Friday, May 3, 2024

 योग ग्रंथ पाठ ६ ,  उत्क्रांती  १/३ (२७ मार्च २०२४)  ध्वनी फीत 





सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत 

उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही 

त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे 

जावी लागतात. असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे.

लामार्क, माल्थस, वॅलेस , डार्विन हे काही शास्त्रज्ञ, ज्यांनी या वर काही संशोधन विचार मांडले आहेत. 


उत्क्रांतीवाद हा उत्क्रांतीवादाच्या कल्पनांचा किंवा सिद्धांताचा संच आहे. ही एक अनुक्रमिक, दिशात्मक

आणि हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. ही पद्धतशीर बदलाची प्रक्रिया आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक

मानववंशशास्त्रात मानवी संस्कृतीचा हळूहळू, संरचनात्मक बदल हा उत्क्रांतीवाद्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.


स्वामीजींनी या वर आपले विस्तृत विचार विविध ग्रंथात मांडले आहेत. आणि मन, मनाच्या इच्छा आणि

परिस्थितीशी जुळवणूक या सर्वांची उत्क्रांती मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका लक्षात घेतल्या शिवाय त्या थेअरीला

 पूर्णतः येणार नाही हे ठाम पणाने मांडले आहे. 


या व्यतिरिक्त उत्क्रांतीत तथाकथित उन्नति झाली कि अधोगती झाली यावर सुद्धा अत्यंत महत्वाचे भाष्य केले आहे.

माईंड पॉवर, व्हॉट माईंड मीन्स, आपण असे का वागतो, पर्पज ऑफ युनिव्हर्स, वागावे कसे ... अनेक

 पुस्तकांमध्ये  स्वामीजींनी या सिद्धांताचा विविध  अंगांनी  विचार केला आणि अनेक पैलूंवर भाष्य केले. 

उत्क्रांती प्रक्रिया आणि आपण याचा दुवा समजण्यासाठी  हे सर्व समजून घेणे आपल्याला महत्वाचे आहे.  

यावर अभ्यासात्मक चिंतन एकूण ३ पाठात मांडण्याचा हा प्रयत्न  आपल्याला उद्बोधक वाटावा अशी अशा आहे. 


खरे तर यावर अधिक अभ्यास, संशोधन होणे , करणे गरजेचे आहे. असे वाटते.

 


विजय रा. जोशी 


No comments:

Post a Comment