Friday, May 3, 2024

 योग ग्रंथ पाठ ८.  उत्क्रांती ३/३ , दि. १० एप्रिल २०२४   ध्वनी फीत . 






जडाच्या बोगद्यात मनाची उत्क्रांती

महास्फोट स्थितीमध्ये मन जडाच्या  बोगद्यात शिरले. (विश्व  निर्मितीचा क्षण). त्या जडाने अनेक आकार धारण केले, उत्क्रांती झाली, जीव सृष्टी निर्माण झाली. मानव निर्माण झाला. मनुष्य जीव जगला . 

आयुष्याच्या शेवटी जड / अजडाची विलगता झाली.  पण इच्छा संपली नाही. जन्म मरणाचे चक्र सुरु राहिले. बोगद्यातील प्रवास संपला  नाही. 

वासना तृप्तीसाठी, सुखासाठी जीव चालत राहिला धावत राहिला. सुख दूरच राहिले. अशी उत्क्रांती झाली. जीव जर विविध सुख वासना पासून अलिप्त होईल, मुक्त होईल तर मग जीव स्थिती पासून विश्व निर्मात्या पर्येंत आणि त्याही मागील ब्रह्म स्थिती कडे प्रवास होईल. 

मनाला मुक्ती पाहिजे असेल तर सोपी युक्ती आहे.  मन बांधले कसं गेलं, बंधनात कस अडकलं ते शोधायचं. आणि त्या गाठी सोडायच्या. स्वार्थाच्या, पूर्व संस्कारांच्या गाठी. आयुष्याच्या दोऱ्याला आपण स्वार्थाच्या गाठी मारल्या आहेत. त्यातील एकेक गाठ सत्कर्माने,  त्यागाने , सद्हेतूने,  निष्काम उपासनेने सोडवायची. 

व्यवहार शुद्ध करण्यासाठी व्यवहार सोडण्याची गरज नाही , 

हळू हळू सुरवात करा.    साम, दाम, दंड भेद …. यशासाठी अनेक मार्ग.

साम/दाम.. एखादा माणूस लोकांशी एकत्रतेने, जुलवणुक करून लोकप्रिय होतो.
दंड … डार्विन विचार.
भेद .. ज्ञान आधारित स्वतंत्र रीत्या मार्ग शोधणे.

को हम ? या विवेकाने परतीचा प्रवास सुरू होईल, अज्ञानाचा निरास होईल. आपण अज्ञानाच्या
बोगद्यातून बाहेर पडू. ज्ञानाच्या प्रकाशात मुक्त होऊ. फक्त ही बुध्दी, हे motivation टिकले पाहिजे.

आपल्याला उत्क्रांतीच्या वाटा शोधता येतील, अधिक संशोधन करता येईल… स्वामीजी. 

मानवी उत्क्रांती म्हणजे मनाची शुद्धी, मनाचे शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा. आत्मज्ञान प्राप्ती.  उत्क्रांती संबंधीचे हे चिंतन आपल्याला काही नवीन प्रेरणा देते.   

ऐका , अनुभवा, आणि इतरांशी हे सर्व लिंक मार्फत शेअर करू ज्ञान गुणाकार करा, ही नम्र विनंती !


विजय रा जोशी. 


 योग  ग्रंथ पाठ ७, उत्क्रांती २/३  दि. ३ एप्रिल २०२४.  ध्वनी फीत 


 



अमिबाने माणसापर्यंत प्रगती केली, म्हणजे काय केले ?) 

'बुध्दीयोगा'च्या पाचव्या प्रबंधात, याचे वर्णन आहे.

खालच्या अप्रगत प्राण्यापासून माणसापर्यंत प्रगती झाली, तशी त्याची दुःखे, गुणाकाराने वाढली. ती दुःखे, तो पुढे

ढकलू शकला. एवढीच त्याला मेंदूने देणगी मिळाली. 

मेंदू असलेला माणूस, 'राग वाईट आहे,' असे जाणत असूनसुध्दा, प्रगत मेंदूच्याच सहाय्याने, त्याचे दुष्परिणाम, 

त्याने काही काळ टाळले,  याप्रमाणेच, मेंदूच्याच सहाय्याने, अनेक परस्परविरोधाच्या कसरती त्याने केल्या.  

योग शास्त्र आणि शरीर शास्त्र याचा सम्बन्ध , योग ग्रंथात स्वामीजींनी विस्ताराने दिला आहे. 

त्याचा स्वतंत्र अभ्यास करून ते सर्व समजून घेणे,  हे आपण नंतर करणार आहोत.

“Does (Darwin) evolutionary theory need a rethink?”  Scientists

Standard evolutionary theory assumes that the changes that fuel natural selection will be more or less random in both cause (the mutation) and effect (the physical change brought about).

But sometimes certain forms or features seem “easier” to evolve than others in a way that externally-influenced natural selection doesn’t fully explain — since the way those forms develop makes some adaptations more likely to appear than others. 

The extended evolutionary synthesis takes the view that this developmental bias is not a mere footnote to convergent evolution but can have a significant role in shaping what is possible as species adapt across generations. (जुळवणूक).  

जुळवणूक कोणाची होते ? विचारांची !!   म्हणजेच मनाची, बुद्धीची, अंतःकरणाची !!!


व्हॉट माईंड मीन्स  (published before 1963) . 

२१ व्या  शतकातील शास्त्रज्ञ जे म्हणतात तेच स्वामीजींनी  १९६० च्या सुमारास म्हंटले आहे. 

Evolution theory pre-supposes mind. The law of evolution presumes an overall,  all-sided

development of an organism tending to perfection. 

It is nothing but Mind that qualifies  itself,  steps up and retains characteristics acquired in the lower

species. The present theory of evolution (Darwin theory) pathetically fails to un-riddle the gap

between two species.  (How ape shifted to attain human structure).

The secret of these gaps in the evolution can never be un-masked  unless Mind is recognized as a vital

 force independent of matter. 

दशावतार


थोर शास्त्रज्ञ डार्विनने या पृथ्वीतलावरचा पहिला ‘जीव’ पाण्यात निर्माण झाला असा सिद्धांत साधारणत: 150 -200

वर्षांपूर्वी मांडला.. त्या पाण्यातल्या पहिल्या सजीवापासून, लाखो वर्षांपासून ,अनेकजीव-जाती उत्क्रांत होत होत

आजचा प्रगत मानव बनला. ..अर्थात एखादा छोटा बदल घडायलाही हजारो , लाखो वर्षं लागतात..

डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता मान्य आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी

सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या

तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे.


हे सर्व आणि अधिक काही , सविस्तरपणे आपण या विवेचनात ऐकू शकाल. 



विजय रा जोशी. 



 योग ग्रंथ पाठ ६ ,  उत्क्रांती  १/३ (२७ मार्च २०२४)  ध्वनी फीत 





सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत 

उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही 

त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे 

जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.

लामार्क, माल्थस, वॅलेस , डार्विन हे काही शास्त्रज्ञ, ज्यांनी या वर काही संशोधन विचार मांडले आहेत. 


उत्क्रांतीवाद हा उत्क्रांतीवादाच्या कल्पनांचा किंवा सिद्धांताचा संच आहे. ही एक अनुक्रमिक, दिशात्मक

आणि हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. ही पद्धतशीर बदलाची प्रक्रिया आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक

मानववंशशास्त्रात मानवी संस्कृतीचा हळूहळू, संरचनात्मक बदल हा उत्क्रांतीवाद्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.


स्वामीजींनी या वर आपले विस्तृत विचार विविध ग्रंथात मांडले आहेत. आणि मन, मनाच्या इच्छा आणि

परिस्थितीशी जुळवणूक या सर्वांची उत्क्रांती मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका लक्षात घेतल्या शिवाय त्या थेअरीला

 पूर्णतः येणार नाही हे ठाम पणाने मांडले आहे. 


या व्यतिरिक्त उत्क्रांतीत तथाकथित उन्नति झाली कि अधोगती झाली यावर सुद्धा अत्यंत महत्वाचे भाष्य केले आहे.

माईंड पॉवर, व्हॉट माईंड मीन्स, आपण असे का वागतो, पर्पज ऑफ युनिव्हर्स, वागावे कसे ... अनेक

 पुस्तकांमध्ये  स्वामीजींनी या सिद्धांताचा विविध  अंगांनी  विचार केला आणि अनेक पैलूंवर भाष्य केले. 

उत्क्रांती प्रक्रिया आणि आपण याचा दुवा समजण्यासाठी  हे सर्व समजून घेणे आपल्याला महत्वाचे आहे.  

यावर अभ्यासात्मक चिंतन एकूण ३ पाठात मांडण्याचा हा प्रयत्न  आपल्याला उद्बोधक वाटावा अशी अशा आहे. 


खरे तर यावर अधिक अभ्यास, संशोधन होणे , करणे गरजेचे आहे. असे वाटते.

 


विजय रा. जोशी