Wednesday, October 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 31 ते 35: ध्वनिफीत



सारांश - श्लोक ३१ ते ३५.  


प्रभू रामचंद्र पराक्रम आणि बळ यात श्रेष्ठ आहे. सर्व सृष्टी हि त्या भगवन्ताची लीला आहे.

पश्चाताप दग्ध अहिल्येचा  श्रीरामाने उद्धार केला.  हनुमंत आणि बिभीषण हे राम-कृपा प्राप्त

झालेले थोर भक्त आहेत. 

जो खरा निष्ठावान, श्रद्धावान भक्त आहे त्यास भगवंत कधीही अंतर देत नाहीत , 

भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा करीत नाहीत. याबद्दल ते भक्तास आश्वासन देतात,

त्यावर आपण आढळ विश्वास ठेवला पाहिजे आणि आपली भक्ती दृढ आणि अचल ठेवली

पाहिजे. 

दृढ भक्तीचे जीवनातील महत्व या ध्वनिफितीत वर्णन केलेले आहे. 

जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना शेअर करा . 


विजय रा. जोशी 



Monday, October 11, 2021


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 26 ते 30: ध्वनिफीत 







श्लोक २६ ते ३० - सारांश. 


जीवन हे क्षणभन्गुर आहे.  

जर भव, म्हणजे आपले प्रापंचिक जीवन, एक दिवस संपणार आहे, हे सत्य समजले की  त्या शेवटाला

भिण्या ऐवजी तो शेवट  कसा गोड होईल यासाठी तयारी केली पाहिजे. आपली मानसिकता

बनविली पाहिजे. आणि ती मानसिकता कशी बनवता येईल याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकात

आपल्याला करीत आहेत. 

भगवंत आणि सद्गुरू त्यांच्या सच्चा, निष्ठावान भक्ताकडे दुर्लक्ष करीत नाहीत. अनेकदा भक्तांचे

जीवन जरी वरवर इतरांना दुःखमय वाटले तरी त्यांचे, त्यांच्या सत्कार्याचे भगवंत नेहमी संरक्षण

करतात.

अंतिमतः,  भगवंत आपल्या भक्ताचा आपले पणाने सांभाळ करतात . त्यांची उपेक्षा कधीही करत

नाहीत . 

आपल्या भक्ती साधनेने आपले जीवन कसे सार्थकी लागते त्याबद्दल केलेले 

या श्लोकांवरील विवेचन जरूर ऐकावे आणि आपल्याला आवडल्यास इतरांशी शेअर करावे. 


विजय रा. जोशी.