Friday, December 25, 2020

 

गीता अध्याय  ६, भाग १, : ध्वनी फीत



ध्यानयोग, आत्मसंयम योग, चित्तवृत्ती निरोध. (संयमाने मन वळवा)


अध्याय ६, मुख्य विषय 

कर्मयोगी होण्यासाठी काय प्रयत्न करावे, योगी हा समतेची मूर्ती असतो. (श्लोक १ - ९)

ध्यान साधना , योग साधना कशी करावी (१० - १९)

योगी वृत्तीची, वर्तनाची आवश्यकता व लाभ (२० - ३२) 

अर्जुनाचे प्रश्न (३३, ३४, ३७, ३८, ३९). 

भगवंताचा खुलासा आणि आश्वासन. (३५,३६, ४०,४१,४२). 

स्वास्थ्य म्हणजे काय ? स्वतःमध्ये स्थित होणे म्हणजे स्वास्थ्य.


आरोग्य म्हणजे पूर्णता. संस्कृतमध्ये “स्वास्थ्य” असा समर्पक शब्द आहे. स्वतःमध्ये स्थित होणे म्हणजे स्वास्थ्य. स्वरूपामध्ये अवस्थान असणे म्हणजे खरी स्वस्थता. स्वत्व ज्याला गवसले, ज्यांनी स्वतःची नीट ओळख करून घेतली, त्याला खरे स्वास्थ्य आरोग्य लाभते. 

आत्मदर्शनातून, आत्मज्ञानातून जीवनाची खरी परिपूर्णता, खरी निरोगीता प्राप्त होत असते. 

स्वास्थ्य प्राप्तीसाठी प्रयत्न दोन प्रकारे 

सर्जनशील चेतनेची वाढ दोन पावलांनी होते. एक पाऊल म्हणाजे क्रियाशीलत्व व दुसरे विश्रांती. क्रियाशीलत्व व विश्रांती या पावलांनी प्रगती होते. एक पाय क्रियाशील असतो, तो दुसऱ्या पायाच्या पुढे जाऊन मग स्थिर होतो. या स्थिर पायावर सर्व शरीराचा भार असतो. मग दुसरे पाऊल पुढे जाते. एका पायाचे क्रियाशीलत्व हे दुसऱ्या पायाच्या स्थिरतेवर , विश्रांती -स्थितीवर अवलंबून असते. स्थिरता हा क्रियाशीलत्वचा पाया होय. ध्यानात मिळणाऱ्या गाढ विश्रांतीने गतिमान व कौशल्यपूर्ण, यशदायी कार्य करण्याचे सामर्थ्य येते. 

स्वतःला विसरणे, काही काळ तरी , म्हणजे ध्यान

उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला.     (गीताई ५/६)

मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो, बन्धाय विषयासंगो, मुक्त्यै निर्विषयं मनः.  (अमृतबिंदू उपनिषद २)

मन जिंकणे हि अवघड, म्हणजे साधनेची गोष्ट आहे. त्या साठी कर्मयोग सांगितला आहे. कर्म योगातील कर्मे शुद्ध (उपासना युक्त) होण्यासाठी ध्यान-योगाची उपासना ६ व्या अध्यायात सांगितली आहे. 

ध्यान म्हणजे घरी परत येणे. 

सुखाच्या शोधार्थ माणूस सर्वत्र भटकत असतो. पण स्वतःच्या घराची ओढ, मांगल्य आणि स्वथता ही काही वेगळीच असते. ध्यानावस्थेत माणूस असाच जणू घराच्या ओढीने स्वस्थ होतो. स्वाभाविक सुख-शांती अनुभवतो, आपण कोण आहोत ते आनंदाने पाहू लागतो. बाहेरच्या सुखावर अवलंबून रहात नाही. 

जीवनाच्या अगोदर मूळ गती शून्य अवस्था होती.या मूळ अवस्थेत जाणे म्हणजे ध्यान. आनंद नाही आणि दुःखही नाही तरी समाधान आहे अशी स्थिती. अशी स्थिती येऊ शकते ? होय ! काहींच्या बाबतीत येते, बाकीच्यांमध्ये येत नाही. पण बहुसंख्य म्हणाले “अशी स्थिती येत नाही” तर ते बरोबर नाही.

ध्यानासाठी आवश्यकता . 

ध्यान स्थिती कशी असावी. 

इत्यादी गोष्टी आपण या भागात पहाणार आहोत. 


विजय रा. जोशी


गीता अध्याय  ६, भाग १, : ध्वनी फीत












Friday, December 18, 2020

 

     गीता अध्याय  5, भाग 2, : ध्वनी फीत



अंतरी धुतला योगी , जिंकून मन इंद्रिये

झाला जीवची भूतांचा , करुनि हि अलिप्त तो.      ७/५.


योगयुक्त , विशुद्धात्मा , विजितात्मा , जितेन्द्रिय व सर्वभूतात्मभूतात्मा या पांच गोष्टी जर जीवनात आल्या तर माणूस कर्म करूनही लिप्त होत नाही.




आयुष्यातील वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान (स्वामीजींची शिकवण)

आपली धडपड ही नेहमी सुखासाठी असते. सुखाची अपेक्षा हेच बहुदा मानवी प्रयत्नांचे कारण असते. आणि म्हणूनच सर्व-सामान्यांना  “निष्काम कर्मयोग” बुद्धीने समजणे  जरी शक्य असले तरी त्याप्रमाणे 

प्रत्यक्ष वर्तन घडणे, वागणे हे अत्यंत कठीण आहे, जवळ जवळ अशक्यच आहे.  कुठल्याही प्रदीर्घ प्रवासाची सुरवात जशी पहिल्या पावलानेच होते , तशी कर्मयोग आपल्यास साध्य होण्याला कठीण वाटला तरी त्यादृष्टीने प्रयत्नांची काही पावले टाकणे आवश्यक आहे, शक्य आहे. यादृष्टीने या अध्यायात ‘सुखाच्या’ प्रयत्नांच्या परिणामांबद्दल मार्गदर्शन केले आहे व ते करत असताना आपल्याला आयुष्यातील वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान दिले आहे. 


जन्म - गतीला सुरवात, मरण - गती थांबते, 

जीवन हा गतीचा प्रवास.

सुख / दुःखात (भावनेत) गतीबदल.

जागृतावस्थेत मनुष्य -  भावना / विचार याने जीवन भर ग्रस्त. 

म्हणून जीवनात गती-प्रतीगतीचे नियम लागू.

सुख गती सहज, त्याने दुःख निर्मिती , 

म्हणून (सहज नसलेल्या) दुःख स्वीकाराने सुख.  

माणसाचा अहंकार हा फुललेला असतो, तो सहजच असतो.

नम्रता हि आयुष्यात अभ्यासाने आणायची असते.

हा अभ्यास म्हणजेच साधना / साधक कार्य होय.


शक्ती वळवून कशी घेता येईल ?

अनेक इछ्या , आकांक्षा साठी आपण अस्वस्थ होतो. अनेक हव्यास असतात. अशा वेळी “पश्यंती” पातळीवर आपल्या इच्छ्येचा खरा शोध घेऊन श्रेयस/प्रेयस विश्लेषण करून योग्य तो बदल करून चुकीची गोष्ट टाळून निर्णय घेऊ शकतो. ही सत्सतविवेकबुद्धी (apperception) हे निसर्गाने मानवाला दिलेले वरदान आहे. ति 

प्रत्येकात असते. पण ती वापरण्यासाठी ज्ञानपूर्वक संयम हवा. (हे शिक्षण मनाला कठोर पणे द्यायला हवे.  


या संबंधी परमार्थात तसेच व्यवहारात काय करता येईल याचे गीतेतील मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी उपयुक्त. 

 

 

गीता अध्याय  5, भाग 2, : ध्वनी फीत





विजय रा जोशी 



Friday, December 11, 2020

 गीता अध्याय  5, भाग 1, : ध्वनी फीत


गीता अध्ययन - हेतू आणि लाभ : भगवत गीतेतील शिकवण आपल्याला स्वतःच्या जीवनात सर्व दृष्टीने प्रगत. उत्क्रान्त होण्यासाठी सहाय्यकारक आहे, स्वतःची  गुणात्मक प्रगती, आणि आत्मिक प्रगती तर  साध्य होईल पण त्याच बरोबर आपले जीवनातील सर्व कार्य योग्य मार्गी लागून , कार्याच्या कौशल्य मध्ये वाढ होऊन संकल्प कसा करावा आणि त्याच्या पूर्तीसाठी काय प्रकारे प्रयत्न करायचे हेही आपल्यास गीतेच्या अभ्यासाने आणि त्याप्रमाणे केलेल्या कृतीने अनुभवास येईल. आपल्यासह आपल्या कुटुंबियांचे, सहकार्ऱ्यांचे आणि संबंधित समाज घटकांचे आपण कसे सहाय्य करावे , कशासाठी करावे आणि त्यातून परस्पर लाभ कसा होऊ शकेल हे आपल्याला गीता अभ्यासाने  कळू शकेल. 

‘माझा खरा अर्थ’ उलगडण्यास हे ज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच ‘माझ्या जवळ मला जाण्यासाठी’  काय पद्धतीने  मी जीवनाकडे, नित्यकर्माकडे बघावे हे रहस्य गीताज्ञानातून मला मिळू शकेल. 

 प्रत्येक मनुष्यमात्रास गीतेचा अभ्यास आणि शक्य होईल तेवढे त्या ज्ञानाचे अनुकरण हे उपयुक्त आहे. आणि हे सर्व आपण पायरी पायरीने एकेक अध्यायात समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

कर्मयोग व कर्मसन्यास यात कोणता मार्ग श्रेष्ठ आहे ?  या प्रश्नातून ५ वा अध्याय निर्माण होतो.


 कृष्णा संन्यास कर्माचा तसा योगही सांगसी, 

 दोहोत जे बरे एक ,  सांग ते मज निश्चित.                             १/५.

 योग संन्यास हे दोन्ही, मोक्ष साधक सारखे

 विशेष चि परी योग , संन्यासाहूनी मानिला.                          २/५.


चवथ्या अध्यायात, कर्म अधिकाधिक  उच्च पातळीवर नेण्यासाठी काय करावे. आणि ज्ञानमार्गी  आणि कर्ममार्गी  ते कसे करतात. (कर्म , विकर्म आणि अकर्म) हे पाहिले.  पाचव्या अध्यायात कर्म संन्यासी आणि कर्मयोगी हे दोन्ही आत्मज्ञानी असतात. त्यांची बाह्यरूपे  वेगळी भासली तरी त्यांचे मूळ कार्य आणि कार्य सिद्धी ही  सारखीच असते हे भगवंत समजवून सांगत आहेत. सर्व-सामान्यांनी ते कसे समजून घ्यावे आणि शक्य होईल तसे त्याचे अनुकरण कसे करावे हे सांगणारा हा अध्याय आहे. यातील संकल्पना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न आपण  करणार आहोत. 



विजय रा. जोशी.




गीता अध्याय  5, भाग 1, : ध्वनी फीत



Friday, December 4, 2020

 

गीता अध्याय ४ भाग २ - ध्वनी फीत 



गीता अध्याय ४ , भाग २ , ध्वनी फीत 


गीतेतील तत्वार्थ समजून घ्यावा. साधक संकल्प निश्चय करावा. 

संकल्पाप्रमाणे त्याग वर्तन करावे. सातत्यासाठी रोजची कर्मशुद्धी व 

प्रकाश प्रार्थना, आलेख / अहवाल नोंद .....


हळूहळू शक्यते प्रमाणे त्याग संकल्पात वाढ करावी.


सातत्याने केलेल्या कामाच्या प्रमाणात कर्मयोग स्वरूप वर्तनात प्रगती 

घडू शकेल.



आज हजारो, लाखो पुस्तके, मासिके, वर्तमान पत्रे , internet , TV व 

अनेक जन संपर्क माध्यमाद्वारे माहितीचा स्फोट होतो आहे. शाळा, 

महा विद्यालये, विद्यापीठे उदंड झाली आहेत, अनेक अभ्यास शाखा 

नव्याने विकसित होत आहेत.


एवढे सर्व होऊनही जीवन तणावपूर्ण झाले आहे. ताण-तणावांचे प्रमाण

प्रचंड वाढले आहे. जग नैराश्याने त्रस्त आहे. एकाग्रता होत नाही,

स्मरण शक्ती रहात नाही, सातत्य टिकत नाही,

हे करावे कि ते करावे कळत नाही! हे जास्त प्रमाणात का होते आहे ?


भगवान श्रीकृष्ण म्हणतात : अर्जुना! ऐकून ऐकून घोटाळ्यात पडलेली 

तुझी बुद्धी स्थिर झाल्याशिवाय कर्मयोग तुझ्या हातून घडणार नाही.   

सर्व थांबव, संतांना शरण जा, ते तुला जीवनाचा ग्रंथ शिकवतील.


स्वामीजी सांगतात : तुम्हाला ज्ञान झाले आहे हा अहंकार सुरु झाला 

तर अज्ञान सुरु झाले. योजनाबद्ध ज्ञानाने आयुष्य आखा आणि 

स्वत:चे कल्याण करून घ्या.

 Orderly knowledge is superior to all disorderly

pretendance of ignorance.



विजय रा. जोशी. 



गीता अध्याय ४ , भाग २ , ध्वनी फीत