Thursday, September 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 21 ते 25: ध्वनिफीत 




सारांश - श्लोक २१ ते २५. 

(जीवन कसे जगावे : शुद्ध भक्ति-युक्त कर्म करण्याचा प्रयास अखंड करावा) 

आपल्या स्वतःच्या वासना समजून घ्याव्या, त्या शुद्ध हेतूच्या कराव्या आणि मग वासना कमी

करण्याचा अभ्यास करावा. भगवंताची भक्ती पूर्ण श्रद्धेने करावी. भक्तीसाठी हनुमंतासारखा आदर्श

घ्यावा. 

वासना मुक्ती आणि दृढभक्ती या साधनेने अंतकाळ अनुकूल होईल. 

अहंकार आपल्याला बंधनात अडकवतो म्हणून नामस्मरण व शुद्धभक्ति-युक्त कर्म करण्याचा प्रयास

अखंड करावा. 

यावरील सविस्तर विवेचन अत्यंत सोप्या भाषेत आणि गोष्टी, उदाहरणांसह ध्वनिफितीत उपलब्ध आहे. 

जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा. 


विजय जोशी. 




Thursday, September 23, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 16 ते 20: ध्वनिफीत 




सारांश श्लोक १६ ते २०. 

जीवनात येणारे विविध ताप कसे टाळता येतील.  


जीवनात आसक्ती असते ती शेवट पर्येंत जात नाही , 

म्हणून  माणूस जन्म -मरणाच्या चक्रात फिरत राहतो. 

जीवनात प्रारब्धानुसार मिलन, वियोग येत राहातात.त्याबद्दल फार खेद  करू नये.  

अंतिम सत्य-स्वरूप भगवंताची  भक्ती करण्या शिवाय जीवनात अन्य योग्य असा मार्ग नाही. 

या मार्गाने पुनर्जन्म आणि त्याबरोबर येणारे विविध ताप टाळता येतील. 

हे कसे साधायचे त्याचे दिशादर्शन हे पाच श्लोक करत आहेत. 

सविस्तर माहिती ध्वनिफितीत उपलब्ध आहे. कृपया ऐकावी. आवडल्यास शेअर करावी. 


विजय रा. जोशी. 









Wednesday, September 15, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 11 ते 15  : ध्वनिफीत 



श्लोक ११ – १५  : सारांश 

सर्वकाळ सुखी कोणी नाही. पूर्व संचिता प्रमाणे भोग येतात. 

देहबुद्धी कमी करत रहाणे हा मुक्तीचा मार्ग आहे. 

दुष्ट वासना असतील तर कितीही शूर, पराक्रमी व्यक्तींचाही नाश होतो. आणि 

त्यातून जीवन व्यर्थ जाते . 

जन्म होतो, जगात माणूस येतो. जीवनभर पूर्वकर्मानुसार सुख-दुःखे येतात, जातात. 

आणि केव्हातरी हे जग सोडावे लागते. 

हे जग मृत्युभूमी आहे. पण जगणारा माणूस “मृत्यू येणार” हे सत्य विसरतो. 

लक्षात घेत नाही. मग माणसात “मी”, “अहं” आणि “अहंकार” निर्माण होतो.

हे सर्व लक्षात घेऊन जीवन कसे जगावे याचे दिशा दर्शन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत. 


श्लोकांचे अर्थ विवरण आणि संदेश आपण ध्वनिफितीमध्ये ऐकू शकाल. 



विजय रा. जोशी. 

Wednesday, September 1, 2021

 

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 6 ते 10.  : ध्वनिफीत 





सारांश - श्लोक ६ ते १०. 

आपण विकार टाळू शकत नाही पण त्यावर लक्ष हवे, स्वतःचे निरीक्षण हवे. हेतुकडे लक्ष हवे. हेतू स्वार्थीनको. समतेचा हवा. स्वतः बरोबर तेवढाच इतरांचा विचार हवा. आणि  विकाराची तीव्रता हळू हळू संकल्पाने कमी करण्याचा प्रयत्न हवा. अहंकार रहित निर्भयता निर्माण करणारे शूरत्व जर आपण अंगी बाणू  शकलो  तर अशा वर्तनाने  इतर लोकांस देखील आपण संतुष्ट, तृप्त आनंदी, शांत करू शकू. तोडणाऱ्या कुर्हाडीला देखील चंदनाचे झाड सुगंधित करते. म्हणून येथे समर्थ म्हणतात तू आयुष्यात चंदन प्रमाणे झिजत कार्य कर.  

कर्मात अपेक्षा असेल तर त्यात शीतलता, पवित्रता  रहात नाही. वडिलार्जित संपत्ती, रेस , लॉटरी, यातून मिळालेली संपत्ती याचा लोभ नको. सुखा मागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चिरंतन चक्र आहे. दुःखाचे दुःख कमी झाले की सुखाचा ताठा देखील रहात नाही.  आणि मग  यथाकाल अशा विवेकी  वर्तनाने आपण आपल्या स-स्वरुपाशी . आत्मरुपाशी एकरूप होऊ शकू. 


विजय रा. जोशी.