Tuesday, November 28, 2023

 पसायदान पाठ :  ४/१०/२०२३. 


पसायदान : माउलींचा उद्देश काय आहे ?    माणसाचा क्रम विकास !




अगोदर आपण गीता पाठ केले, मनाचे श्लोक सविस्तर समजून घेतले. आणि आता पसायदानाचा संदेश
 
विस्ताराने पाहात आहोत.  या सर्वांचा उद्देश काय आहे? हे आपले सांगणे, ऐकणे जर आपल्याला
 
सार्थकी  लावायचे  असेल  तर आपण  कोनत्या   दृष्टीने या सर्व गोष्टींकडे पहायला पाहिजे ?

 स्वामीजींनी आपल्याला यज्ञ प्रार्थना दिली. ती अशी :

वयं हवनं करिष्या महे I अस्मात  अती लोभम हर I 

गुणां स्मरामी , त्वाम शरणम अहं प्रपद्ये. I        आत्म ज्ञानायच  त्वाम शरणम अहं प्रपद्ये II 

आम्ही हवन करतो. आमच्या मधील दोष कमी  होवो. आमच्यातील गुण वृद्धिंगत होवो. त्या साठी आम्ही तुला

(अग्नी /प्रकाश देवतेला) शरण येतो.    आत्मज्ञान होवो, त्यासाठी आम्ही तुला शरण येतो. 

आणि या पार्थने नंतर प्रकाश प्रार्थना / ज्योती ध्यान याचा संदेश सविस्तर आहे. 

अखिल मानवतेचा कळवळा, सर्व भूत मात्रांबद्दल जिव्हाळा, सर्व कल्याणाची आस माउलींच्या चित्तात

जी आहे त्ती ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा दिसून येते. त्यासाठी मानवाच्या वर्तनातील बदल  महत्वाचा आहे

हे जन-मानसावर ठसवितांना  सद्गुणांचे पालन करणे आवश्यक आहे त्याचे प्रतिपादन त्यांनी

ज्ञानेश्वरीत अनेकदा केले आहे. 

सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमेश्वराचा महिमा वाढावा, याची ज्ञानदेवांस तळमळ

होती. त्यांनी या गुणांचे वर्णन करतांना आपला सारा अनुभव या ओव्यांत ओतला आहे. मराठी भाषा

बोलणाऱयांवर त्यांचे हे अनंत उपकार आहेत. 

लोकात, समाजात मैत्र निर्माण का होत नाही ?

मनुष्य जेव्हा इतरांना ते आपल्या सुखाचे साधन आहेत अशा दृष्टीने पाहू लागतो तेव्हा त्याची

निराशा होते. माणसा-माणसा मधले फार मोठे दुःख हे इतरांना आपल्या सुखाचे साधन समजल्यामुळे

निर्माण झालेले असते. मग नवीन मॉडेलची मोटार आणि सुंदर दिसणारी बायको यांना एकच दर्जा

प्राप्त होतो. 

अशा मनोवृत्तीमुळे ज्यांना साधन समजले जाते त्यांना आपल्या वासनांसाठी राबवितांना आणि

त्यांच्यावर अन्याय करतांना माणसाला काहीच वाटत नाही. त्यामुळे ज्या व्यक्ती अशा साधन होतात,

त्यांच्या जीवनात दुःख निर्माण होते. आणि साधन समजल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या सुखाच्या

अपेक्षा पूर्ण करीत नाहीत तेव्हा आपल्या जीवनात देखील  दुःख निर्माण होते. 


लोकांना आपले साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते.  लोकांनी आपल्याला

चांगले समजावे, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे, असे त्याला वाटते. त्याचे गुण इतरांच्या लक्षत येऊ नयेत

त्याचे त्याला वाईट वाटते. आणि आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे

मानायला पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते आणि लोक वाईट, दुष्ट, कृतघ्न

आहेत असा तो निर्णय आपल्या मनाशी घेतो. पण दुसऱ्याचा तो त्यांच्या बाजूने  विचार करील तर त्याला आपली

चूक लक्षत येईल.  आपल्यासाठी सर्व  आहेत, आपण जगाचे केंद्र आहोत आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी

देवाने निर्माण केले आहे - असे माणसाने समजू नये.  

संत आपल्यास हेच सांगतात. म्हणून ते म्हणतात - खरे सुख हे आपले आपणच शोधायचे असते. ते आपल्यातच

असते. आत्मसुखाचे साधन जर इतर लोकांना मानले तर सुख कधीही मिळणार नाही. ते म्हणतात - माणसाने

कुणाला आपले समजू नये, या जगात कुणी कुणाचे नाही. 

हा जो विचार आहे तो अशा उच्च अध्यात्मिक भूमिकेवरून आहे. आणि माझे माझे करून  इतरांत गुंतू नये याचा

अर्थ प्रेम करू नये असं नाही . प्रेम करणे आणि प्रेमात गुंतणे हे दोन वेगळे प्रकार आहेत.  पहिले व्यापक

 आत्म्यावरील प्रेमाचे दर्शक आहे तर दुसरे विषयाच्या आसक्तीत अडकणे आहे. 

“भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे” या प्रार्थनेतील अर्थ अशा दृष्टीने व्यक्ती आणि समष्टी यांच्या कल्याणाच्या दृष्टीने

माउलींना अभिप्रेत आहे , तो आपण लक्षात घेतला पाहिजे. 

आपण पसायदानाचा अभ्यास करून काय साधायचे आहे ? 

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपल्याला जे हवे असते ते म्हणजे 

अखंड असणे ., अस्तित्व. 

ज्ञान, माहिती, समजून घेणे 

सुख, समाधान, आणि  शांती. 

त्यासाठी सत चित आनंदरूप आत्म्याशी, परमेश्वराशी आपण एकरूप झाले पाहिजे. 

असे  उपनिषदे, गीता सांगतात.  

आणि ते आपल्यास सर्व प्राप्त व्हावे यासाठी , आपल्यात चांगला बदल घडविण्यासाठी  ज्ञानेश्वर माउली

आपल्याकडे पसायदानात मागतात : 

जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. 

हे मागणे  त्यांच्या गुरूंकडे, परमेश्वराकडे आणि आपल्याकडे ( श्रोत्यांकडे ) करतात. 

त्यासाठी आपण जर आत्मपरीक्षण केले आणि स्वतःतील खलत्व कमी केले तर 

जे आपल्याला पाहिजे ते मिळेल. माणसाचा पारमार्थिक क्रम विकास होईल. 


विजय रा. जोशी. 










 पसायदान पाठ : ११/१०/२०२३


'पसायदान' हे जीवन घडवणारे मागणे आहे. 




 पसायदान अर्थाचे चिंतन प्रकाशाची वाट दाखविणारे मोठे साधन आहे. मानवाचे देणे घेणे ब्रह्मसुखाचें व्हावयाचे

असेल,  त्याचा परस्पर व्यवहार आनंदाचा व्हायचा असेल आणि एकूण समाजाचे जीवन सामंजस्याचे, कल्याणप्रद

आणि कृतार्थतेचे व्हावयाचे असेल तर 'पसायदाना' द्वारे माऊलींनी जे विचार दिले आहे त्याचा आपल्या बौद्धिक

घडणीमध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. त्यासाठी 'पसायदाना' चे चिंतन प्रेरक आणि मार्गदर्शक होइल. 

हा दीप आपल्या हृदयमंदिरामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे.

या दृष्टीने काही महत्वाच्या संकल्पनावर  आज या ओवीच्या निमित्ताने चिंतन करू. 

स्वतःची सर्व संकटे विसरून सर्व भूतमात्रांच्या कल्याणाचे हे मागणे माउलींच्या अति-विशाल अशा अंतःकरणातून

उमलले आहे. 

आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १ 

एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य  संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन

झाली. म्हणून आता  विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत.

प्रसन्न होऊन माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या.  त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे, 

९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश,

प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

-  खळ / दुष्ट लोकांबद्दल अधिक काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना. 

-  माणूस सत्कर्माने सुधारू शकतो, असा पूर्ण विश्वास.

पण तेथेच न थांबता  सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो.  सर्व  जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात

स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो, 

-  खळ ,समाजात विविध रूपाने, मुखवटा धारण करून  वावरतात, त्यामुळे चांगले काम करणाऱ्या माणसांना

 त्रास होतो, या दुष्ट लोकांचा जन्म देखील वाया जातो. 

-   काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना  सुद्धा 

  सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते. 

- जे कर्म भगवंतासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या ऐहिक अथवा पारलौकिक सुखासाठी आहे त्याला ज्ञानेश्वर

 महाराज “अज्ञानाचा पुण्यमार्ग” असं म्हणतात. 

असे कोणतेही कर्म जे केवळ स्वतःसाठी आहे, स्वतःच्या वासनापूर्तीसाठी आहे, त्याला सत्कर्म कशाला म्हणायचे ? 

लोकांना आपले स्वार्थाचे साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते

आपल्यासाठी सर्व  आहेत, आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी देवाने निर्माण केले आहे, 

असे माणसाने समजू नये. 

थोडे फार सत्कृत्य करणाऱ्याना, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे असे वाटते.  आपण लोकांसाठी एवढा 

त्याग,कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे मानायला  पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला

खेद होतो, चीड येते. 

 सत्कृत्य आणि उपासना दोन्हीही  निरपेक्ष हवे. मग हळू हळू चित्त शुद्धी आणि चित्त शांती येते. 



विजय रा. जोशी 

 पसायदान , पाठ १८/१०/२०२३ 


 ९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे  ९ ओव्यांचे पसायदान 






आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १ 

एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य  संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन

झाली. म्हणून आता  विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत. प्रसन्न होऊन

माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या. 

त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे, ९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे

 पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश, प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

मातेला आपल्या,मागास लेकराची अधिक काळजी वाटते.  तशी ज्ञानोबा माउलींना दुष्ट लोकांबद्दल अधिक

 काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना ते करत आहेत.  

पण तेथेच न थांबता  सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो

सर्व  जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो अशी ते मागणी

करतात.  

काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना

सुद्धा सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते. 

थोडे फार सत्कृत्य करणाऱ्याना, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे असे वाटते. 

आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे मानायला  पाहिजे तेवढे ते आपल्यास

 मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते. 

 -  सत्कृत्य निरपेक्ष हवे. 

खरे सत्कर्म ते; जे माणसाला परमात्म्यापर्येत पोहोचविते.  असे कर्म सर्वांकडून घडत राहो, आणि त्यातून सर्व

 

लोकांचे मैत्र होवो.  खरे ज्ञान सर्वांच्या वर्तनात येऊन त्यांचे प्रापंचिक तसेच पारमार्थिक सर्वांगीण कल्याण होवो . 


माझे चिंतन असे असावे :

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपले  सत्कर्म निरपेक्ष आहे का?

एकत्रित सत्कृत्य कार्यात आपला योग्य तो सहभाग आहे का ? 

अशा कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तीत / समूहात  मैत्र निर्माण होऊन त्यातून समाज, राष्ट्र , मानवता कल्याण-कार्य

होण्यासाठी आपण काही वेळ तरी लक्ष देतो का ? 

हे सर्व अधिक फलदायी होण्यासाठी मला माझ्यात काही सुधारणा करता येईल का ? 

दुरितांचे तिमिर जावो I  विश्व स्वद्धर्म सूर्ये पाहो I जो जे वांछील तो तें लाहो I प्राणीजात II ३ II

पापांचा अंधकार जावो. विश्व, स्वधर्मरूपी सूर्याने,  प्रकाशित होवो. प्राणीमात्र ज्याची इच्छा करील तो ते प्राप्त करो. 

दुराचरणातून जे निर्माण होते ते दुरित. अशा दुराचरणी पुरुषाचे आचरण माणुसकीला लाजवणारे

असते. पापांचा जोर होत होत तीं जशी वाढतील तसा त्यांस (आसुरी लोकांस) जीवंतपणींच नरकयातनांचा  

भोग घडतो. निषिद्ध कर्मापासून जे राजस आणि तामस सुख निर्माण होते तो केवळ

मृगजळासारखा सुखाभास असतो, सुख नसते. 

श्री तुकाराम महाराजांनी पापाची व्याख्या ‘पाप ते परपीडा’ अशी केली आहे. 

अशा या पापाचा अंधार गेला पाहिजे म्हणजे समाजात सौख्य नांदू लागेल. 

अमोल अशा मानवी जीवनाला उद्धस्त करणारा हा दुरितांचा अंधकार आहे. तो अंधार पूर्णपणे जाण्यासाठी 

स्वधर्मसूर्याचा उदय होणे आवश्यक आहे. 

तीच प्रार्थना ज्ञानदेवांनी पुढे केली आहे.

स्वधर्म म्हणजे जीवनातील प्रत्येक प्राप्त स्थितीतील स्वकर्तव्य. प्रकृती सर्वदा अगदी काटेकोरपणे

प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय फळ देत असते. त्यात रेसभरही इकडचे तिकडे व्हायचे नाही. 

आपल्यासमोर जे कर्तव्य असेल , जे अगदी आपल्या हाताशी असेल ते उत्तम रीतीने बजावून आपण

क्रमशः शक्ती संपादन करू शकू. 

ज्या समाजात आपण जन्म घेतो, ज्या कुटुंबात वाढतो, ज्या परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हे

जीवन लाभले असते, त्या सर्वांना आपण काही देणे लागतो. ते ही आपल्याला स्वधर्माच्या द्वारे

फेडायचे असते. पण त्या ऐवजी जो  फक्त स्वतःलाच सर्वस्व मानतो, आणि स्वतःच्या देहसुखासाठी 

विषयोपभोग घेण्यात आयुष्य घालवितो.

माउलींना अशा सर्वांची अधिक काळजी वाटते. त्यामुळे सर्वांचे होणारे नुकसान न व्हावेसे वाटते.

या कळवळ्यातून त्यांच्या अंतःकरणातून ते आपल्याला सांगतात की जीवनात स्वतःच्या योग्य प्रयत्नांनी अनुकूल,

मंगल असा बदल करणे शक्य आहे, तसा होणे आवश्यक आहे. 

त्यासाठी  दुरितांचे म्हणजे पापाचे तिमिर म्हणजे अंधकार जाण्यासाठी ,

स्वधर्मसूर्याचा उदय व्हावा अशी ते प्रार्थना करतात.



विजय रा. जोशी. 





















पसायदान पाठ :  २५/१०/२०२३.  


संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी :  पसायदान. 






ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात

येतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी 

“आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा ।माझिया सकळां हरिच्या दासां।।” असा क्रुपाप्रसाद मागितला.

संत तुकाराम म्हणतात,  ”हें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा “.

समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलें  पसायदान असे आहे 

“कल्याण करी देवराया। जनहित विवरी ।। तळमळ तळमळ होत चि आहे। हे जन हाति धरी ।। 

संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

संत ज्ञानदेवांचे पसायदान हा आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण यात अनेक ठिकाणी

व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि परमार्थाच्या हिताची व्यवस्था बघितलेली आहे. 

अर्थात आपल्या खऱ्या हिताचे काय हे सहसा कोणाला कळत नाही. 

पसायदानात आपल्या खऱ्या हिताचे काय ते ठासून भरलेले आहे. फक्त प्रत्येकाने त्याचे यथार्थ चिंतन करून 

त्या दिशेने वाटचाल करणे मात्र महत्त्वाचे आहे. असे केले तर पसायदानात संत ज्ञानदेव नेमके जेथे घेऊन 

जाऊ पाहतात तेथे आपण जाऊ शकू. कोणत्याही क्षेत्रांत प्रवेश करताना पूर्वतयारी लागते.
 
ज्ञानेश्वरीत ही पूर्वतयारी सांगितलेली आहे –

एथ अविद्यानाशु हें स्थळ । मोक्षोपादान फळ ।
या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ (ज्ञाने. १८.१२४३). 

गीतेचा विषय व प्रयोजन :  गीतेत अविद्येचा निरास करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल

(प्रयोजन) आहे.  अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. 

पसायदानाकडे त्याची अपेक्षित व्यापकता लक्षात घेऊन बघितले तरच त्याचे खरे महत्त्व पटेल. 

पसायदान केवळ शिष्याने गुरूंकडे म्हणजे संत ज्ञानदेवांनी संत निवृत्तिनाथांकडे मागितलेले नसून
 
संत हे ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ॥ (तु.गाथा. ११४०)
 
असे असल्याने तुमच्या आमच्या हितासाठी, तुमच्या आमच्या कडून काही मागणे मागितले आहे हे लक्षात

घ्यायला हवे. हे लक्षात घेतले तरच आपली जबाबदारी कळेल. पसायदान लिहून आज 700 plus वर्षे झाली परंतु

प्रत्यक्षात खळांची व्यंकटी सांडो । (ज्ञाने. १८.१७९४) असे संत ज्ञानदेव म्हणत असले तरी
 
ती खळांची व्यंकटी म्हणजे दुष्टांची तिरकस चाल गेलेली नाही. 

येथे साधक म्हणून माझ्या हिताच्या दृष्टीने माझ्यापुरता विचार करून माझ्यातील खलत्वाचे अंश

हुडकून ते काढून टाकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. 

इतरांतील खलत्व शोधत बसणे खऱ्या परमार्थात अपेक्षित नाही. माझ्यातील खलत्व काढून

टाकण्यापुरताच विचार करावा. 

व्यंकटी म्हणजे बोलण्याचा, विचारांचा तिरकसपणा आणि असे तिरकस वागणे, बोलणे, स्वार्थाने,

मोहाने होते.  ते प्रत्येकाने टाकावे असे मागणे संत ज्ञानदेव मागतात. आश्चर्य म्हणजे संत ज्ञानदेवांनी

स्वतःसाठी काहीही मागितले नाही तर जो समाज त्यांच्यासाठी काहीही करायला तयार नव्हता

त्याच्यासाठी मागितले; यावरून त्यांच्या विचारांच्या, मन:स्थितीच्या उत्तुंगतेची कल्पना सहज येते. 

आपल्या सारखे दुःख दुसऱ्याला न व्हावे यासाठी केलेला ज्ञान शुद्ध प्रयत्न म्हणजे अध्यात्म जगणे. 

संत अध्यात्म जगतात , परमार्थ साधतात, आणि  कसे करावे ते सोपे पणाने आपल्याला सांगतात. 



विजय रा . जोशी. 











 पाठ :  १ / ११ / २०२३. 


आढावा,  ओव्या १ ते ६ , चिंतन ओव्या ७ व ८. 




ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला आहे. त्यांनी या या यज्ञाने संतुष्ट होऊन

आपणास पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना ! 

आपण संत संगतीचे महत्व जाणून घेतले. संतसंगती, सद्गुरू उपदेश पालन 

या सर्वांनी काय लाभ होऊ शकतो यावर काही चिंतन केले. अशा संत सज्जनांची मांदियाळी

निर्माण होवो आणि त्यांच्याकडून सर्व भूतमात्रांचे कल्याण घडेल , ते घडो अशी माऊलींची अपेक्षा

देखील व्यक्त झाली हे आपण पाहिले. (ओवी ४)  

अर्थात हे घडण्या अगोदर प्रत्येक मानवाने स्वतःत सुधारणा होण्यासाठी, आपापले खलत्व कमी करून

अंतरी सदभाव निर्माण होण्यासाठी काय करायचे आणि अशा सद्भाव असलेल्या लोकांची मैत्री होऊन

परस्पर कल्याणासाठी काय करायचे याचा विचार झाला. (ओवी २) 

अशा वर्तन क्रान्तितून मानवाच्या मनातील दुरिताचा अंधकार दूर होऊन सर्व विश्वातील मानवता

स्वधर्म , स्वकर्तव्य पालनाच्या ज्ञान प्रकाशाने उजळून गेल्यावर विश्वातील सर्व भूतमात्रांचे कल्याण

घडो आणि ज्याला ज्याची वांछ्या असेल ते ते त्यास प्राप्त होवो, मिळो , मिळेल असा आशीर्वाद

माउलींच्या अंतरंगातून व्यक्त झाला आहे. हा  (ओवीं ३,मधील) आशय आपण विस्ताराने पहिला,

त्याचा अभ्यास केला. 

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

कल्पतरू आणि चिंतामणी यांपेक्षाही संतांच्या ठायी अधिक गुण आहेत. संत ज्या साधनाने

हे सर्व अलौकिक प्राप्त करून देतात ते साधन म्हणजे त्यांची अलौकिक वाणी. म्ह्णून श्रीज्ञानदेव 

पुढे संतांच्या मांदियाळीच वर्णन ‘अमृताचे बोलते सागर’ असे करतात. 

कल्पतरू आणि चिंतामणी हे मनोकामना पूर्ण करतील व अमृत मृत्यूचे भय घालविल; पण मनाला

शांती प्राप्त करून देतील असे नाही. शीतलता आणि शांती देणाऱ्या चंद्रासारखे संत आहेत असे

ज्ञानदेव म्हणतात. (चंद्रमे जे अलांछन) पण त्या चंद्राला डाग आहेत, लांच्छन आहे, पण आमचे

संत मात्र अलांछन चंद्र आहेत. 

ते म्हणतात - चन्द्राच्या शीतल प्रकाशाची गोडी ही राजाला आणि

रंकाला जशी सारखीच  प्राप्त होते त्या प्रमाणे सर्व भूतमात्रांबाबत संताची समता असते. 

संत हे सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यात सामर्थ्यशाली आहेत. पण सर्व सामर्थ्या मध्ये

इतरांना तापदायक होण्याचा एक दुर्गुण निर्माण होत असतो. जसा उष्णकाळात मध्यान्हीचा सूर्य 

हा तापदायक असतो. हा कमीपणा संतांमध्ये नसतो. म्हणून ते तापहीन मार्तंड (सूर्य) आहेत. 

स्वतःच्या ज्ञानाने, आचरणाने शुद्ध , निर्मल असणारे, इतरांचे जीवन उज्वलीत  करण्याचे सामर्थ्य

असणारे पण इतरांना कधीही तापदायक न होणारे असे हे सुजाण सर्वांना सोयरे म्हणजे अत्यंत

जवळचे होवोत, वाटोत . 

माउलींच्या प्रसादरूपी विचारांचा आशय आपण पहिल्या ६ ओव्यांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. 

आणि त्याचा आपल्या जीवनात लाभ होण्यासाठी काय करणे शक्य आहे यावर काही चिंतन देखील

केले. 

आजच्या पाठात ओव्या ७ आणि ८ समजून घेण्याचा प्रयत्न, अभ्यास आपण करणार आहोत. 



विजय रा. जोशी. 












पसायदान महात्म्य. 

 
पसायदान म्हणजे लघु ज्ञानेश्वरीच होय. त्यात ज्ञानेश्वरी प्रमाणे काव्य आहे , तत्त्वज्ञान आहे. 
कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मार्ग आहेत. 




खलांच्या द्वारे आसुरी संपत्ती आणि ईश्वरनिष्ठ सज्जनांच्या द्वारे दैवी संपत्तीचे निर्देश आहे.
खलांच्या रूपाने तमाचा, स्वधर्माच्या द्वारे इच्छित फळ प्राप्त करून घेणाऱ्या लोकांच्या रूपाने रजाचा
आणि सज्जनांच्या द्वारे सत्वाचा असा त्रिगुणांचा विचार आहे. 
त्यात ज्ञानदेवांना प्रिय असणारे संत-स्तवन आहे, सद्गुरुंशी संवाद आहे, 
हा होईल दान पसावो’ या वरदानाने गुरुकृपेचा अनुभव व्यक्त झाला आहे. त्यात ‘विश्वेशरावो’ रूपाने
विश्वरूपदर्शन आहे. ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ या द्वारे जो मनुष्य देवरूप, आत्मरूप 
होतो तोच सुखस्वरूप होतो हा ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष सांगितला आहे. 
म्हणजे ज्ञानेश्वरीची सर्व महत्वाची अंगे पसायदानात उतरली आहेत. त्यामुळे पसायदानाचा पाठ हा
सर्व भाव लक्षात घेऊन केला तर ज्ञानेश्वरीच्या पाठाचेच फळ त्याला आहे.  
पसायदान हा मंत्र आहे. 
पसायदान हे दिव्य प्रार्थनासुक्त आहे. 
पसायदान हा सर्व तत्व-विचारांचा एक संपूर्ण ग्रंथ आहे. 
किंबहुना पसायदान म्हणजे अपार कृपेने भरलेलं श्रीज्ञानेश्वरमाऊलींचे अक्षर रूपच आहे. 
आपल्या कल्याणासाठी त्या त्यांच्या वांग्मय रुपाला शरण जावे आणि जसे ओंकार रूप असलेल्या
परब्रह्माला ओंकारानेच आळवावे,     
म्हणावे -
आता विश्वात्मके देवे I येणे वाग्यज्ञे तोषावें I 
तोषोनि मज द्यावे I पसायदान हें II 



विजय रा, जोशी 













Tuesday, September 5, 2023

   N. P. 00 /11                                                                           


नर्मदा परिक्रमा २४ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३. 

विजय रा. जोशी. 


भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. निसर्गा बद्दल  पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा भारतीय भूमीत चालत आलेली आहे. कृतज्ञता आणि सदभाव  व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !



नर्मदा परिक्रमा: नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.


हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवी अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस, २१ दिवसांत पूर्ण करतात.



नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० कि.मी. आहे . सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा.


नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.


भरतखण्डात नर्मदेपेक्षाही आकार विस्तार नि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व नि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते !


नर्मदा-परिक्रमेचे प्रवर्तक श्रीमार्कण्डेय मुनी ! त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर  येऊन मिळणाऱ्या ९९९ नद्यांच्या धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केलं. अशा पूर्णत: शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना २७ वर्षे लागली !


नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करणे हे पूर्वी फार खडतर तसेच धोक्याचे असे. पण बदलत्या सामाजिक,आर्थिक परिस्थितीने हे आत एवढे अवघड राहिले नाही. तसेच येथील मार्गदेखील पूर्वी सारखे दुर्गम राहिले नाहीत. 


नर्मदा-परिक्रमा कोणत्या वयात करावी ? कुणी म्हणतील, नर्मदा-परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेव्हा म्हणजे उत्तर आयुष्यात - वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन, निर्मलीकरण, सबलीकरण साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे ब्रह्माचर्याश्रम आणि  गृहस्थाश्रम ह्या दरम्यानचाच आहे. कारण ह्या कालावधीत जर प्रत्येकानं आपापल्या मनाचं उन्नयन/सबलीकरण निर्मलीकरण साधलं (सांगायला जरी हे ठीक असलं तरी ते सोपं निश्चितच नाही!) तर ते त्या व्यक्तीच्या पर्यायानं समाजाच्या स्वास्थ्याला उपकारकच असणार आहे. अर्थात चांगलं कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहीच हरकत नाही. 


नर्मदा-परिक्रमा कशी करावी ? ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अशांनी अगदी दोन - तीन आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे नर्मदा-परिक्रमा केली तरीसुद्धा चालेल. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नि श्रद्धेनं करणं अगत्याचं आहे.


त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे ! नर्मदे हर !!

                                                                             


नर्मदा परिक्रमा २४ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३. 

विजय रा. जोशी. 


भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. निसर्गा बद्दल  पूज्यभावना कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा भारतीय भूमीत चालत आलेली आहे. कृतज्ञता आणि सदभाव  व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा, पद्धती आणि रितीभाती आहेत. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पृथ्वीतलावरची एकमेवाद्वितीय परंपरा आहे. नर्मदा परिक्रमेची !



नर्मदा परिक्रमा: नर्मदेच्या काठाकाठाने केलेली प्रदक्षिणा म्हणजेच नर्मदा परिक्रमा. ही एक धार्मिक यात्रा आहे, जी पायी पूर्ण करावयाची असते . ही यात्रा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीयांना अंतर्मुख होण्यापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. ही परिक्रमा म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक तप आहे.


हि परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवी अनुभूती फक्त पायी परीक्रमेतच मिळू शकतात. परंतु आताच्या काळात ज्यांना शरीर अस्वास्थ्यामुळे अथवा वेळे अभावी पायी परिक्रमा करणे शक्य नसते असे लोक हि यात्रा बसने अथवा स्वतःच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने देखील १५ दिवस, २१ दिवसांत पूर्ण करतात.



नर्मदा परिक्रमा ही मोठी परिक्रमा आहे. श्री काशी क्षेत्राची पंचकोस परिक्रमा, तर अयोध्या - मथुरा यांची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा, नैमिषारण्य - जनकपुरी परिक्रमा या सर्वाहून मोठी परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीची परिक्रमा, जी जवळजवळ ३,५०० कि.मी. आहे . सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा होते. नदी जशी वाहते तशी तिच्या काठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा.


नर्मदा मैया मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो. सातपुडय़ाच्या अमरकंटक या छोटय़ाशा गावातून निघून बराच मोठा प्रवास करून ती अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जाते. नर्मदेचे धार्मिक महत्त्वही खूप मोठे आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते. हिच्या महिमेचे वर्णन चारही वेदांत आहे.


भरतखण्डात नर्मदेपेक्षाही आकार विस्तार नि लांबीत अन्य मोठ्या नद्या असल्या तरी त्यांचं आकारमान आणि विस्ताराच्या मोजमापांपेक्षा नर्मदेचं प्राचीनत्व नि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व अशा वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते !


नर्मदा-परिक्रमेचे प्रवर्तक श्रीमार्कण्डेय मुनी ! त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर  येऊन मिळणाऱ्या ९९९ नद्यांच्या धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केलं. अशा पूर्णत: शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना २७ वर्षे लागली !


नर्मदेच्या दक्षिण तटावरील राजघाट ते अंकलेश्र्वर दरम्यानच्या दीडशे किलोमीटर टापूतील शूलपाणीची तसेच उत्तरतटावरील गरुडेश्वर ते धर्मराय कोटेश्वर दरम्यानची जंगल-झाडीची वाट नर्मदेच्या तटानंच पार करणे हे पूर्वी फार खडतर तसेच धोक्याचे असे. पण बदलत्या सामाजिक,आर्थिक परिस्थितीने हे आत एवढे अवघड राहिले नाही. तसेच येथील मार्गदेखील पूर्वी सारखे दुर्गम राहिले नाहीत. 


नर्मदा-परिक्रमा कोणत्या वयात करावी ? कुणी म्हणतील, नर्मदा-परिक्रमा ही जेव्हा रिकामपण येतं तेव्हा म्हणजे उत्तर आयुष्यात - वानप्रस्थाश्रमाची वाटचाल आहे. खरं तर मानवी मनाचं उन्नयन, निर्मलीकरण, सबलीकरण साधण्याचा मानवी जीवनातील आदर्श कालखंड म्हणजे ब्रह्माचर्याश्रम आणि  गृहस्थाश्रम ह्या दरम्यानचाच आहे. कारण ह्या कालावधीत जर प्रत्येकानं आपापल्या मनाचं उन्नयन/सबलीकरण निर्मलीकरण साधलं (सांगायला जरी हे ठीक असलं तरी ते सोपं निश्चितच नाही!) तर ते त्या व्यक्तीच्या पर्यायानं समाजाच्या स्वास्थ्याला उपकारकच असणार आहे. अर्थात चांगलं कृत्य करायला कधीच उशीर झालेला नसतो. त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहीच हरकत नाही. 


नर्मदा-परिक्रमा कशी करावी ? ज्यांना शारीरिकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अशांनी अगदी दोन - तीन आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे नर्मदा-परिक्रमा केली तरीसुद्धा चालेल. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नि श्रद्धेनं करणं अगत्याचं आहे.


त्वदीयपाद पंकजं नमामी देवी नर्मदे ! नर्मदे हर !!


                                                                                  


 N . P. 00 / 11                                                                                 पुढे … 


Thursday, August 31, 2023

N. P. O1 / 11.

 परिक्रमा वर्णन  २४ फेब्रुवारी २०२३ . 


मी पनवेल येथे राहतो. २४ फेब्रुवारी पहाटे ६ वाजता परिक्रमेची बस दादरहून सुटणार होती. म्हणून काल सायंकाळी ५ वाजता घरून एस टी  बसने निघालो. साडे सहा सुमारास दादर चित्रा सिनेमा बस स्टॉपवर उतरलो. तेथून प्रतीमकडे (पुतणी)  जाण्यासाठी खूप प्रयत्न करून टॅक्सी न मिळाल्याने दादर वेस्ट ला चालत घरी पोहोचलो. प्रतीम ने उत्तम पाहुणचार केला. लवकर उठून स्नान करून तयार झाल्यावर, सकाळी सव्वा पाचला रघुने (जावई) प्रभू ट्रॅव्हल्सच्या  बसवर सोडले.






सहाला बस निघाली. वाटेत लोकांना pick-up करीत पुढे नाश्ता वगैरे झाल्यावर धुळ्याच्या अलीकडे ७० km वर जेवण घेतले. चारच्या सुमारास धुळे हॉटेल कान्हा रिजनसी ल पोहोचलो. चहा, थोडा आराम करून धुळ्याजवल असलेल्या स्वयंभू एकवीरा देवीचे दर्शन व आरती करून आता परत हॉटेलवर जात आहोत. जेवण व झोप.



रोज सकाळी सर्व आवरून सकाळी समानासह बसकडे यायचे आणि सहा वाजता प्रवास सुरू करायचा, असा रोजचा कार्यक्रम असेल. उद्या ओंकारेश्वर दर्शन, स्नान आणि परिक्रमा संकल्प पूजा असा कार्यक्रम आहे. ओंकारेश्वर ला दुपारी १२ वाजेतो पोहोचू.  ओम नर्मदे हर!!


२५ फेब्रुवारी


सकाळी सहाला बस सुटली. सुमारे एक वाजता ओंकारेश्वर पासून १२ कि.मी वर  बंधन रिसॉर्ट, मोरटक्का येथे  आली. सामान उतरवून रूममधे जायला बराच वेळ लागला. आमची रूम लॉक लागत नसल्याने बदलावी लागली. 



जेवण होऊन ममलेश्र्वर मंदिराकडे निघायला तीन वाजून गेले. मंदिर जवळच होते, सुमारे चारला पोहोचलो. 


नर्मदेच्या अलीकडे ममलेश्र्वरआणि पलीकडील तीरावर ओंकारेश्वर  असे मिळून हे एक ज्योतिर्लिंग आहे. पूर्वी पावसाळ्यात चार महिने ओंकारेश्वर मंदिर पाण्याखाली जात असे. म्हणून ममलेश्र्वरची पूजा होत असे. अजून ती प्रथा कायम आहे. येथे घाटावर प्रथम सर्व जणांनी स्नान केले.


पात्रात पाणी कमी होते तरी वाहत्या जलात स्नान झालं. छान वाटल. गर्दी बऱ्यापैकी होती. मंदिराजवळील घाटावर बसून सर्वांनी एकत्र यात्रेचा संकल्प पूजा, होम, आरती केली. यात्रा प्रारंभ झाला. नर्मदा जल एका कलशात भरून घेतले. हा कलश यात्रा समाप्ती पर्येंत जवळ ठेवायचा असतो.



 



नंतर, प्रत्यक्ष नर्मदेत जाऊन हळद, कुंकू पूजा आणि दीपदान केले. नंतर ममलेश्र्वर दर्शन झाले. त्या मंदिराच्या रांगेत पायी परिक्रमा पूर्ण झालेले काही यात्रेकरू भेटले. यात्रा पूर्तीचे समाधान त्यांच्या थकलेल्या कायेवर स्पष्ट दिसत होते. तिथे शेजारीच गजानन महाराज उत्कृष्ठ मंदिर आहे. दर्शन घेऊन रात्री रूमवर यायला आठ वाजले.


रोज तीन पाने "ओम नर्मदे हर" असा जप लिहिण्यासाठी प्रभू ट्रॅव्हल ने स्पेशल वही, पेन दिले आहे.नर्मदा अश्टकम चा प्रिंट आउट देखील दिला आहे.

उद्या राजघाट, जैन मंदिर वगैरे गोष्टी करून मुक्कामी शहादा येथे जायचे आहे. रोजचा दिनक्रम जरा हेक्टिक आहे. पण ठीक आहे. 


ओम नर्मदे हर!!


२६ फेब्रुवारी.


आज सकाळी नेहमीप्रमाणे निघालो.आज  नाश्ता skip केला.

११ च्या  सुमारास राजघाटला  पोहोचलो. तिथे नर्मदा पूजा आणि दीपदान केले. माझे ४२ वर्षीय निवास साथी , श्री शेखर जोशी, हे एक उत्तम पुरोहित आहेत. अनेक स्तोत्र, मंत्र पाठ आहेत. काही विशिष्ठ साधना करतात. 

स्टेज आर्टिस्ट आहेत. सहा भाषा येतात. शेखरचे  पूजाविधी साठी  मार्गदर्शन घेतो.



येथे काही लहान मुले, मुली होत्या त्यांना आणलेली तयार खाऊ पाकिटे वाटली. येथे एकमुखी दत्त मंदिर आहे, पण ते पाण्याखाली गेले आहे असे सांगितले. 


नंतर तेथून पुढे बावन्न डोंगरात वसलेल्या जैन तीर्थक्षेत्री आलो. मार्गी जंगली प्रदेश आहे. पण उजाड आहे. पूर्वी या भागात काही स्थानिक लोकांची यात्रेकरूंना भीती वाटे.आता ती स्थिती नाही. 

जैन मंदिर परिसर प्रशस्त आहे. संपन्न आहे. मंदिर जुने आहे. येथे डोंगरात कोरलेली ८४ फुटी दिगंबर महावीर मूर्ती आहे.


 


येथे यात्रेकरू दिसल्यावर परिसरातील गरीब मुले जमतात.. त्यांना जरी मदत हवी असली तरी ते आपल्याकडे काही मागणी करत नाहीत. त्यांना आम्ही सर्वांनी खाऊ वाटप केले


आजपासून प्रवास सुरू होताना सकाळी गणपती, देवी, शंकराची आरती, नर्मदा आरती, दत्त आरती, नर्मदाश्टकं वगैरे स्तोत्रपाठ म्हणणे सुरू झाले. या व्यतिरिक्त भगिनी सहप्रवासी विष्णू सहस्त्रनाम अथर्वशीर्ष, श्रीसुक्त आणि त्यांच्या गुरू पंथाची स्तोत्रे अधिकीची देखील म्हणतात.


देसाई पती, पत्नी, आणि वडील देसाई , (प्रभंजन,-प्रभू, रागिणी आणि पप्पा), असे तीन जण यात्रा आयोजक आहेत. अनेक नर्मदा परिक्रमांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे. ते सर्व जण वातावरण हलके, फुलके ठेवण्या बरोबर यात्रा आणि स्थळमहत्व वगैरे सांगतात. 


जेवण, नाश्ता, चहा, कॉफी व्यवस्था चांगली आहे. जेवण घरगुती वाटावे असे आहे. रोज बस प्रवासात काही गाणी एखादा चित्रपट असतो. आज सावरकर पुण्यतिथी निमित्त वीर सावरकर चित्रपट होता. वडील, पप्पा देसाई वेगवेगळे किस्से सांगतात. १५ दिवसात साधारण ४५०० किलो मीटर्स (मुंबई - परिक्रमा - मुंबई)  प्रवास आहे. म्हणजे  रोज भरपूर वेळ प्रवास असतो. प्रवास पूर्ण दिवसात असतो. रात्री नाही. 


26/02, आज सायंकाळी ६ च्या  सुमारास शेर ए पंजाब हॉटेलवर आलो. मुक्काम शहादा येथे आहे. हा गाव महाराष्ट्रात आहे. उद्या गुजरातेत जाऊ. नारेश्वर ला जाऊ. रंग अवधूत आश्रम आहे. 




N. P. 1/11                                                                           पुढे 


   

 N. P. 02/11        २७ फेब्रुवारी.



बसण्याच्या सोयीत समानता असावी म्ह्णून रोज बसमधील

आपली सीट बदलण्याची  रोटेशन सिस्टम आहे. 


ट्रीप मधे अमेरिका Canacticut येथील एक ज्येष्ठ जोडपे आहे. श्री कांबळी वय ८५ आणि त्यांची पत्नी.हे ट्रीप संचालक यांचे विशेष स्नेही, अतिथी आहेत.  त्यांच्या ज्येष्ठत्वाचा  मान म्हणून सर्वांनी त्यांना seat rotation मधून सवलत दिली आहे. बाकी सर्वांच्या बस मधील जागा (seats)  रोटेशन पद्धतीने बदलतात. बसमधे सर्वांना सारखी सोय, गैरसोय व्हावी यासाठी रोज एक रांग पुढे शिफ्ट व्हायचे.सर्वात पुढील सीट वरील लोकांनी सर्वात मागच्या रांगेत जायचे, अशी ही रोटेशन सिस्टीम आहे. देसाई जोडपे उजवीकडील पहिल्या रांगेत स्थिर रहातील. ही व्यवस्था आयोजकांनी सुचविली, सर्वांनी मान्य केली.

सौ कांबळी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळात  मध्ये  सोशल वर्क करतात. 




आज २८ फेब्रुवारी, नेहमी प्रमाणे बस ६ला निघाली . प्रवास थेट शहादा ते भडोच,  जेथे नर्मदा समुद्रास मिळते तेथ पर्येत होता. वाटेत नेहमी प्रमाणे नाश्ता, चहा आणि एक नंबर साठी stops झाले. By the way, हा स्टॉप या परिक्रमेत नेहमीच आणि विशेषतः मध्य प्रदेशातून जातांना,

निसर्ग सानिध्यात under the sky roof असतो.


वाटेत संकलेश्वर हे शहर लागते. येथे प्रसिध्द खमण ढोकळा व बाटी डाल  सर्वांना देण्यात आली.

पुढे भडोच नंतर नर्मदा समुद्रास मिळते, तेथे खाडीवर एक ब्रीज आहे. तेथे बसमधून आम्ही नदी पार करून उत्तर तटावर आलो. तेथे श्री नीलकंठेश्र्वर शिव मंदिर आहे. तेथे देवदर्शन झाले.



मंदिराच्या मागील घाटावर जाऊन नर्मदा पूजा केली. दीपदान झाले. नर्मदेची प्रार्थना केली.

काही यथा योग्य दान धर्म, कुमारिका सन्मान  वगैरे केले. 

सर्वसाधारण प्रथे प्रमाणे, नर्मदा परिक्रमी सोबत नर्मदेचे पाणी बाटलीत बरोबर घेऊन प्रवास करतात. प्रभू ट्रॅव्हल्स त्या ऐवजी वेगळी व्यवस्था  करतात. ममलेश्वर घाटी सर्वांनी मिळून एक कलश भरून घेतला, त्याची पूजा केली

आणि नंतर त्या कलशाची बसमधे प्रवेश करताना समोर येईल अशी स्थापना केली. रोज बसमधे प्रवेश करताना सकाळी या कलशाची सर्व प्रार्थना करतात. आज या कलशातील थोडे पाणी बदलून निळकंठेशवर घाटावरील थोडे नर्मदेचे पाणी भरून घेतले. परत बस प्रवेश स्थानी कलशाची स्थापना केली. असा क्रम पुढे सुरु ठेवला. नर्मदेच्या काठी

पुढील प्रत्येक ठिकाणी या कलशातील थोडे पाणी कमी करून नवीन पाणी भरण्याचा उपक्रम आणि रोजचे दर्शन हे यात्रा सांगते पर्येत करायचे असते. आता रंग अवधूत स्वामी यांच्या नारेश्वर आश्रमाकडे  प्रवास आहे.




कोकणात जन्म घेतलेले स्वामी रंग अवधूत सत्य दर्शनाच्या अध्यात्मिक ओढीने साधनेसाठी भ्रमंती करत नर्मदेच्या किनाऱ्यावर पोहोचले, परिक्रमेत चातुर्मास मुक्कामासाठी निर्जन अशा नारेश्वर  येथे कुटी उभारून राहिले, ते स्थान आजमितीस  गुजरात नव्हे तर सर्व मानवतेला एक सात्विक वर्तनाचा

संदेश देता आहे. 


स्वामीजींच्या. अधिक माहिती साठी पुढील लिंक पहावी :


http://www.dattamaharaj.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A4


आम्ही स्वामींच्या आश्रमात पोहोचलो.

मंदिरात दर्शन घेऊन काही मिनिटे डोळे बंद करून  विचारशून्य होण्याचा अभ्यास केला.

काही काळ खूप शांत वाटले. स्वतःसाठी स्वतःशी परीक्षणार्थ संवाद झाला. पुढील जीवन कसे असावे यावर थोडे चिंतन

चित्तात काही क्षण स्थिरावले. 

 "ज्या मार्गात आहेस त्या मार्गाने प्रगती कर” असा संदेश  अंतर्मनात उमटला. 

समाधान वाटले. 


परिसरात फेरी मारूनआश्रमाच्या वातावरणातील शांती अनुभवली. कार्यालयात ऐच्छिक देणगी दिली. येथल्या पुस्तक भंडारातून दत्त बावनी, अत्तर, विभूती, अष्टगंध घेतले. आणि हे पुण्यस्थळ पुढील प्रवासासाठी सोडले. 


येथून पुढे जेथे जेथे अशा सन्यासी, लोक कल्याणकारी, विभुतींच्या पुण्य स्थळांना भेटी झाल्या, येथे बहुदा  सर्वत्र मला स्वामीजींची, (स्वामी विज्ञानानंद, मनशक्तिकेंद्र, संस्थापक), महाशून्य बिंदुची आणि त्यांनी दिलेल्या सेवा संदेशाची आठवण प्रकर्षाने झाली, आजपर्येंत  मार्गात आपण स्थिर असल्याचे, राहिल्याचे समाधानही वाटले. या मार्गी प्रगती होण्याची

आणि सर्व कल्याणाची मागणी मनात उमटली. एक वेगळ्याच शांत अनुभूतीचा शब्दात व्यक्त न होणारा अनुभव, प्रत्यय आला.


भडोचला दिशा बदलली. दक्षिण किनाऱ्यावरून आता उत्तर किनाऱ्यावर आलो. या दिशेने  नर्मदा मय्या परिक्रमा सुरू आहे. 


येथील सुरवातीचा परिसर तरी अधिक समृद्ध, सुपीक आणि हिरवागार वाटतो. आता केवडिया कडे जात आहोत.

या परिक्रमेत जसा विविध पिकांनी समृद्ध असा विशाल शेतीचा परिसर लागतो,

तसाच डोंगराळ पण उजाड (दक्षिण किनारा, शूल पाणी पर्वत भाग)) तर डोंगराळ पण गर्द  झाडीने भरलेला आरण्याचा भाग देखील लागतो. नर्मदेचे पात्र कुठे अतिकृश तर कोठे विशाल

आणि विस्तीर्ण पाहायला मिळते. 


आता पुढील मुक्काम. ,केवदिया जवळ एक AC Tent camp, युनिटी रिसॉर्ट आहे. आज तिथे रहायची सोय आहे, जरा वेगळा अनुभव आहे. टेन्टच्या  बाहेर व्हरांड्यात बसायला आरामखुर्ची ठेवली आहे. इथून नर्मदा dam जवळ आहे. सरदार वल्लभभाई पटेल statue, आहे. Statue Of Unity.

हा नर्मदा जिल्हा आहे.




                                                                  


AC Tent मधील मुक्काम  जरा वेगळा वाटला. प्रवेश द्वाराने आत आलो. कडेला चारी बाजूस Tents आणि मधे मोठे मैदान आहे. 


सायंकाळी उशिरा पोहोचलो होतो.  गेल्यानंतर थोडा आराम केल्यावर, निवासी स्थिरस्थावर झाल्यावर,  काही सहप्रवासी  यात्रिक आपापल्या ग्रुपमधे जमले. गप्पा, गाणी, भेंड्या फिरणे असा कार्यक्रम करायला लोकांना फुरसत मिळाली. वातावरणात गुलाबी थंडी होती. हलका वारा होता. आकाश निरभ्र होते. क्षितिजावर स्पष्टपणे गुरू आणि शुक्र जवळ प्रकाशित झालेले  होते. शुक्र अधिक मोठा आणि प्रकाशमान दिसत होता तर गुरू थोडा तांबूस पण आकाराने लहान होता.


मंडळींनी कॅम्प फायर पेटविला. प्रभंजननने  सर्वांना एकत्र क्रेले.जेवण तयार होत होते. मग त्याने त्याच्या गत वर्षांतील यात्रेच्या दरम्यान भेटलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आणि वल्ली चे अनुभव सांगितले. त्यातील काही विशेष वाटले. पण एकंदर सांगण्याची पद्धत एकसुरी आणि अनाकर्षक वाटली. Tent मधे विश्रांती झाली.


आपल्या शेजारील असलेल्या  tent मधील आवाज येत स्पष्ट  होते. दिवसभर दमल्याने सर्व लगेचच झोपले. परिसर शांत , निवांत झाला. 


दुसऱ्या दिवशी, २८ Feb 


सकाळी सहाला निघालो.

गरुडेश्र्वर तेथील दत्त मंदिर, टेंबे स्वामी समाधी यांना भेट दिली. दर्शन घेतले, प्रार्थना केली.



प्रखर भक्ती आणि समर्पित साधना असलेल्या या पुण्यभूमी मधे, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या टेंबे स्वामी  यांनी चातुर्मास केला. चातुर्मास केला म्हणजे काय ? 


त्यावेळी पायी परिक्रमा दीर्घकाळ चालणारी असे . पाऊस सुरु झाल्यावर पावसाळ्यात ती चालू ठेवणे शक्य नसे. याच दरम्यान  विशेष नियम, उपवास आणि व्रत पालनाचा चातुर्मास येतो. सर्व यात्रिक या काळात, परिक्रमा बंद ठेवून यात्रेकरूंना एकाच ठिकाणी रहावे लागते. 


अशा वेळी आपल्या यात्रेत, त्या काळी  निर्जन असलेल्या ठिकाणी, नर्मदा तीरावर  असलेल्या जागेत एक कुटी उभारून टेंबे स्वामी  राहिले. पुढे त्यांना  ही जागा आवडली. त्यांच्या साधनेसाठी, निवासासाठी  त्यांनी ती नक्की केली. आणि आज ते हजारो श्रध्दाळू लोकांचे  श्रध्दास्थान झाले  आहे. 

स्वामीजींच्या अधिक माहितीसाठी लिंक  (टेम्बेस्वामी)  


http://www.dattamaharaj.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80


बस थांबण्याचे ठिकाण थोडे दूर आहे. तेथे भल्या पहाटे उतरलो. गावातून पाय वाटेने ग्रामीण परिसरात असलेल्या मंदिरात पोहोचलो. प्रातःपूजा सुरु होती. सर्वांनी या मंदिरात दर्शन घेतले, ध्यान प्रार्थना केली. आणि मग मय्याच्या घाटावर गेलो. वाटेत पायी प्रदक्षिणा करणारे यात्रेकरू भेटले. त्यांना दक्षिण देऊन वंदन करून थोडेसे बोलून पुढे आलो. 



आश्रमाच्या मागे  बंधाऱ्यावरून खळाळत वहात असलेली नर्मदा आहे. सकाळच्या वेळी सूर्योदयाच्या सुमारास थंड वाऱ्याच्या हलक्या झुळूकेमूळे खूप प्रसन्न वाटतं होते. सर्वांनी नर्मदाष्टकम एकत्रित म्हंटले आणि पुढे केवडीया, जिल्हा नर्मदा,  प्रवास सुरू झाला. केवडियाला नर्मदा dam आणि त्यावर असलेला सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. त्या परिसरात सकाळी ७ ४५ सुमारास पोहोचलो.


Statue of Unity . 

.

Unity statue ही जागा आणि पर्यटन स्थळ पूर्ण अंतर राष्ट्रीय दर्जाचं केलेले आहे. रेल्वे स्टेशन, तिकीट घर, पार्किंग, हॉटेल, फूड place  Caffeteria, स्वच्छता, elevators, moving paths, campus, buses सर्व, सर्वच उत्कृष्ठ दर्जाचे ठेवले आहे.


त्या  सर्व परिसरामधे statue व्यतिरिक्त पर्यटकांसाठी अन्य अनेक activities ,  attractions आहेत.

प्रवेशाचे तिकीट फक्त डिजिटल पद्धतीने मिळते. कॅश चालत नाही.

पार्किंग जवळ तिकीट घर आहे. तिथे सकाळी ८ वाजता तिकीट घेतले . रुपये १५०/ तिकीट, त्यात statue च्या पाया पर्येंत जाऊ शकता. पण statue मध्ये  असलेल्या viewings gallery मधे जाता येत नाही.



८५० रुपये तिकिटावर तिथे जाता येते. सायंकाळी असलेला लेझर शो पण include असतो. आम्हाला वेळ जास्त नव्हता. म्हणून १५० चे तिकीट घेतले.


स्टॅच्यू ऑफ युनिटी , हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. हा पुतळा भारताततील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे.

 


स्मारक २०,००० चौरस मीटर क्षेत्रात आहे आणि १२ कि. मी.  आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन ॲन्ड ट्यूब्रो यांच्याशी केला होता. पुतळ्याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८मध्ये पूर्ण झाले.

भारतीय मूर्तिकार राम व्ही. सुतार यांनी ही संरचना (डिझाइन) केली होती. आणि पटेलांच्या जयंतीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले


पुतळ्याची भव्यता जसजसे जवळ जाऊ तशी वाढत जाते. जगातील सर्वात जास्त उंची असलेला हा पुतळा आहे. त्याची भव्यता समजून घ्यायची असेल तर कल्पना करा. अगदी जवळून पाहिले तर त्याच्या पायांच्या अंगठ्याच्या एका नखांचा आकार तीन सुपा एवढा मोठा आहे. 

 

खालच्या लेवलवर मोठे exibition आहे. संबंधित सर्व माहिती तेथे चार्ट, पिक्चर्स, व्हिडिओज इत्यादी माध्यमातून पहायला मिळते. येथील सेक्युरिटी खूप  strict  पण नम्रपणे वागणारी आहे.स्वच्छता, टापटीप वाखाणण्यासारखी आहे. 


एकीकडे पुतळ्याची भव्यता तर चहू बाजूला नर्मदेचे अथांग पाणी आहे.

विंध्य आणि सातपुडा पर्वतांच्या तटांनी सर्व भव्य जलाशय बांधून गेला आहे.

सभोवताली नर्मदेचा अथांग जलाशय,  वर भव्य-अथांग आकाश , थंडगार वारा, प्रसन्न हवा, आपण उभे असलेली भूमी आणि सर्व  परिसराला प्रकाशमय करणारे सूर्य तेज अशा पंच भूतांच्या सानिध्यातील अशा  परिसरात चित्त प्रसन्न झाले.  स्व-देशात उभारलेल्या या मानव निर्मित वैशिष्ठयपूर्ण शिल्पाचे 

आणि त्याच्या व्यवस्थापनाचे एक असाधारण उदाहरण पाहिल्याने मन भरून येते. आपल्या देशाचे हे सर्वात उंच शिल्प आपल्याला अभिमानाचे, आणि उन्नत आत्मविश्वासाचे प्रतीक वाटते. 


नर्मदेचे वाहन, मगरीचे दर्शन. 


पुतळ्याच्या पायाकडून वरील दोन टप्पे करून खालच्या टप्प्यावर आलो. तेथून नदीकडे पाहिले तर किनाऱ्यवर थोडी बाहेर थोडी पाण्यात,  एक मगर पहुडलेली दिसली. मगर हे नर्मदा देवतेचे वाहन आहे असे म्हंटले जाते. या परिक्रमेत मगर दर्शन होणे,  सुलक्षणी मानतात.

आमच्यापैकी अनेकांच्या मोबाईल कॅमेरा मधून हे सुलक्षण टिपले गेले.


तिकीट घरापासून statue  दूर आहे. त्यासाठी जायला, यायला बसची सोय आहे. गुलाबी रंगाच्या ऑटो रिक्षा पण आहेत. या स्पेशल रिक्षा नर्मदा सरोवरामुळे  विस्थापित परिसरातील आदिवासी महिला ड्राईव्ह करतात. त्यांच्या साठी सरकारने त्यांना प्रशिक्षण दिले आहे.


अनेक शाळांचे विद्यार्थी statue दर्शनासाठी आले होते. विद्यार्थींना तिकीट कन्सेशन मधे मिळते. देशी, परदेशी अनेक पर्यटक दिसत होते. Statue ऑफ Unity  दर्शनाच्या अनुभव खूप चांगला होता.



भोजन नंतर चा प्रवास पुढे सुरु झाला. 








N. P. 2/11                                                                           पुढे ...