Sunday, February 6, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 81 ते 85 : ध्वनिफीत



सारांश श्लोक 81 ते 85 . 


मत्सर घात यावर समर्थांचा भर आहे, कारण मत्सर हा मानवी जीवनात फार मोठा धोका आहे.

मत्सराच्या उदभवामुळे माणसाचे जीवन भकास, नष्ट, अतीव दुखी होते. ... 

अतिशय नकारी, भयंकर, विनाश-कारक भावना म्हणजे द्वेष आणि मत्सर.

हे मना ! तू मत्सरात शक्ती घालवून नामाला विसरू नकोस, स्वतःचा घात करू नको.

मत्सरा सारख्या नकारी, भयंकर भावना नाहीशा करण्याची शक्ती ही अखंड नाम-स्मरणात आहे.

आणि या नाम-साधने बरोबर दुसऱ्या कुठल्याही साधनेची सोपेपणात  तुलना होऊ शकत नाही. 

रामनामाने प्राप्त होणारी स्थिती हि ‘विश्राम’ स्थिती आहे. आणि ही  विश्राम स्थिती प्रत्येकास हवी

असते. जेव्हा आपण संपूर्णपणे साधना कार्यास समर्पित राहू तेव्हा आपली स्व-शुद्धी प्रक्रिया पुढे जात

राहून अंतिमतः आपल्याला “खरा विश्राम” लाभेल.

नामस्मरणाच्या जोडीला अखंड साधनेतून, सत्कर्मातून जेव्हा व्यक्ती सातत्य पूर्ण कार्य करीत राहील, 

तेव्हा आत्म-शुद्धी, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. 

समस्त उपायांमध्ये “नाम स्मरण” हे सार आहे. 

भगवंत-स्वरूप प्राप्त झालेले संत, सद्गुरू आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात , 

त्याचे महत्व आपण ध्यानात ठेवले पाहिजे. 

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नाम-स्मरणाचे महत्व अधोरेखित करणारे हे विवेचन जरूर ऎका  

आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी. 







No comments:

Post a Comment