Saturday, November 20, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 46 ते 50 : ध्वनिफीत




सारांश – श्लोक: 46 ते 50.

अध्यात्मात आपण किती माळा  जपल्या, देवासमोर किती वेळ बसलो , ते महत्वाचे नाही. 

तर भगवंताशी आपण किती काळ एकरूप झालो ते खूप महत्वाचे. एकचित्तता, स्वतःला विसरून मन

भगवंतांशी एकरूप होणे, महत्वाचे. सर्वोत्तमाची सेवा करणारा, दास्यत्व पत्करणारा कसा असतो याचे

वर्णन  (47-56)  या १० श्लोकात आहे. 

काही संत प्रपंच धारक होते, काही नव्हते पण सर्वांचे कार्य हे देवकार्य होते. स्वतःची प्रगती करून

सर्व-सामान्यांना सन्मार्गास लावण्यासाठी त्यांनी देह झिजविला. नुसते रामनाम घेऊन पुरत नाही,

ज्यांचे आपण नाम घेतो त्याचे गुण सुद्धा आपल्यात आणले पाहिजे, आपल्या जीवनाचा लाभ

जगाला झाला पाहिजे - असे समर्थांचे वर्तन होते, आणि इतरांना शिकवण होती. 

साधकाच्या जीवनातले अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वागण्याचे प्रामाणिक परीक्षण झाले

पाहिजे, आपल्या उक्ती आणि कृतीतले अंतर जाणून घेऊन ते कमी करण्याचा सदैव प्रयत्न हे खूप

हत्वाचे आहे. आपली इंद्रिये, आपले षड्विकार आपल्याला विविध दिशेने खेचत असतो म्हणून आपण

अशांत असतो. संतांनी हे सर्व आपल्या ताब्यात ठेवलेले असते, म्हणून ते शात, निवालेले  असतात. 

या श्लोकांवरील विवेचन समर्थांचा संदेश सोप्या भाषेत उदाहरणे, दाखल्यासह या ध्वनिफितीमध्ये आहे. 


जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना  लिंक पाठवा अशी विनंती आहे. 


विजय रा. जोशी 








No comments:

Post a Comment