायेतून तरुन जाऊ इच्छित असेल; त्याने मला शरण यावे. भगवंताशी भक्ताची एकाग्रता कशी होऊ शकेल ती होणे कसे उपयुक्त आहे  याचे वर्णन या अध्यायात, पहिल्या भागात असून  उर्वरित तपशील आपण  भाग २ मध्ये  ऐकणार आहोत.

हरी ओम !


विजय रा. जोशी.


गीता अध्याय  ७, भाग  १: ध्वनी फीत


Friday, January 1, 2021

 गीता अध्याय  ६, भाग  २: ध्वनी फीत



ध्यानयोग, आत्मसंयम योग, चित्तवृत्ती निरोध. (संयमाने मन वळवा). 


ध्याय ६, मुख्य विषय 


कर्मयोगी होण्यासाठी काय प्रयत्न करावे, योगी हा समतेची मूर्ती असतो. (श्लोक १ - ९)

ध्यान साधना , योग साधना कशी करावी (१० - १९)

योगी वृत्तीची, वर्तनाची आवश्यकता व लाभ (२० - ३२) 

अर्जुनाचे प्रश्न (३३, ३४, ३७, ३८, ३९). 

भगवंताचा खुलासा आणि आश्वासन. (३५,३६, ४०,४१,४२). 

यातील काही भाग आपण अगोदरच्या ध्वनिफिती मध्ये  ऐकला. या पुढील भागांपैकी काही  गोष्टी  देत आहे. 

बाकी सर्व तपशील ऑडिओ मध्ये ऐकावा. 



ध्यान – समाधीची शांती.

सामान्यतः असे दिसते की जसजसा वेग वाढतो तसतशी शक्ती वाढते. परंतु चित्ताची  स्थिती उलटी आहे. चित्त जेवढे वेग-रहित होत जाते तेवढे जास्त शक्तिशाली बनते.  ध्यान – समाधी साधने मुळे अशी स्थिती प्राप्त होऊ शकते. पातंजली योग सूत्राच्या अष्टांग योग साधने नुसार साधना करून हि स्थिती प्राप्त  करता येते.

ध्यान-योग साधेल का ?

विचार-शून्य स्थितीत स्थिर होणे साधेल का ? !

ही साधना अत्यंत कठीण आहे. परंतु असंभव नाही. 

मनाचा संयम करणे हि अत्यंत कठीण गोष्ट आहे. - स्वामी विवेकानंद 

 
आधीच माकड 
यथेच्च दारू पाजली 
त्याला विंचू चावला 
त्याला भूतबाधा झाली 

मानवी मनाची स्थिती अशा त्या माकडासारखी आहे. 

भगवान: अवश्य मन दुःसाध्य, म्हणतोस तसेची ते,
             परि अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे.         (६/३५)
             संयमाविण हा योग, न साधे मानितो चि मी,
             परि संयमवंतांस उपाये साध्य होतसे.               (६/३६)

भगवान म्हणतात : चंचल मनाला संयमित करणे निःसंशय अत्यंत कठीण आहे. पण योग्य 
अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारा मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्छ्रुंकल आहे त्याला 
हा योग साधणे  जरी कठीण असले तरी जो संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न 
करेल त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे मला वाटते.

जमत नाही म्हणून सोडू नका. 

कैवल्य हा मानव योनीचा जन्मसिध्द हक्क आहे. (पतंजली सूत्र).   



विजय रा. जोशी