Tuesday, November 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 51 ते 55 : ध्वनिफीत



सारांश : श्लोक ५१ ते ५५. 


साधकाने सुरवातीला आपले विकार सांडायचे असतात. साधना प्रगत झाली की मग विकारच त्याला सोडून जातात. 

तत्वांच चिंतन करण्यात मौनात राहून सर्वोत्तमाचा दास वेळ घालवत असतो. मग वाचेने ते ज्ञान लोकांना मनापासून, आपुलकीने कर्तव्यभावनेने देत असतो. 

संत सत्य शिकवतात पण ते विद्वत्तेने नसते, अत्यंत प्रेमाचे सांगणे असते.

देहाचे चोचले पुरवावे, मजा करावी, उपभोग घ्यावा, कला शिकाव्या , इंद्रिये/विषयांचा भोग घ्यावा, हे सर्व साधारणपणे असते. पण संत चरित्रात अनेकदा (पूर्वकर्मामुळे)  लहानपणीच वैराग्य लक्षणांचा उदय झालेला दिसतो

निश्चय नक्की असतो. प्राप्त कर्तव्ये करून सर्व वेळ त्या सत्य शोधनात खर्च केला जातो. 

आपलं प्रेम हे नेहमी व्यक्ती सापेक्ष असते. वस्तू सापेक्ष, गुण सापेक्ष असते. म्हणून त्यात आसक्ती असते. सतांचे प्रेम हे तसे नसते आणि ते आसक्तीमध्ये कधीही गुंतलेले नसतात. सर्वोत्तमाचा दास धन्य होय. 

प्रापंचिक श्रोत्यांच्या मार्गदर्शनासाठी  उत्कृष्ठतेचा निकष. भगवंताचे गुणविशेष यांचे वर्णन केलेआहे. 

या सर्वांचे  तपशीलवार विवरण या ध्वनिफितेत आले आहे. जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 





No comments:

Post a Comment