Showing posts with label Gita 4. Show all posts
Showing posts with label Gita 4. Show all posts

Friday, December 4, 2020

 

गीता अध्याय ४ भाग २ - ध्वनी फीत 



गीता अध्याय ४ , भाग २ , ध्वनी फीत 


गीतेतील तत्वार्थ समजून घ्यावा. साधक संकल्प निश्चय करावा. 

संकल्पाप्रमाणे त्याग वर्तन करावे. सातत्यासाठी रोजची कर्मशुद्धी व 

प्रकाश प्रार्थना, आलेख / अहवाल नोंद .....


हळूहळू शक्यते प्रमाणे त्याग संकल्पात वाढ करावी.


सातत्याने केलेल्या कामाच्या प्रमाणात कर्मयोग स्वरूप वर्तनात प्रगती 

घडू शकेल.



आज हजारो, लाखो पुस्तके, मासिके, वर्तमान पत्रे , internet , TV व 

अनेक जन संपर्क माध्यमाद्वारे माहितीचा स्फोट होतो आहे. शाळा, 

महा विद्यालये, विद्यापीठे उदंड झाली आहेत, अनेक अभ्यास शाखा 

नव्याने विकसित होत आहेत.


एवढे सर्व होऊनही जीवन तणावपूर्ण झाले आहे. ताण-तणावांचे प्रमाण

प्रचंड वाढले आहे. जग नैराश्याने त्रस्त आहे. एकाग्रता होत नाही,

स्मरण शक्ती रहात नाही, सातत्य टिकत नाही,

हे करावे कि ते करावे कळत नाही! हे जास्त प्रमाणात का होते आहे ?


भगवान श्रीकृष्ण म्हणतात : अर्जुना! ऐकून ऐकून घोटाळ्यात पडलेली 

तुझी बुद्धी स्थिर झाल्याशिवाय कर्मयोग तुझ्या हातून घडणार नाही.   

सर्व थांबव, संतांना शरण जा, ते तुला जीवनाचा ग्रंथ शिकवतील.


स्वामीजी सांगतात : तुम्हाला ज्ञान झाले आहे हा अहंकार सुरु झाला 

तर अज्ञान सुरु झाले. योजनाबद्ध ज्ञानाने आयुष्य आखा आणि 

स्वत:चे कल्याण करून घ्या.

 Orderly knowledge is superior to all disorderly

pretendance of ignorance.



विजय रा. जोशी. 



गीता अध्याय ४ , भाग २ , ध्वनी फीत