Wednesday, August 23, 2023


श्लोक २०१ - २०४ 




सारांश 

आत्मज्ञाना नंतर अंतरात होणारी क्रान्ति समर्थ या पुढील ५ श्लोकात सांगत आहेत. आपण खरे कसे आहोत त्या पासून (खऱ्या मी ) आपण आपल्यला काय खरे मानतो , समजतो (खोटा मी), यातील अंतर हेच ते द्वैत आहे. यावर उपाय एकांत आहे. एकाच अंत करणे आहे, आपल्यातील खोटा मी सम्पवणे आहे. हा एकांत मिळण्यासाठी उपाय “ध्यान” आहे

साधक परमात्म भेटीचे वर्णन केले आहे. दोघे एकरूप झाले, गंगा, यमुना एकरूप झाल्या, संगम झाला. द्वैत सरले, अद्वैत घडून आले.

सत्य ज्ञान प्राप्ती जरी जीवनात अवतरली तरी साधनेचे महत्व, प्रयत्नांचे महत्व कधीही समाप्त नाही. सत्संगती आणि सतशास्त्र श्रवण हे अखंड चालू राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यात कर्तव्य पालनासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी जो जीवन प्रवास आवश्यक आहे तो तर प्रत्येकाला करावाच लागेल, पण त्या व्यतिरिक्त अन्य संग मनाच्यानिश्चयाने सोडून द्यावेत. आणि अन्य सर्व काळ संत संगतीत, त्यांच्या विचारांच्या श्रवणात, वाचना, चर्चेत घालवावा.

साधना बीज सद्गुरू आपल्या अंतरात लावतो आणि  मग आपण आपल्या संकल्पाने, निष्ठेने, श्रद्धेने सातत्याने सर्व अडचणींवर मात करून जर ते बीज जोपासले, वाढवले तर या मानवी जीवनात सर्वांगीण प्रगती घडून आपला जन्म सर्वार्थाने सार्थकी लागतो. मृत्यू नंतर देखील सदगती मिळते. संत संगती साधकाला भव बंधनातून सोडविते आणि शरीरबुद्धी आत्मबुद्धीत पालटून अद्वैत साधनेकडे प्रगती घडते. 


विजय रा.  जोशी

No comments:

Post a Comment