Showing posts with label इच्छा पूर्ती. Show all posts
Showing posts with label इच्छा पूर्ती. Show all posts

Monday, May 27, 2024

 योग ग्रंथ पाठ १०, दिनांक २४/४/२०२४,  इच्छा पूर्ती २/३.   





सारांश . 

मृत्यू समयी इच्छा बाकी असल्यास , जीव दुसरे शरीर घेऊन जन्म घेतो. (पुनर्जन्म). 

अनेक लोकांच्या अनेक इच्छा असू शकतात, त्या क्षणो क्षणी बदलू शकतात. 

इच्छा पूर्ती म्हणजे अशा सर्व इच्छा पूर्ण होणे. हे साध्य अशक्यप्राय आहे. 

आपण असे पाहिले की, इच्छा असंख्य असल्या तरी त्या सर्व इच्छा या एकाच गोष्टीच्या प्राप्तीसाठी असतात.

ती गोष्ट म्हणजे सुख. 

सुख प्राप्तीसाठी ३ गोष्टी लागतात. 

1) संपत्ती, 2) आरोग्य (शरीरिक स्वास्थ्य)   3) स्वभाव  / वर्तन (मानसिक स्वास्थ्य)

या पैकी आपण संपत्ती प्राप्तीसाठी खूप कष्ट घेतो, आरोग्यासाठी काही प्रमाणात. पण स्वभाव या गोष्टीकडे

आपले विशेष लक्ष नसते. यावर सविस्तर विचार केल्यानंतर आपण असे पाहिले की योग्य पद्धतीने

आत्मपरीक्षण आणि उत्कृष्ठ स्वभाव घडविणारे शिक्षण याची आवश्यकता आहे. 

मनाच्या योग्य इच्छा आणि त्या प्रत्यक्षात येण्यासाठी शरीराचा योग्य उपयोग हे आपल्याला अधिक समजून घेणे

आवश्यक आहे. याचा सविस्तर, सखोल शास्त्रशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ विचार स्वामीजींनी योग ग्रंथात मांडला

आहे. 

श्रेयस  प्रेयस . 

माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते 

ज्यात काही सोपे सुखदायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. 

अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक 

मार्ग निवडते आणि सोपा व सुखदायक मार्ग डावलतो. 

मनाची ठेवण बदलल्याशिवाय सुधारणा नाही

आपल्या मध्ये अनेक वाईट गोष्टी असू शकतात. 

पाप कळत/नकळत घडलेले असू शकते. या सर्वाचा सकारात्मकतेने 

आपण स्वतः शोध घेतला पाहिजे. वाईट कमी करण्यासाठी

सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. 

स्वतःची वर्तन शुद्धी (आचार) व या ज्ञानाची माहिती इतरांना देण्याचा 

श्रामानंद (प्रचार) या दोन पावलांनी चालत राहिले तर आपली प्रगती होते. 


मानव हा विश्वाचा अतिसूक्ष्म घटक. आणि म्हणून विश्व नियम मानवी जीवनास लागू होतात. 

विश्व हे नियमांनी चालते. विज्ञानातील खाली दिलेले दोन सिद्धांत मानवी जीवनास कसे लागू पडतात, याचा विचार

 हे स्वामीजींच्या कार्याचे एक वैशिष्ठय आहे. 

१. कार्य कारण भाव , गतीस प्रतिगती. (न्यूटन चे गती नियम). 

Every action has a reaction equal and opposit . 

२. समता (कृतज्ञता),. Entropy  २ nd law of  Thermodynamics 

Energy flows from higher to lower level till it attains Entropy. 


विश्व नियम पालनाने मानव जीवन सुखी होऊ शकेल का ? आणि त्यासाठी काय करावे.. 

हा विचार या पाठात ऐका. 



विजय रा. जोशी. 







Thursday, May 23, 2024

 योग ग्रंथ पाठ ९,  १७, एप्रिल २०२४,  इच्छा पूर्ती. १/३  ध्वनी फीत .null 







सारांश 

“इच्छापूर्ती” साठी जन्म झाला.

जन्‍म घेणे लागे वासनेच्‍या संगे । तेची झाली अंगे हरीरुप॥   .....  हरीपाठ. 

इच्छा पूर्ती : इच्छा जरी अनेक असल्या तरी त्या सर्व एकाच गोष्टीसाठी, ... ती गोष्ट      “सुख” !

जीवनाचा सामान्य हेतू  'सुख शोधणे’   हा असतो. 

वय कोणतही असो, सुखाचा शोध घेणारी पावलं कधीच थबकत नाहीत. 

मात्र जीवनाचा असामान्य हेतू ‘शांतीपूर्ण समाधान शोधणे’ हा असला पाहिजे.

मुळात समाधान ही सुखाच्या पलीकडची मनाची अवस्था आहे. समाधान म्हणजे, संतोष असणारी मनाची अवस्था.

म्हणजे मनाची शांती, संतुष्टता. 

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥

सुख हवे दुःख नको. (मनाचा स्थायीभाव) 

जीवन किती सुखी आहे ?

“सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे”. 

“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनाला तूच शोधून पाहे”. 

विज्ञान प्रगत झाले, तंत्रज्ञान विकसित झाले, मानवी जीवन सुखी झाले का?

जग जवळ आले, माणसे किती जवळ आली ?

माणूस = मन (अजड) + शरीर  (जड).

 यात मन ठरवते आणि शरीर कार्य करते म्हणून माणूस समजण्यासाठी त्याचे मन समजणे महत्वाचे

आहे.  विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही महत्वाचे आहे , याचा समन्वय हे  स्वामीजींच्या कार्याचे

वैशिष्ठय आहे. 

माणसाचे मन स्वभावातून , वर्तनातून व्यक्त होते,  चारित्र्यातून  कळते. 

आयुष्यातील सुखासाठी / यशासाठी मनाचे शिक्षण ... जे विज्ञानाच्या माध्यमातून मनशक्ती केंद्र देते. 

इच्छा पूर्ती / सुख प्राप्ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा आणि पुढील दोन पाठ., 

.. आपल्याला कदाचित अधिक विचार प्रवृत्त होण्यासाठी काही नवीन Insight देतील असे वाटते. 




विजय रा जोशी.