Friday, February 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 91 ते 95 : ध्वनिफीत.



सारांश , श्लोक 91 ते 95. 

चांगल्या स्थितीत असताना देवाचे स्मरण ठेवा. संकट आले, आजारपण आले, फक्त अशा वेळी देवाचा

धावा उपयोगी होईलच असं नाही. 

भगवंत म्हणजे नेमकं काय ? त्या पर्येंत पोहोचण्यासाठी नेमके काय करावं ?       

हे व्यक्तीनिहाय स्वतंत्र असू शकते.  देव वर्णन हे नेमके नाही कारण तो अवर्णनीय आहे. 

आपले सर्व दोष , जन्म जन्मांतरीचे दोष  जर घालवायचे असतील तर मनःपूर्वक केलेली देव भक्ती घडली पाहिजे. 

भगवन्त जीवाची सर्व व्यवस्था करीत असतो. 

व्यवहारात अनेक गोष्टी निभवायला लागतात, त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्या कडून चुकीचे गैर असे वर्तन होते,

वाणी अपवित्र होते.  

पवित्र भाषेने, नामस्मरणाने वाणी पवित्र होते….  हळूहळू पवित्र होते. वर्तन शुद्ध होऊ लागते.

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने (म्हणजे सर्व पाप-कार्यें सोडून देऊन ) 

माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा.

राम नामाने, नामस्मरणाने, सत्कर्माने सर्व कल्याण घडेल. 

नामस्मरणाचे महत्व सांगणारे हे विवेचन जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकायलाही सांगा. 



विजय रा. जोशी. 







No comments:

Post a Comment