Friday, August 19, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 161 ते 165 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 161 - 165.

मी म्हणजे माझे सध्याचे अस्तित्व, म्हणजेच माझे शरीर. या देहाचे सर्व संबंधी म्हणजेच माझा प्रपंच आणि

हे सर्व वास्तव / सत्य , असा आपला दृढ विश्वास अगदी बालपणापासून बनलेला असतो.  

अहंकाराचे विश्लेषण सुरू आहे , त्यापासून होणारे अनेक दुःख परिणाम समजावून सांगत आहेत. अहंकार

विसर्जन हे प्रमुख साध्य अध्यात्म साधनेत साधावे. अहंता-मुक्त श्रेष्ठ व्यक्ती अनुकूल/प्रतिकूल परिस्थितीत

सुखी रहातात हे पाहून आपण आपली अहंता कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले पाहिजे. देहबुद्धी आपल्या

अंतरी स्थिर झाली तर काय होते आणि आत्मबुद्धीकडे आपली प्रगती घडली तर काय होते हे लक्षात घेऊन

आपण आपल्या भल्यासाठी सज्जनांच्या संगतीत रहावे असे समर्थ पुनःपुन्हा सांगत आहेत. 

अहंकार अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेषेकरून लागत नाही; परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो. आणि त्याला नाना

 प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. ज्ञान मार्गात अहंकार मोठा धोका, म्हणून तपाची जोड अनिवार्य.


ज्ञान आधारित कर्म करणे आणि कर्मात अहंकार रहित संपूर्ण समर्पण वृत्ती ठेवणे हे सोपे नाही. दृश्य जगाला

सोडून त्या पल्याड असलेल्या भगवन्ताला शरण जाणे हि आत्मबुद्धी  असते. आपले वासनेने लडबडलेले

अंतःकरण संतांच्या द्वारी सेवाकार्यात सतत ठेवले तर ते शुद्ध होऊ लागते. “मी” ला अहंकाराला जर

सम्पवायचं नसेल तर अध्यात्म म्हणजे फक्त शब्दांचा  काथ्याकूट असच म्हणावं लागेल. 


अध्यात्म साधनेत प्रगती होण्यासाठी काय करावे हे अत्यन्त तर्कनिष्ठ पद्धतीने सांगणाऱ्या या श्लोकांचे विवेचन

 आपणास नक्की   उपयुक्त वाटेल हा विश्वास आहे. जरूर काळजीपूर्वक ऐका आणि  योग्य  वाटल्यास 

जरूर like आणि share करा ही  विनंती. 


 विजय रा. जोशी. 




Sunday, August 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 156 ते 160 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक १५६ - १६०.

परमात्मा पहातांना पहाणारा त्यात मिसळून गेला पाहिजे. ती स्थिती येण्यासाठी “मी” चे अस्तित्व पूर्णपणे

संपून ते अनंतात विलीन झाले पाहिजे. 

शब्द - ज्ञानाचे अध्यात्म शास्त्राचे मार्ग अनेक असू शकतील. पण स्वतःला विवेकाने जो मार्ग

समजला त्यावर निष्ठा ठेवून जो सतत पुढे जात राहील, कर्मशुध्दी करत मार्गक्रमण सुरु राहील, समर्पण

भावाने , अलिप्तता राखत , अहंतेचे विसर्जन करीत, ध्येय प्राप्तीसाठी  तळमळीने प्रयत्न करीत राहील, 

तो साधक.   

‘अहंता’ अडथळे निर्माण करते. अहंकारी वागणे मानवास आत्मिक उन्नतीपासून, परमार्थापासून दूर ठेवते.

मी आत्मा आहे, हि जाणीव मनी, वर्तनी मुरणे म्हणजे आत्मज्ञान होय. फक्त बुद्धीने कळणे उपयुक्त नाही.

सहज वर्तन तसे घडायला हवे. जाणीव हि एकवेळ शून्यरूप तरी  व्हायला हवी किंवा विश्वरूप एवढी विशाल

व्हायला हवी, तर आंतरिची साधना सफल होईल. म्हणून सतत अनुसंधान राखावे लागते आणि या

अनुसंधानाची अंतर्मनातील लागवड साधकास फार सावधपणे करावी  लागते.  

आंतरिक उन्नती साधण्यास काय करावे , काय टाळावे याचे मार्गदर्शन श्री समर्थ करीत आहेत. 

साधना म्हणजे काय आणि त्यामार्गातील विविध टप्पे समजावून सांगणारे हे विवेचन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी

 खूप माहितीपूर्ण असून आपल्यास ते नक्की उपयुक्त वाटेल असा विश्वास आहे. 

जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास like आणि share करा ही विनंती. 


विजय रा. जोशी. 




Saturday, August 6, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 151 ते 155 :  ध्वनिफीत :




सारांश - श्लोक १५१ - १५५. 

सत-तत्वाचा शोध घायचा आहे. आणि ते सत-तत्व आपल्यातच आहे.  विनासायास फायदा देणारे इन्व्हेस्टमेंट

ऑप्शन्स, आपण व्यवहारात शोधत रहातो. पण हि सवय परमार्थात खूप घातक ठरते. परमार्थात तितिक्षा

लागते, दीर्घ प्रयत्न लागतात . फक्त भोग किंवा त्यागाने अहंकार होईल पण समाधान होणार नाही. 

सु ख ---- समाधान  ---- शांती. ... ही प्रगत जीवनातील  चढत्या क्रमांची  उद्दिष्टे.  व्यवहारात आपण पहातो

की सुख संपल्यानंतर दुःख येते, समाधान अधिक  काळ टिकते. शांती जीवनात स्थिर  झाली तर मग काही

मिळवायचेच रहात नाही. सुख हे समाधानकारक वाटले पाहिजे आणि शाश्वत समाधानातून माणूस शांतीत

स्थिर झाला पाहिजे. 

संपन्नता (विविध सुख साधने) आणि प्रसन्नता या दोन चाकावर समाधानाचा रथ चालतो. माणूस संपन्नता

प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करेल. पण त्या संपन्नता प्राप्तीत काही अपेक्षा असेल तर प्रसन्नता काही काळ

मिळेल पण ती चिरकाल टिकणार नाही.  म्हणून निरपेक्ष कर्म करावे असे रामदास स्वामी सांगत आहेत. 

ज्ञान चक्षु विकसित होण्यासाठी संत सद्गुरूंनी आचारलेला मार्ग हाच एकमेव उपाय आहे.

पण त्या मार्गावर जर कायम स्थिर होता आलं नाही तर मात्र हे परम सत्य मनुष्य ओळखू शकत नाही . 

मन आणि ब्रह्म यांचा संबंध काय, तो जाणण्याचे महत्व काय  आणि  मनाला ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय

प्रयत्न करायला हवेत  याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून करीत आहेत. 

अध्यात्म आणि व्यवहार याचे सविस्तर विश्लेषण आपल्यास नक्कीच उपयुक्त वाटेल. जरूर ऎका 

आणि आवडल्यास share करा.  धन्यवाद. 


  विजय रा. जोशी .