Showing posts with label तंत्रज्ञान. Show all posts
Showing posts with label तंत्रज्ञान. Show all posts

Thursday, May 23, 2024

 योग ग्रंथ पाठ ९,  १७, एप्रिल २०२४,  इच्छा पूर्ती. १/३  ध्वनी फीत .null 







सारांश 

“इच्छापूर्ती” साठी जन्म झाला.

जन्‍म घेणे लागे वासनेच्‍या संगे । तेची झाली अंगे हरीरुप॥   .....  हरीपाठ. 

इच्छा पूर्ती : इच्छा जरी अनेक असल्या तरी त्या सर्व एकाच गोष्टीसाठी, ... ती गोष्ट      “सुख” !

जीवनाचा सामान्य हेतू  'सुख शोधणे’   हा असतो. 

वय कोणतही असो, सुखाचा शोध घेणारी पावलं कधीच थबकत नाहीत. 

मात्र जीवनाचा असामान्य हेतू ‘शांतीपूर्ण समाधान शोधणे’ हा असला पाहिजे.

मुळात समाधान ही सुखाच्या पलीकडची मनाची अवस्था आहे. समाधान म्हणजे, संतोष असणारी मनाची अवस्था.

म्हणजे मनाची शांती, संतुष्टता. 

मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥

सुख हवे दुःख नको. (मनाचा स्थायीभाव) 

जीवन किती सुखी आहे ?

“सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे”. 

“जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मनाला तूच शोधून पाहे”. 

विज्ञान प्रगत झाले, तंत्रज्ञान विकसित झाले, मानवी जीवन सुखी झाले का?

जग जवळ आले, माणसे किती जवळ आली ?

माणूस = मन (अजड) + शरीर  (जड).

 यात मन ठरवते आणि शरीर कार्य करते म्हणून माणूस समजण्यासाठी त्याचे मन समजणे महत्वाचे

आहे.  विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही महत्वाचे आहे , याचा समन्वय हे  स्वामीजींच्या कार्याचे

वैशिष्ठय आहे. 

माणसाचे मन स्वभावातून , वर्तनातून व्यक्त होते,  चारित्र्यातून  कळते. 

आयुष्यातील सुखासाठी / यशासाठी मनाचे शिक्षण ... जे विज्ञानाच्या माध्यमातून मनशक्ती केंद्र देते. 

इच्छा पूर्ती / सुख प्राप्ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा आणि पुढील दोन पाठ., 

.. आपल्याला कदाचित अधिक विचार प्रवृत्त होण्यासाठी काही नवीन Insight देतील असे वाटते. 




विजय रा जोशी.