Thursday, August 31, 2023

N. P. 10 /11               ८ मार्च     

                                                    


नर्मदा पुरमहून प्रस्थान, नेहमी प्रमाणे ६ ला  प्रवास सुरू


आज ओंकारेश्वर ला जायचे आहे. वाटेत कोणा थोर 

पुरुषाच्या समाधी मंदिराचे दर्शन  आहे.

हा additional भाग "स्पेशल केस" म्हणून

आमच्यासाठी add केला आहे असे सांगितले गेले. 



श्री धुनीवाले बाबा , ज्यांच्या अनेक वेळा झालेल्या

मृत्यूचे गूढ आणि त्यांचे कार्य

याविषयी देसाई सिनियर यांनी माहिती दिली.

त्यांनी या बाबांवर एक पुस्तक लिहिले आहे. 

असे म्हटले जाते की श्री दादाजी होशंगाबाद मध्ये

दिगंबर रूपात रामलालदादाच्या नावाने राहत |

तिथे त्यांनी अनेक चमत्कार दाखवले |

तेथे ते तीन वर्षे राहिले आणि नंतर त्यांनी विहिरीत

आपला देह त्याग केला |

काही दिवसांनंतर पुन्हा सोहागपूरच्या इम्लिया जंगलात

ते दिगंबर रूपात

एका झाडाखाली धुनीभोवती रममाण होऊन बसलेले दिसले

|

गावकऱ्यांच्या आग्रहास्तव नर्मदा किनाऱ्यापासून

जवळपास १०-१२ किलोमीटर

दूर असलेल्या नर्सिंगपूरला रवाना झाले तेथेही त्यांनी आपले

अद्भुत चमत्कार दाखवले आणि काही काळानंतर

समाधी घेतली

ते पुन्हा सीसीरी संदुक ग्राम जिल्ह्यात रामफल नावाने

प्रकट झाले .

जवळपास १९०१ मध्ये ते लोकांचे दुःख दूर करण्यासाठी

आणि लोकांना पापातून मुक्त करण्यासाठी साईखेडा

येथे आले तिथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले

आणि अगणित चमत्कार दाखवले |

साई खेड्यात श्री दादाजी पहिल्यांदा दिसले तेव्हा ते

कोणाच्यातरी घराच्या

छतावर उभे असलेले दिसले | तेथून ते मातीचे तुटलेले कौल

खाली उभ्या असलेल्या मुलांना मारत असत |

त्यामुळे मुले गोंधळ करायची आणि म्हणायची,

“अरे पगला बाबा आ गया, पगला बाबा आ गया”

(पागल बाबा आला , पागल बाबा आला)

पण ज्या रोग्याला त्यांनी मारलेला कौल किंवा दगड

लागायचा तो रोगातुन मुक्त व्हायचा |

साईखेड्यातील मुले श्री दादाजींच्या

मागे पुढे फिरायचे आणि त्यांना पागल बाबा म्हणून त्रास द्यायचे |

मुलांना दूर पळवण्यासाठी श्री दादाजी हातात एक डंडा

(काठी) ठेवू लागले |

तेव्हापासून लोक त्यांना ‘डंडेवाले दादाजी’ म्हणू लागले |

ज्यांच्यावर त्यांचा हा डंडा

पडायचा त्यांचा उद्धार व्हायचा | ते दिवसभर जंगलात

किंवा शेतात फिरायचे आणि गाई चारायचे |

संध्याकाळी एका सुकलेल्या आंब्याच्या झाडाच्या

ढोलीत बसायचे | एकदा श्री दादाजीनीं त्या सुकलेल्या

झाडाच्या लाकडांची धुनी पेटवली आणि तेव्हापासून लोक

त्यांना ‘धुनीवाले दादाजी’ असे सुद्धा म्हणू लागले |

30 वर्षांपर्यंत श्री दादाजी साईखेडा

आणि त्याच्या आसपासच्याच्या परिसरात फिरायचे आणि

जेथे त्यांची इच्छा व्हायची

तेथे विश्राम करायचे | ते कधी नर्मदाकिनारी, कधी शेतात,

कधी झाडाखाली

तर कधी कोणाच्या घरात विश्रांती घ्यायचे |

श्री दादाजींनी कधी संसारिक साम्राज्य स्थापन केले नाही |

त्यांची गृहस्थी म्हणजे डंडा, चिमटा, जलपात्र आणि कांबळ

अशी अद्वितीय होती |

ज्यांना कुणाला श्री दादाजींकडून शिवी मिळायची

किंवा डंडा पडायचा त्याचे कल्याण व्हायचे |

याप्रमाणे त्यांची एवढी प्रसिद्धी झाली की एक दिवस

स्वतंत्रता सेनानी मदन मोहन मालवीय हे

पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी

यांना दादाजींकडे दर्शनासाठी घेवून आले |


प्रथम महात्मा गांधीजींनी नमस्कार केला |

पण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नमस्कार केले तेव्हा

श्री दादाजी जे सदैव रूद्र रूपात

असायचे त्यांनी नेहरूजींना डंडा मारून सांगितले की

“यह मोडा लायक है, याहै स्वराज दी है” |

(हा व्यक्ती लायक आहे | यांना स्वराज्य दिले)

आणि त्यांना आपला डंडा दिला |


सन १९७७ मध्ये इंदिरा गांधी

२४ अकबर रोड ए |आय |सी |सी हेडक्वार्टर मध्ये

राहत होत्या |

तेव्हा श्री श्री १००८ श्री छोटे सरकारजी त्यांना

दर्शन देण्यासाठी गेले |


आणि इंदोरचे श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी

दिलेला मोगऱ्याचा गजरा त्यांच्या हातात बांधून


इंदिराजींना सांगितले की

इंदोरच्या श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी निरोप दिला

आहे की,

“आप फिरसे प्रधानमंत्री बनोगी”

|(तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री बनाल)

त्यावेळेस श्री छोटे सरकारजींनी त्यांना आठवण करून दिली

की त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरूजींना साईखेड्यात

श्री बडे दादाजींनी डंडा मारून त्यांना तो डंडा दिला होता |

इंदिराजींनी ही गोष्ट मान्य केली

आणि श्री श्री 1008 श्री छोटे सरकारजींना आपल्यापूजाघरात नेऊन त्यांना तो डंडा दाखवला |

इंदिराजींनी सांगितले की,

“माझे वडील पंडित जवाहरलाल नेहरू त्या डंड्याला

आपल्या काखेत दाबून नेहमी

आपल्याजवळच ठेवायचे” | काही महिन्यानंतरच इंदिराजी

चिकमगलूर मधून काँग्रेसमधूनर्ण बहुमताने निवडून पुन्हा एकदा भारताच्या

प्रधानमंत्री बनल्या |)


देसाई (पप्पा) यांची  १५-१६ अशी विविध विषयांवरील

पुस्तके प्रसिद्ध असून त्यातून होणारे सर्व उत्पन्न ते

श्री शंकर महाराज प्रतिष्ठान या त्यांनी स्थापन केलेल्या

संस्थेला देतात. संस्था  शंकर महाराज यांच्या

कार्याचा प्रचार करते. 


 


धुनीवाले बाबा यांच्या मठात  बऱ्याच लोकांनी अखंड सुरु

असलेल्या धुनीत

पाणी नसलेल्या नारळाचे हवन केले.

तेथे मागितली मागणे पूर्ण होते असा  विश्वास किंवा

लोकांची श्रद्धा आहे.

याच संकुलाच्या भोजन गृहात आमच्या जेवणाचे

आयोजन केले गेले.

येथे रोजची बुफे सिस्टम नव्हती.

स्वतः रागिणी ताई आणि प्रभंजन वाढप करीत होते. 


वाटेत प्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार

यांचे स्मारक बसमधूनच पाहिले.

पुढे ओंकारेश्वर हॉटेल ला आलो. हे  हाटेल

जेथे आम्ही सुरवातीस राहिलो होतो,

गावापासून १५ कि,मी, दूर आहे, सर्व हॉटेल

दुसऱ्या दिवशी लग्न समारंभासाठी

बुक असल्याने त्यांनी आमची under construction

असलेल्या पर्यायी जागेत सोय केली.

काही गोष्टी सोडल्या तर हे हि हॊटेल ठीक होते. 



  N. P. 10 /12                                                                     पुढे 


 

No comments:

Post a Comment