Thursday, October 20, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 196 ते 200 :  ध्वनिफीत :





सारांश - श्लोक  : १९६ -२००. 

संपूर्ण आसमंतात वावरत असलेल्या अणुरेणूंमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर-तत्वाला श्रीसमर्थ राघव असे

 संबोधतात  आणि म्हणतात की या राघवाने व्यापल्यामुळे  आसमंतात रिकामी अशी जागाच उरलेली नाही.

राघवाचे रूप कसे आहे हे सांगताना समर्थाना आकाशाची आठवण होते. 

मन आभाळा एवढे विशाल केले, स्वतःशी मर्यादित आपले  भावना/विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले,

तर अर्थात आपण समर्थांच्या / रामाच्या जवळ जाऊ. आणि त्याच्या सानिध्याने आपल्या सर्व भव-चिंता, 

संसार-काळज्या नष्ट होतील. आपण भयातीत होऊ. आणि भयातून पूर्ण मुक्ती हाच मोक्ष असतो. 

परमात्मा आकाशा  सारखा आहे असे सांगतात,  नंतर ती उपमा अपुरी आहे असंही सांगतात. उपमा हि कधीच

 पूर्णत्वाने घेता येत नाही, फक्त समजून घेण्यास  त्या उपमा मदत करतात. 

नभाच्या मर्यादेत तो नाही. तो सर्वत्र ओतप्रोत आहे, म्ह्णून त्याला मर्यादित करता येत नाही. श्रीरामाचे रूप विस्तीर्ण,

अतिशय पुरातन असे आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. अतिशय गूढ असे हे ईश्वरतत्व आहे. 

पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचे ते अद्वितीय असलेले रूप सुलभपणे समजून येते. 

ज्ञान शब्दांनी आपण ऐकतो, नंतर अनुभवाने त्याची प्रचिती येते तेव्हा ते आकळते. 

मग साक्षी अवस्थाही आटून जाते. ध्यानात उन्मनी अवस्था येते त्यात दिवसाचे क्षण होतात. 

कृतार्थतेची अनुभूती येते .         श्रीराम !!


विजय रा.जोशी. 





No comments:

Post a Comment