Thursday, December 9, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 56 ते 60 : ध्वनिफीत



सारांश श्लोक ५६ ते ६०. 

साधकांनी काय करावे, निदान या क्षेत्रात प्रगती व्हावी अशी इच्छा असलेल्या लोकांनी , जिज्ञासूंनी काय करावे, कसे करावे हे सांगणारे हे मनाचे श्लोक आहेत. 

उपासना हवी, त्याप्रमाणे शुद्ध कर्म व्हावे , आणि अशी  भक्तियुक्त क्रिया  सातत्याने व्हायला हवी. 

संत स्वतःचे चरित्र लिहीत नाहीत पण अत्यंत प्रेमाने इतरांसाठी आपल्या जीवनात केलेल्या साधनेचे सार सांगतात. ते म्हणजे राम-नाम आणि नित्य नेमे उपासना हे आहे. स्वार्थापायी रामभक्ती केली तर त्याचा लाभ घडत नाही. फक्त राम-भेट , ईश्वरप्राप्ती , हेच ध्येय असले पाहिजे. 

कल्पना मनात येते आणि मग तिचा विस्तार होतो. मनात कल्पना येतात त्यातून वासना आणि मग पुढे कृती होते. पण अशा कोटी-कोटी कल्पना केल्या तरी त्यातून रामभेट होणार नाही. कल्पनेने सुरु होणारा  रस्ता रामाकडे जात नाही. कल्पनाच करायची तर ती निर्विकल्पाचीच करावी. म्हणजेच चिंतन परमेश्वराचेच होईल. 

वासनेची गोडी सहज आहे, राम नामाची, नामस्मरणाची गोडी जाणीवपूर्वक लावावी लागते, पण साधनेने, प्रयत्नाने, निश्चयाने  जर लागली तर मग ती आपले सर्व अवधान अंतर्बाहय भरून टाकते आणि मग जीवन धन्य होते असा संतांचा अभिप्राय आहे. 

आपली सर्व भौतिक, अध्यात्मिक मागणी निरपेक्ष आणि शुद्ध भक्तिभावाने पूर्ण होतात पण त्यासाठी मन, कल्पना आणि वृत्ती यात आमूलाग्र बदल करावा लागतो. तो का व कसा करायचा हेच श्रीसमर्थ आपल्याला आईच्या मायेने समजावून सांगत आहेत. 

ध्वनिफितीमध्ये हे सर्व सोपेपणाने समजावून सांगितले आहे. जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, ही  विनंति. 


विजय रा. जोशी. 


No comments:

Post a Comment