Friday, January 22, 2021

 

गीता अध्याय  8 भाग  1: ध्वनी चित्रफी


८ व्या अध्यायांतले अर्जुनाचे सात प्रश्न. 

१. ब्रह्म म्हणजे काय ?

२. अध्यात्म म्हणजे काय ?

३. कर्म म्हणजे काय ?

४. अधि-भूत म्हणजे काय ?

५. अधि-दैव कशाला म्हणतात ?

६. शरीरात अधि–यज्ञ कोणता ?

७. चित्ताला वश केलेले मरणकाली तुम्हाला कसे जाणतात ?

सर्वात महत्वाचा प्रश्न : मुख्य प्रश्न,ज्याचे भगवंतांनी विस्ताराने उत्तर दिले तो असा: चित्ताला वश केले मरणकाळी 

तुम्हाला कसे जाणतात ?



अंतकाळी हि माझेचि चित्ती स्मरण राखुनी,

देह सोडोनी गेला तो, मिळे मज न संशय.                   ८/५. 

म्हणून सगळा काळ , मज आठव झुंज तूं 

मन बुद्धी समर्पूनि , मज निःशंक पावसी                     ८/७

अंतकाळी जो माझेच स्मरण करीत शरीर सोडतो तो माझ्या (ईश्वर) भावाला प्राप्त होतो यांत संदेह नाही.

ज्याचे आपण अखंड चिंतन करतो तो विषय सतत मनासमोर येतो.  त्या विषय आकाराचे आपले मन होते. म्हणून ज्याचे सतत चिंतन कराल ते मनासमोर येईल. म्हणून भगवंत सांगतात “तू माझे अखंड चिंतन कर”. भगवंताचे अखंड चिंतन म्हणजे भगवंत गुण आदर्शांचे आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न.).

काय करावे ?

जीवनाचे शेवटील टोक मरणाकडे गेलेले आहे हे लक्षात घेऊन तो शेवटचा क्षण अत्यंत पावन, पुण्यमय, गोड कसा होईल याचा अभ्यास आयुष्यभर केला पाहिजे.उत्कृष्ठांतील उत्कृष्ठ संस्कार मनावर कसे रहातील याचा विचार ज्ञान झाल्या क्षणा पासून सुरु झाला पाहिजे. आत्म-परीक्षण रोज करीत गेले पाहिजे. इंद्रिये, मन, चित्त काय करते याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.ज्या क्षणी आपले चुकते आहे असे समजले त्या क्षणापासून सुधारायला सुरुवात केली पाहिजे. तसे न केले तर वाईटाचा अभ्यास पुन्हा सुरु होईल.

साधना सातत्य राखण्याचे महत्व आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न याची माहिती आपण या अध्यायात बघणार आहोत. 


विजय रा  जोशी.


 गीता अध्याय  8 भाग  1: ध्वनी चित्रफी












No comments:

Post a Comment