Showing posts with label विज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान. Show all posts

Thursday, May 23, 2024

 योग ग्रंथ पाठ ९,  १७, एप्रिल २०२४,  इच्छा पूर्ती. १/३  ध्वनी फीत .null 







सारांश 

“इच्छापूर्ती” साठी जन्म झाला.

जन्‍म घेणे लागे वासनेच्‍या संगे । तेची झाली अंगे हरीरुप॥   .....  हरीपाठ. 

इच्छा पूर्ती : इच्छा जरी अनेक असल्या तरी त्या सर्व एकाच गोष्टीसाठी, ... ती गोष्ट      “सुख” !

जीवनाचा सामान्य हेतू  'सुख शोधणे’   हा असतो. 

वय कोणतही असो, सुखाचा शोध घेणारी पावलं कधीच थबकत नाहीत. 

मात्र जीवनाचा असामान्य हेतू ‘शांतीपूर्ण समाधान शोधणे’ हा असला पाहिजे.

मुळात समाधान ही सुखाच्या पलीकडची मनाची अवस्था आहे. समाधान म्हणजे, संतोष असणारी मनाची अवस्था.

म्हणजे मनाची शांती, संतुष्टता. 

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥

सुख हवे दुःख नको. (मनाचा स्थायीभाव) 

जीवन किती सुखी आहे ?

“सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे”. 

“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनाला तूच शोधून पाहे”. 

विज्ञान प्रगत झाले, तंत्रज्ञान विकसित झाले, मानवी जीवन सुखी झाले का?

जग जवळ आले, माणसे किती जवळ आली ?

माणूस = मन (अजड) + शरीर  (जड).

 यात मन ठरवते आणि शरीर कार्य करते म्हणून माणूस समजण्यासाठी त्याचे मन समजणे महत्वाचे

आहे.  विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही महत्वाचे आहे , याचा समन्वय हे  स्वामीजींच्या कार्याचे

वैशिष्ठय आहे. 

माणसाचे मन स्वभावातून , वर्तनातून व्यक्त होते,  चारित्र्यातून  कळते. 

आयुष्यातील सुखासाठी / यशासाठी मनाचे शिक्षण ... जे विज्ञानाच्या माध्यमातून मनशक्ती केंद्र देते. 

इच्छा पूर्ती / सुख प्राप्ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा आणि पुढील दोन पाठ., 

.. आपल्याला कदाचित अधिक विचार प्रवृत्त होण्यासाठी काही नवीन Insight देतील असे वाटते. 




विजय रा जोशी. 













Friday, January 15, 2021

 गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


ज्ञान विज्ञान योग.  

गीता उपदेश जगन्मान्य असून त्याचा सर्वत्र उपयोग जाणकार, जिज्ञासू करीत आहेत. गीतेतील अध्यात्मिक तत्वे , संकल्पना, परिभाषा जी अगोदर समजायला अवघड आहे ती विविध माहितीच्या आधारे समजवायचा हा एक प्रयत्नआहे. 

समजणे एकवेळ सोपे पण उमजणे, प्रत्यक्ष वर्तनात आणणे  अतिशयअवघड याच अनुभव मी रोज घेतो आहे. श्रोते गोड  मानून घेत आहेत म्हणून प्रत्येक वेळी अधिक उत्साहाने , जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करायला प्रेरणा आहे. 



पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे. प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो. 

श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार. 

श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो. 

सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वात एकच अविनाशी पदार्थ भरून राहिला आहे हे समजणे  याचे नाव “ज्ञान”. एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. यासच क्षराक्षर विचार असे म्हणतात, (१३/३०) 

प्रपंचाला विज्ञान म्हणतात. 

तो सत्य समजणे हे अज्ञान. 

जाणिवेचा जिथे शिरकावच होत नाही ते ज्ञान. (आत्मज्ञान).

भक्ती (गीता रहस्य). श्लोक (वीस ते तीस) अन्वयार्थ

उपासना सर्वांना पाहिजेच. मग ती व्यक्ताची करा, अगर अव्यक्ताची करा. पण या दोहोत व्यक्ताची उपासना सुलभ असल्याने तिचेच येथे वर्णन आहे. व तिलाच भक्ती असे नाव आहे. तथापि स्वार्थ-बुद्धी मनात ठेऊन काही विशिष्ठ हेतूसाठी परमेश्वराची भक्ती करणे ही भक्तीची पायरी कनिष्ठ असून, परमेश्वराचे ज्ञान व्हावे अशा हेतूने भक्ती करणारे (जिज्ञासू) देखील कच्चेच म्हंटले पाहिजेत, कारण त्यांचे ज्ञान परिपूर्ण नसते. . तथापि हे सर्व भक्ती करणारे असल्यामुळे सर्वच चांगल्या मार्गाने जाणारे असे म्हंटले आहे (श्लोक १८). पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे ज्ञानप्राप्तीने कृतार्थ होऊन या जगात ज्यांना करावयाचे किंवा मिळवायचे शिल्लक उरले नाही ते ज्ञानी पुरुष निष्काम बुद्धीने जी भक्ती करतात ती सर्वात श्रेष्ठ होय. त्यामुळे “भक्तियोग म्हणजे परमेश्वराची निर्हेतुक व निरंतर भक्ती” असे भागवतात भक्तीचे लक्षण केले आहे. आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या त्या स्वर्गादिक फळांच्या कामवासनांनी वेडावलेले लोक तो तो उपासनेचा नियम पाळून दुसऱ्या निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात (७/२०) 

भक्तीसाठी संपूर्ण, विनाशर्त समर्पण हवे.

माझे जन्म-जन्माचे सर्वस्व मी आणीन ओतले तरी देवाचे देण पूर्ण होणार नाही हा आंतरिक भाव हवा. असा भाव असेल तर देव पूर्ण प्रसन्न होईल. देव भक्ताची सेवा हि करेल. भक्तीसारखी सोपी पण तेवढीच अवघड गोष्ट नाही.

ज्ञाता व ज्ञेय, परा व अपरा प्रकृती याच्या पलीकडे असलेले व सर्व सामावलेले असे एक स्वतंत्र तत्व आहे  त्याला “सत्य” म्हणतात. त्यालाच परब्रह्म म्हणतात.या ब्रह्माला पहाण्याची इछ्या बाळगणे, त्याचे अनुसंधान ठेवणे, व ते ठेवतानाच इछ्या, द्वेष रहित होऊन ब्रह्माचे ध्यान करणे ही ७ व्या अध्यायातील प्रमुख गोष्ट आहे. ज्ञानी भक्त जन्म-जन्माच्या साधनेतून ते साध्य करतो.

पूर्ण माहितीसाठी  ध्वनिफित . 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत