Wednesday, December 15, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 61 ते 65 : ध्वनिफीत




सारांश श्लोक 61 ते 65. 

संत सांगतात कि आंनदात रहा. आंनदात जीव आत्म्याजवळ रहातो, दुःख करायला लागला कि जीव देहबुद्धीवर

येतो. पण जेव्हा साधक देहबुध्दीत येतो, निजध्यास सुटून जातो,  तेव्हा मी आणि तू, मी आणि जग अशी

जाणीव सुरु होते,  सर्व दुःख सुरु होतं . 

साधकाला हा साधना-आनन्द प्रयत्नाने मिळवावा लागतो. 

सर्व कामना पूर्ण करते ती कामधेनू. ती कामना पूर्ण करते पण काय मागायचे  ते कळलं पाहिजे. 

आपण संसारातल्या गोष्टी , ज्या अशाश्वत आहेत त्या मागून फायदा नाही. 

शाश्वत गोष्टी मागण्यात खरा लाभ आहे. 

पूर्ण ज्ञानी, कामनारहित, निर्लोभ आणि निर्विषयी असा मनुष्य नसतो हे लक्षात घेऊनच  ‘अतीपणा’ नको 

हे समर्थ सांगतात. काय नसावं आणि काय करावं हे सांगितले आहे. 

भक्ति ऊणे जीवन हे  दैन्यवाणे आहे. 

बाकी सर्व लौकिक संसार अति उत्तम असेल तरीही.  संसाराला परमार्थाची जोड नसेल तर सर्व व्यर्थ आहे, कारण

संसारातील सर्व गोष्टी इथेच सोडून जावे लागणार आहे. येणार आहे ते फक्त भक्तीचे, सत्कार्याचे , सत्कृत्याचे फळ

आणि शुद्ध हेतूमुळे मनावर झालेले संस्कार.

हे सर्व सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व मानव मात्रांस उपयुक्त ज्ञान आहे. 

म्ह्णून संतांच्या उपदेशास ‘अक्षय वांग्मय’ असे म्हणतात. 

कृपया पाठ ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी . 


No comments:

Post a Comment