Wednesday, January 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  कृतज्ञता दिनानिमित्त विशेष पाठ




“प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  श्लोक सारांश. 

श्लोक ६७ - पराक्रमी श्रीराम भक्ताचे संकटापासून रक्षण करतो. 

६८ -  ज्याच्या समोर प्रलय काळ हि थरथरतो. त्याचे नाम घ्यावे. गुण घ्यावे. 

६९ -   माणसाने भक्तिमार्गावर असतांना कधीही अनीती, द्वेष-मत्सर करू नये. 

७० -   अहंकार आणि आळस त्यागून सातत्याने नाम-स्मरण करावे. 

७१ -    नामस्मरणाने दोष कमी होतात, पुण्य संचय घडतो. 

७२ -   खर्च आणि कष्ट नसलेले नामस्मरण करीत असता संसारापासून  शक्य तेवढे अलिप्त असावे. 

७३ -    महादेव सुद्धा ज्याचे नाम जपतात त्यास (संसार) दुःख भोगावे लागत नाही. 

७४ -    व्रते, दाने, उद्यापने असे काहीही न करता  दिन-दयाळू परमेश्व्राचे मनन करता येते. 

७५ -    नामस्मरणाचे सांगितलेले हे महत्व मान्य होत नसेल तर अभ्यास करून किंवा अधिकारी

              व्यक्तीच, गुरूंचा सल्ला घेऊन ते महत्व समजून घ्यावे. 

७६ -    मनाची चंचलता माणसास कोठेही स्थिर होऊ देत नाही. नामावरील विश्वास माणसाला

            सन्मार्गावर स्थिर ठेवतो. ……………..श्रीराम


या श्लोकांच्या निमित्ताने प्रभात काळी साधना कशी करावी या बद्दल पूज्य स्वामी विज्ञानानंद

सूचित विचार येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाठ आवडल्यास तो इतरांना ऐकण्याची शिफारस जरूर करावी, ही विनंती.


विजय रा जोशी.



Monday, January 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 76 ते 80 : ध्वनिफीत




सारांश , श्लोक 76 ते 80 . 

समर्थ सांगताहेत : राघवाची भावना ठेव म्हणजे भाव ठेव याचाच अर्थ त्याचा कोठेही अभाव नाही  हे तुझ्या मनात पक्के असू दे.  संसार, व्यवहार हा जर खरा मानला ,त्यासाठीच जर आपण आपले नित्य वर्तन ठेवले तर हे साध्य होणार नाही. म्ह्णून अंतिम सत्य काय हे पक्के ध्यानात ठेवून त्या अंतिम सत्यासाठी, परमात्म्यासाठी जर आपण जगलो तर चुकीच्या भयाने आपण ग्रस्त होणार नाही. आणि चुकीच्या ध्येयांची धारणा आपल्या जीवनात स्थिर होणार नाही. 

आपल्या जीवनातील घात टाळण्यासाठी योग्य ध्येय, योग्य साधन, योग्य हेतू, योग्य सुख-संकल्पना असाव्यात आणि त्यावर स्थिर रहाण्यासाठी मत्सरासारख्या  वाईट विकारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवावे असे मार्गदर्शन आपल्याला येथे समर्थ रामदासस्वामी करीत आहेत. 

थोडक्यात आपले वर्तन दोष कमी होण्यासाठी असमतेच्या जीवनाकडून समतेच्या जीवनाकडे आपण निरंतर प्रवास, प्रगती करीत राहावे. 

आपल्या भाग्याने आपल्याला या आर्जवाचे आवाहन भिडावे, त्याप्रमाणे आपल्या हातून कृती व्हावी अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करू या. 

हा संदेश सविस्तरपणे या ध्वनिफितीत ऐकावा आणि  योग्य वाटल्यास इतरांशी शेअर करावा ही नम्र विनंती. 


विजय रा. जोशी. 



Tuesday, January 4, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 71 ते 75 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ७१ ते ७५. 

साधनेत वर्तन काटेकोरपणे जपायला हवे.  प्रथम आपण चुकत आहोत हेच माणसाला मान्य नसते.  पण कोणत्यातरी निमित्ताने काही तरी करायला हवे याची तीव्र जाणीव होऊ लागली तर माणूस उपायांकडे बघतो. अशा लोकांस मार्गदर्शन करणारे मनाचे श्लोक (७१ - ७६), “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपाय देतात. 

नामस्मरणांनी लगेच हे दोष जातील का ? तर नाही मग त्याने काय होईल? हळूहळू आपल्या दोषांची जाणीव होते. इतरांचे दोष पाहणे कमी होते. पैसे लागत नाही, कष्ट होत नाहीत . एकाग्रतेने, नम्रतेने, भगवंताची आळवणी करायची. 

पण येथे काय मागायचे ? तर शाश्वत सुख, भगवंताशी एकरूपतेचा आनंद. बाकी काही भौतिक, सांसारिक सुख मागायचे नाही. नामस्मरणासाठी साधने, संपत्ती , कार्य-कर्म काही लागत नाही जर काय लागत असेल तर तो भगवंत प्राप्तीचा संकल्प, निर्धार, आस !!  

जर हे पटत नसेल तर सर्व अभ्यास स्वतः करावा, स्वतः करणे होत नसेल तर सद्गुरू शोधावे, सद्गुरूंची परीक्षा आपल्या बुद्धीप्रमाणे करून घ्यावी. आणि एकदा सर्व शन्का फिटल्या कि मग मात्र त्यांचा उपदेश, त्यांचे सांगणे बिनशर्त पाळावे, त्यात संशयी वृत्तीने , विविध सबबीने बाधा आणू  नये. 

समर्थ आपल्याला सांगत आहेत ते असे – 

दिवसाची सुरवात रामनामाने करा आणि दिवसभर रामनामाच्या निष्ठेने वैखरी, प्रकट बोलणे, वागणे करत प्रत्येक दिवस साजरा करीत जा. या श्लोकांतील संदेश आपल्याला उचित मार्गदर्शन करतो. 

श्रीराम II


विजय रा. जोशी.