Tuesday, November 28, 2023

 पसायदान पाठ :  ४/१०/२०२३. 


पसायदान : माउलींचा उद्देश काय आहे ?    माणसाचा क्रम विकास !




अगोदर आपण गीता पाठ केले, मनाचे श्लोक सविस्तर समजून घेतले. आणि आता पसायदानाचा संदेश
 
विस्ताराने पाहात आहोत.  या सर्वांचा उद्देश काय आहे? हे आपले सांगणे, ऐकणे जर आपल्याला
 
सार्थकी  लावायचे  असेल  तर आपण  कोनत्या   दृष्टीने या सर्व गोष्टींकडे पहायला पाहिजे ?

 स्वामीजींनी आपल्याला यज्ञ प्रार्थना दिली. ती अशी :

वयं हवनं करिष्या महे I अस्मात  अती लोभम हर I 

गुणां स्मरामी , त्वाम शरणम अहं प्रपद्ये. I        आत्म ज्ञानायच  त्वाम शरणम अहं प्रपद्ये II 

आम्ही हवन करतो. आमच्या मधील दोष कमी  होवो. आमच्यातील गुण वृद्धिंगत होवो. त्या साठी आम्ही तुला

(अग्नी /प्रकाश देवतेला) शरण येतो.    आत्मज्ञान होवो, त्यासाठी आम्ही तुला शरण येतो. 

आणि या पार्थने नंतर प्रकाश प्रार्थना / ज्योती ध्यान याचा संदेश सविस्तर आहे. 

अखिल मानवतेचा कळवळा, सर्व भूत मात्रांबद्दल जिव्हाळा, सर्व कल्याणाची आस माउलींच्या चित्तात

जी आहे त्ती ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा दिसून येते. त्यासाठी मानवाच्या वर्तनातील बदल  महत्वाचा आहे

हे जन-मानसावर ठसवितांना  सद्गुणांचे पालन करणे आवश्यक आहे त्याचे प्रतिपादन त्यांनी

ज्ञानेश्वरीत अनेकदा केले आहे. 

सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमेश्वराचा महिमा वाढावा, याची ज्ञानदेवांस तळमळ

होती. त्यांनी या गुणांचे वर्णन करतांना आपला सारा अनुभव या ओव्यांत ओतला आहे. मराठी भाषा

बोलणाऱयांवर त्यांचे हे अनंत उपकार आहेत. 

लोकात, समाजात मैत्र निर्माण का होत नाही ?

मनुष्य जेव्हा इतरांना ते आपल्या सुखाचे साधन आहेत अशा दृष्टीने पाहू लागतो तेव्हा त्याची

निराशा होते. माणसा-माणसा मधले फार मोठे दुःख हे इतरांना आपल्या सुखाचे साधन समजल्यामुळे

निर्माण झालेले असते. मग नवीन मॉडेलची मोटार आणि सुंदर दिसणारी बायको यांना एकच दर्जा

प्राप्त होतो. 

अशा मनोवृत्तीमुळे ज्यांना साधन समजले जाते त्यांना आपल्या वासनांसाठी राबवितांना आणि

त्यांच्यावर अन्याय करतांना माणसाला काहीच वाटत नाही. त्यामुळे ज्या व्यक्ती अशा साधन होतात,

त्यांच्या जीवनात दुःख निर्माण होते. आणि साधन समजल्या गेलेल्या व्यक्ती आपल्या सुखाच्या

अपेक्षा पूर्ण करीत नाहीत तेव्हा आपल्या जीवनात देखील  दुःख निर्माण होते. 


लोकांना आपले साधन समजण्याची माणसाची मनोवृत्ती अत्यंत सूक्ष्मपणे कार्य  करीत असते.  लोकांनी आपल्याला

चांगले समजावे, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे, असे त्याला वाटते. त्याचे गुण इतरांच्या लक्षत येऊ नयेत

त्याचे त्याला वाईट वाटते. आणि आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे

मानायला पाहिजे तेवढे ते आपल्यास मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते आणि लोक वाईट, दुष्ट, कृतघ्न

आहेत असा तो निर्णय आपल्या मनाशी घेतो. पण दुसऱ्याचा तो त्यांच्या बाजूने  विचार करील तर त्याला आपली

चूक लक्षत येईल.  आपल्यासाठी सर्व  आहेत, आपण जगाचे केंद्र आहोत आणि जग आपल्याला सुख देण्यासाठी

देवाने निर्माण केले आहे - असे माणसाने समजू नये.  

संत आपल्यास हेच सांगतात. म्हणून ते म्हणतात - खरे सुख हे आपले आपणच शोधायचे असते. ते आपल्यातच

असते. आत्मसुखाचे साधन जर इतर लोकांना मानले तर सुख कधीही मिळणार नाही. ते म्हणतात - माणसाने

कुणाला आपले समजू नये, या जगात कुणी कुणाचे नाही. 

हा जो विचार आहे तो अशा उच्च अध्यात्मिक भूमिकेवरून आहे. आणि माझे माझे करून  इतरांत गुंतू नये याचा

अर्थ प्रेम करू नये असं नाही . प्रेम करणे आणि प्रेमात गुंतणे हे दोन वेगळे प्रकार आहेत.  पहिले व्यापक

 आत्म्यावरील प्रेमाचे दर्शक आहे तर दुसरे विषयाच्या आसक्तीत अडकणे आहे. 

“भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे” या प्रार्थनेतील अर्थ अशा दृष्टीने व्यक्ती आणि समष्टी यांच्या कल्याणाच्या दृष्टीने

माउलींना अभिप्रेत आहे , तो आपण लक्षात घेतला पाहिजे. 

आपण पसायदानाचा अभ्यास करून काय साधायचे आहे ? 

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपल्याला जे हवे असते ते म्हणजे 

अखंड असणे ., अस्तित्व. 

ज्ञान, माहिती, समजून घेणे 

सुख, समाधान, आणि  शांती. 

त्यासाठी सत चित आनंदरूप आत्म्याशी, परमेश्वराशी आपण एकरूप झाले पाहिजे. 

असे  उपनिषदे, गीता सांगतात.  

आणि ते आपल्यास सर्व प्राप्त व्हावे यासाठी , आपल्यात चांगला बदल घडविण्यासाठी  ज्ञानेश्वर माउली

आपल्याकडे पसायदानात मागतात : 

जे खळांची व्यंकटी सांडो, त्या सत्कर्मी रती वाढो. 

हे मागणे  त्यांच्या गुरूंकडे, परमेश्वराकडे आणि आपल्याकडे ( श्रोत्यांकडे ) करतात. 

त्यासाठी आपण जर आत्मपरीक्षण केले आणि स्वतःतील खलत्व कमी केले तर 

जे आपल्याला पाहिजे ते मिळेल. माणसाचा पारमार्थिक क्रम विकास होईल. 


विजय रा. जोशी. 










No comments:

Post a Comment