Friday, May 3, 2024

 योग ग्रंथ पाठ ८.  उत्क्रांती ३/३ , दि. १० एप्रिल २०२४   ध्वनी फीत . 






जडाच्या बोगद्यात मनाची उत्क्रांती

महास्फोट स्थितीमध्ये मन जडाच्या  बोगद्यात शिरले. (विश्व  निर्मितीचा क्षण). त्या जडाने अनेक आकार धारण केले, उत्क्रांती झाली, जीव सृष्टी निर्माण झाली. मानव निर्माण झाला. मनुष्य जीव जगला . 

आयुष्याच्या शेवटी जड / अजडाची विलगता झाली.  पण इच्छा संपली नाही. जन्म मरणाचे चक्र सुरु राहिले. बोगद्यातील प्रवास संपला  नाही. 

वासना तृप्तीसाठी, सुखासाठी जीव चालत राहिला धावत राहिला. सुख दूरच राहिले. अशी उत्क्रांती झाली. जीव जर विविध सुख वासना पासून अलिप्त होईल, मुक्त होईल तर मग जीव स्थिती पासून विश्व निर्मात्या पर्येंत आणि त्याही मागील ब्रह्म स्थिती कडे प्रवास होईल. 

मनाला मुक्ती पाहिजे असेल तर सोपी युक्ती आहे.  मन बांधले कसं गेलं, बंधनात कस अडकलं ते शोधायचं. आणि त्या गाठी सोडायच्या. स्वार्थाच्या, पूर्व संस्कारांच्या गाठी. आयुष्याच्या दोऱ्याला आपण स्वार्थाच्या गाठी मारल्या आहेत. त्यातील एकेक गाठ सत्कर्माने,  त्यागाने , सद्हेतूने,  निष्काम उपासनेने सोडवायची. 

व्यवहार शुद्ध करण्यासाठी व्यवहार सोडण्याची गरज नाही , 

हळू हळू सुरवात करा.    साम, दाम, दंड भेद …. यशासाठी अनेक मार्ग.

साम/दाम.. एखादा माणूस लोकांशी एकत्रतेने, जुलवणुक करून लोकप्रिय होतो.
दंड … डार्विन विचार.
भेद .. ज्ञान आधारित स्वतंत्र रीत्या मार्ग शोधणे.

को हम ? या विवेकाने परतीचा प्रवास सुरू होईल, अज्ञानाचा निरास होईल. आपण अज्ञानाच्या
बोगद्यातून बाहेर पडू. ज्ञानाच्या प्रकाशात मुक्त होऊ. फक्त ही बुध्दी, हे motivation टिकले पाहिजे.

आपल्याला उत्क्रांतीच्या वाटा शोधता येतील, अधिक संशोधन करता येईल… स्वामीजी. 

मानवी उत्क्रांती म्हणजे मनाची शुद्धी, मनाचे शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा. आत्मज्ञान प्राप्ती.  उत्क्रांती संबंधीचे हे चिंतन आपल्याला काही नवीन प्रेरणा देते.   

ऐका , अनुभवा, आणि इतरांशी हे सर्व लिंक मार्फत शेअर करू ज्ञान गुणाकार करा, ही नम्र विनंती !


विजय रा जोशी. 


No comments:

Post a Comment