Wednesday, January 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  कृतज्ञता दिनानिमित्त विशेष पाठ




“प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  श्लोक सारांश. 

श्लोक ६७ - पराक्रमी श्रीराम भक्ताचे संकटापासून रक्षण करतो. 

६८ -  ज्याच्या समोर प्रलय काळ हि थरथरतो. त्याचे नाम घ्यावे. गुण घ्यावे. 

६९ -   माणसाने भक्तिमार्गावर असतांना कधीही अनीती, द्वेष-मत्सर करू नये. 

७० -   अहंकार आणि आळस त्यागून सातत्याने नाम-स्मरण करावे. 

७१ -    नामस्मरणाने दोष कमी होतात, पुण्य संचय घडतो. 

७२ -   खर्च आणि कष्ट नसलेले नामस्मरण करीत असता संसारापासून  शक्य तेवढे अलिप्त असावे. 

७३ -    महादेव सुद्धा ज्याचे नाम जपतात त्यास (संसार) दुःख भोगावे लागत नाही. 

७४ -    व्रते, दाने, उद्यापने असे काहीही न करता  दिन-दयाळू परमेश्व्राचे मनन करता येते. 

७५ -    नामस्मरणाचे सांगितलेले हे महत्व मान्य होत नसेल तर अभ्यास करून किंवा अधिकारी

              व्यक्तीच, गुरूंचा सल्ला घेऊन ते महत्व समजून घ्यावे. 

७६ -    मनाची चंचलता माणसास कोठेही स्थिर होऊ देत नाही. नामावरील विश्वास माणसाला

            सन्मार्गावर स्थिर ठेवतो. ……………..श्रीराम


या श्लोकांच्या निमित्ताने प्रभात काळी साधना कशी करावी या बद्दल पूज्य स्वामी विज्ञानानंद

सूचित विचार येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाठ आवडल्यास तो इतरांना ऐकण्याची शिफारस जरूर करावी, ही विनंती.


विजय रा जोशी.



No comments:

Post a Comment