Sunday, October 9, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 186 ते 190 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८६-१९०. 

परम वस्तूचा पत्ता, परमात्म्याचा  समर्थ आपल्याला सान्गताहेत. म्हणतात तो तुझ्या जवळच सानिध्यात आहे. 

त्याचा वियोग  सहन न होऊन तू त्याला तळमळीने जेव्हा हाक घालशील तेव्हा तो लगेच तुला भेटेल. 

या विश्वात प्रचंड सु-रचना, शिस्त , अनुशासन आहे. पंचमहाभूतांचे कार्य अतिशय सुसूत्रपणे हे सर्व विश्व निर्माण

करते. पण हे सर्व करणारी जी शक्ती आहे (निसर्ग / प्रकृती), ती त्या सर्वांच्या पलीकडे आहे. 

अस्तित्वहीन असा तो परमात्मा आहे. 

या विशाल विश्वात आपण माणसांनी आपली दृष्टी संकुचित ठेवली आहे. 

अन म्हणून आपल्याला हे सत्य न दिसेनासे झाले.

यावर उपाय म्हणजे , आपली धारणा, जी असत्यावर आधारित आहे ती बदलणे,  वृत्ती बदलणे हा आहे.

पंचमहाभूतांनी समृद्ध असलेल्या या सृष्टीत आपण आकंठ बुडालेले असतो. आणि त्यामुळे सहाजिकच दृश्य जग 

हेच सत्य असा आपला घट्ट समज असतो. पण ते खरे नाही. 

आसक्ती सोडा. जगाकडे पाठ फिरवून रुक्ष जीवन जगू नका,  पण त्यास सर्वस्वही मानू नका. 

समर्थ येथे सांगतात कि दृश्याचे ते बंधन ज्ञान शस्त्राने  तोडावे. 

ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |  पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान                        

आपली व्यवहारातील ज्ञान-संकल्पना अध्यात्मात उपयोगी नाही.

समर्थ म्हणतात , ज्याने मायेच्या योगाने ही सृष्टी रचना केली तोच देव आहे असे ओळखावे .त्याला पाहता आले तर

जीवाच्या मागे लागलेली संसारपीडा संपते व मोक्ष प्राप्त होतो . वाणीचे मूळ स्थान जी परावाणी ती सुध्दा त्याचे वर्णन

करू शकत नाही. परावाणी च्या तो पलीकडे आहे. तो वाचातीत आहे. 

भ्रम ,माया या देवाला स्पर्श करू शकत नाही. 

निर्गुणाला कल्पित जावे असे समर्थ सांगतात. निर्विकल्प असे स्वरूप आपल्यात भरून आहे . 

अशी कल्पना करून आपला अहंभाव सोडायला समर्थ सांगतात.   अध्यात्मातील या सर्व संकल्पना खूप गहन

 आहेत पण समर्थ त्या कशा सोप्या करून सांगत आहेत ते आपल्यास या ध्वनिफितीत कळेल.    ... श्रीराम !


विजय रा. जोशी. 

                   


No comments:

Post a Comment