Tuesday, November 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 51 ते 55 : ध्वनिफीत



सारांश : श्लोक ५१ ते ५५. 


साधकाने सुरवातीला आपले विकार सांडायचे असतात. साधना प्रगत झाली की मग विकारच त्याला सोडून जातात. 

तत्वांच चिंतन करण्यात मौनात राहून सर्वोत्तमाचा दास वेळ घालवत असतो. मग वाचेने ते ज्ञान लोकांना मनापासून, आपुलकीने कर्तव्यभावनेने देत असतो. 

संत सत्य शिकवतात पण ते विद्वत्तेने नसते, अत्यंत प्रेमाचे सांगणे असते.

देहाचे चोचले पुरवावे, मजा करावी, उपभोग घ्यावा, कला शिकाव्या , इंद्रिये/विषयांचा भोग घ्यावा, हे सर्व साधारणपणे असते. पण संत चरित्रात अनेकदा (पूर्वकर्मामुळे)  लहानपणीच वैराग्य लक्षणांचा उदय झालेला दिसतो

निश्चय नक्की असतो. प्राप्त कर्तव्ये करून सर्व वेळ त्या सत्य शोधनात खर्च केला जातो. 

आपलं प्रेम हे नेहमी व्यक्ती सापेक्ष असते. वस्तू सापेक्ष, गुण सापेक्ष असते. म्हणून त्यात आसक्ती असते. सतांचे प्रेम हे तसे नसते आणि ते आसक्तीमध्ये कधीही गुंतलेले नसतात. सर्वोत्तमाचा दास धन्य होय. 

प्रापंचिक श्रोत्यांच्या मार्गदर्शनासाठी  उत्कृष्ठतेचा निकष. भगवंताचे गुणविशेष यांचे वर्णन केलेआहे. 

या सर्वांचे  तपशीलवार विवरण या ध्वनिफितेत आले आहे. जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 





Saturday, November 20, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 46 ते 50 : ध्वनिफीत




सारांश – श्लोक: 46 ते 50.

अध्यात्मात आपण किती माळा  जपल्या, देवासमोर किती वेळ बसलो , ते महत्वाचे नाही. 

तर भगवंताशी आपण किती काळ एकरूप झालो ते खूप महत्वाचे. एकचित्तता, स्वतःला विसरून मन

भगवंतांशी एकरूप होणे, महत्वाचे. सर्वोत्तमाची सेवा करणारा, दास्यत्व पत्करणारा कसा असतो याचे

वर्णन  (47-56)  या १० श्लोकात आहे. 

काही संत प्रपंच धारक होते, काही नव्हते पण सर्वांचे कार्य हे देवकार्य होते. स्वतःची प्रगती करून

सर्व-सामान्यांना सन्मार्गास लावण्यासाठी त्यांनी देह झिजविला. नुसते रामनाम घेऊन पुरत नाही,

ज्यांचे आपण नाम घेतो त्याचे गुण सुद्धा आपल्यात आणले पाहिजे, आपल्या जीवनाचा लाभ

जगाला झाला पाहिजे - असे समर्थांचे वर्तन होते, आणि इतरांना शिकवण होती. 

साधकाच्या जीवनातले अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वागण्याचे प्रामाणिक परीक्षण झाले

पाहिजे, आपल्या उक्ती आणि कृतीतले अंतर जाणून घेऊन ते कमी करण्याचा सदैव प्रयत्न हे खूप

हत्वाचे आहे. आपली इंद्रिये, आपले षड्विकार आपल्याला विविध दिशेने खेचत असतो म्हणून आपण

अशांत असतो. संतांनी हे सर्व आपल्या ताब्यात ठेवलेले असते, म्हणून ते शात, निवालेले  असतात. 

या श्लोकांवरील विवेचन समर्थांचा संदेश सोप्या भाषेत उदाहरणे, दाखल्यासह या ध्वनिफितीमध्ये आहे. 


जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना  लिंक पाठवा अशी विनंती आहे. 


विजय रा. जोशी 








Tuesday, November 16, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 41 ते 45 : ध्वनिफीत





श्लोक ४१- ४५ सारांश . 


थोडा शोध , प्रयत्न आवश्यक आहे . पण अति चंचलता (बहू हिंडता) , धरसोड उपयुक्त नाही. गरजेपुरते प्रयत्न आवश्यकच आहे. ध्येय कोणते, तिथे पोहोचण्याचा आपला मार्ग कोणता हे समजले पाहिजे. स्वतःला काहीकाळ तरी विसरण्याचा  जेव्हा आपण  सराव करतो, (ध्यान) त्यावेळीआपण खूप शांती अनुभवतो. ती शांती, आनंद वर्णनातीत असते. स्वतःला विसरण्यातला,अहंकार सोडण्याचा तो आनंद असतो.अशा अखण्ड एकतेने “रघूनायका आपुलेसे करावे” हे साध्य होते. 

कर्मा चे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका ज्ञालेली नाही. आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.

अनावश्यक बोलणे म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणे आहे. म्हणून अनावश्यक बोलणे टाळणे  हे परमार्थिकाने नाही तर प्रापंचिकांसाठी देखील आवश्यक आहे. समाधान मिळणे मुळात अवघड आहे. पण जेव्हा कधी मिळाले तर ते सुद्धा कुसंगतीने भंग पावते, नाहीसे होते. सत्संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेली, म्ह्णून संत्संगतीत राहावे. 

हा सर्व बोध आपल्या बुद्धीला, विचारांना व्हावा असे समर्थ सांगत आहेत. 

आपल्या रोजच्या वर्तनात थोडा बदल करून आपला सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावरील समर्थांच्या उपदेशावरील  हे विवरण जरूर ऐका . आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा.  

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 






Thursday, November 4, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 36 ते 40 : ध्वनिफीत




श्लोक ३६ - ४०, सारांश. 

हे मना !

भगवंत हा नेहमी खऱ्या भक्ताजवळच असतो. तो भक्ताची परीक्षा पाहिल, पण त्याचाकडे कधीही

दुर्लक्ष करणार नाही. भक्त संकटात सापडल्यास त्यास नेहमी सहाय मिळते. भगवंतांचे खरे दर्शन

तुला आनंदाने आश्चर्यचकित करेल.  अत्यंत उत्कृष्ठ , समाधान देणाऱ्या भगवन्त  कृपेला प्राप्त

करण्यासाठी स्वतःचे सर्व चंचलत्व सोडून दे आणि त्याचे ठायी हे मना ! तू अखंड स्थिर रहा.

स्वतःतले सर्व दोष झटकून आपल्यामध्ये सुयोग्य बदल घडवून, भगवंता नजिकचे स्थान मिळवून 

तेथे तू कामची वस्ती ठेव. 

मनाला उपदेश करणारे हे मनाचे श्लोक जीवन सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी जे सांगत आहेत, 

त्याचे सविस्तर सोपे विवरण आपल्याला नक्की आवडेल. ऐका आणि आवडल्यास इतरांबरोबर शेअर करा. 


विजय रा. जोशी.