Saturday, July 20, 2024

 योग ग्रंथ पाठ १६, अनुबंधचतुष्टय व षडलिंगे,   ५ जून २०२४. 





सारांश  

कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करतांना तो मुख्यत्वें कोणासाठी आहे, त्यात पुस्तकाच्या वाचण्याने 

काय लाभ होणार या प्रश्नांची उत्तरे प्रथमच समजणे माणसाला आवडते. म्हणून परमार्थशास्त्राच्या ग्रंथात या

 विषयांचा संपूर्ण विचार पद्धत आहे. यालाच अनुबंध म्हणतात.(अनुबंध म्हणजे मन वेधून घेणारी बाब.). 


अनुबंध - जे बांधून ठेवते ते, चतुष्टय - चार / चौकट 

१. ग्रन्थ अभ्यासाचे अधिकारी कोण ? 

२. विषय काय?

३. प्रयोजन काय ? 

४. संबंध काय ? विषयाचे प्रमाण मांडतांना त्याचा विषयाशी संबंध असावा.

      

षड्लिंगे.

साधकांनी शास्त्रग्रंथ खाली दिलेल्या  सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय.

 शास्त्रग्रंथ सहा बाबींकडे चांगले लक्ष ठेवून ऐकावयाचा असतो,ज्यांना ग्रंथाची षड्लिंगे म्हणतात. 

म्हणजे चांगल्या ग्रंथाच्या सहा खुणा,सहा विशेष. जे अभ्यास करतांना लक्षात घ्यायचे असतात. 

ही षड्लिंगे अशी -

१ ) उपक्रम आणि *उपसंहारामधील मेळ (एकवाक्यता) -- वर्तुळ काढायला सुरुवात केल्यावर ते जेथून

      सुरू होते तेथेच येऊन   पेन्सील थांबते (असे झाले पाहिजे.). याचप्रमाणे ग्रंथाच्या सुरुवातीला 

       ग्रंथ ज्या उद्देशाने सांगितलेला असतो तो उद्देश अखेर संपूर्ण झाला का ते पाहणे म्हणजे 

       उपक्रम-उपसंहारांची एकवाक्यता. *(अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर. तात्पर्यवजा सार).

2). अभ्यास - श्रवण वगैरे साधने; विवेक, वैराग्य वगैरे अंगी बाणवणे; अनुसंधान आणि नित्य

     सदाचरण इ. सांभाळणे याला       अभ्यास म्हणतात. फलप्राप्तीसाठी सांगितलेले कायिक, वाचिक 

      व मानसिक कर्म म्हणजे अभ्यास. ग्रंथाचे वाचन, त्यावर विचार व त्यानुसार आचरण साधना.

    (उदा. नामसाधना, ध्यानसाधना इ.) हे परत परत करणे म्हणजे अभ्यास. 

३) अपूर्वता - इतरत्र कोठेच न मिळणारे असे जे विशेष त्या ग्रंथातून मिळते त्याला  अपूर्वता   म्हणतात.  

4)   फल - ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार त्याला फल म्हणतात. 

५)  अर्थवाद - वाचकांना खेचून घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी जरूर त्याहून फुगवून सांगणं 

               अतिशयोक्ती करणे म्हणजे  अर्थवाद होय.

६) उपपत्ती - सिद्धान्त सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केला जातो,  त्याला उपपत्ती म्हणतात. . 


साधकांनी शास्त्रग्रंथ वरील सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय. 

पुण्यप्राप्तीच्या हेतूने, कुतुहल भाव कळण्यासाठी ऐकणे याला शास्त्रात श्रवण समजत नाहीत. 


या संदर्भात योग ग्रंथांचा अभ्यास करण्याची शक्यता आणि त्याची उपयुक्तता यावर काही विचार उदाहरणांसह या विवेचनात आपल्याला ऐकायला मिळेल. 


विजय रा. जोशी 







Sunday, July 14, 2024

  योग ग्रंथ पाठ १५,  तत्वज्ञानाचे सार – प्रार्थना,  २९ मे २०२४. 





सारांश : 

माणसाला काही उच्च ध्येय साध्य करायचे असेल तर मनाला शांत, निःश्चल. एकाग्र करावे लागते.

अशा प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. पूजा, मंत्र, जप, प्रार्थना, ध्यान अशा मार्गाने साधना होऊ शकते. 

या पैकी ‘प्रार्थना’ या साधनाचा संक्षिप्त विचार आपण करणार आहोत. प्रार्थना फक्त करायची

नसते तर ती जगायचीही असते.चांगल्या विचारांच, त्यातील अर्थाचं चिंतन करणे व तसे वर्तन स्वतःच्या आयुष्यात

प्रत्यक्षात जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना जगणे. ही वैयक्तिक प्रार्थना प्रक्रिया. शांत स्थितीत, शुध्द

अंतःकरणाने, एकत्रितपणे सर्वांच्या कल्याणासाठी केलेले उच्चारण म्हणजे सामुदायिक प्रार्थना. 

अशी प्रार्थना ही अधिक शक्तिदायी असते.प्रार्थना शब्दांनी होते. मेंदूतून शब्द निर्माण होतात. त्यामध्ये व्यक्तीचा

हेतू मिसळतो व त्याचा परिणाम मेंदू व शरीरावर होतो. चांगले विचार मनात ठसले, वर्तनात उतरले की शरीर

 बदलते. 

१. आत्मचिंतन प्रार्थना : साध्य - स्व - कल्याण. 

                                  साधन -   प्रार्थना विचार. 

                                  कृती    -   परिस्थिती आहे तशी स्वीकारणे, ईश्वरी व्यवस्थेला शरणागत असणे. 

                                                 सुख / दुःख एकाच भावनेने स्वीकारणे. 

२. यज्ञ हवन प्रार्थना  :     साध्य  - आत्मज्ञान, 

                                     साधन - प्रार्थना विचार. 

                                     कृती   - हव्यास कमी करणे, स्वतःचे गुण, दोष आठवून अग्नीस शरण जाणे, 

                                             त्याने शक्ती, शांती जीवनात स्थिर होईल. 

३. समाज सेवेची प्रार्थना     साध्य - समाज कल्याण . सर्व कल्याण , निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते.

                                      साधन - प्रार्थना विचार . 

                                       कृती -    आपण अनेक ज्ञात/अज्ञात शक्तींचे देणे लागतो, 

                                                     ते फेडण्यासाठी संकल्पानुसार निष्काम कर्म करणे.

प्रार्थनेचे महत्व, साधन आणि साध्य साधण्यासाठी करावयाचे प्रयत्न याचे सविस्तर विवेचन या पाठात ऐकायला

मिळेल. 


विजय रा. जोशी. 

  










Thursday, July 4, 2024

 योग ग्रंथ पाठ १४, ध्यान पाठ ३, शरीराशी संवाद  २२ मे  २०२४. 





सारांश 


योग म्हणजे क्षणा-क्षणाला शरीराची बातमी घेत, म्हणजेच भावना/विचार  स्थितीचे  आत्म-परीक्षण करीत,  

मनाचा वेग  (गती , विचार / भावनांची तीव्रता) कमी करायचा प्रयत्न. (साधना). 

अनंत जन्माच्या पूर्व संस्काराचे रंग (त्रिगुण) अंतःकरणावर चढले असतात. म्हणून हे सर्व वासना, संस्कार पुसून

टाकणे हे साधनेचे कार्य आहे. अंतःकरण स्वच्छ, सात्विक झाले की जाणीव शुद्घ होते. पारमार्थिक प्रगतीसाठी हे

आवश्यक आहे.

मानवाचे अंतःकरण, जाणीव सर्व प्राणी सृष्टीत विकसित आहे.

मी म्हणजे देह आहे असे वाटणे हि देहबुद्धी, मी म्हणजे आत्मा आहे असे वाटणे म्हणजे आत्मबुद्धी 

देहबुद्धी विवेकाने , प्रयत्नाने आत्मबुद्धीत बदलणे ही  साधना आहे. 

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।

देहातीत ते हीत सांडीत गेला॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।

सदा संगती सज्जनाची धरावी II     मनाचे श्लोक ॥१६३॥

आपल्याला सुख जेव्हा बाह्य गोष्टींमुळे मिळते असे वाटते ते ज्ञान खरे नाही. इष्ट गोष्ट प्राप्त झाल्याने , 

बुद्धी क्षण काळ निवृत्त होते. ते सुख 

धी  + न = ध्यान .  म्ह्णून बुद्धी ध्यान प्रक्रियेत शून्य करायची, 

म्हणजेच विचारशून्य व्हायचा प्रयत्न संकल्पाने करायचा. 


एक इच्छा पूर्ण झाली की अनेक इच्छा पुढे येतात, अंतःकरण परत क्रियाशील होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध

हे भोग विषय आणि यश, सत्ता, संपत्ती, कीर्ती, अधिकार, प्रतिष्ठा अशा अनेक न संपणाऱ्या इच्छा सर्व जागृत

अवस्था काळात असतात.  प्रयत्नपूर्वक वासना कमी करत नेणे हे साधनेचे कऱ्य आहे. त्यासाठी साधकाने 

श्री गुरूंच्या मार्गदर्शनात पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.


स्वामीजी चौवार्षिक वर्गात सांगतात. शक्ती मिळविण्यासाठी ५ गोष्टी केल्या’

1) त्याग पथ्य. 

2) तप पथ्य

3)  अभ्यास (ज्ञान)

4) योग्य शांती प्रतिक प्रकाग्रता           

5) योग्य शक्ती प्रतिक एकाग्रता. 

तुम्ही वरिल ५ गोष्टी करा. तुम्हाला ही तसा अनुभव येईल. ते करता  येत नसेल तर विश्वास ठेवा 

व सांगितल्या गोष्टी करा.

शरीराशी संवाद या ध्यान पद्धतीची सविस्तर माहिती  या पाठात आपण ऐकू शकाल. 


विजय रा. जोशी. 















Sunday, June 16, 2024

 .योग ग्रंथ पाठ १३, ध्यान पाठ २, शरीराशी संवाद , १५ मे  २०२४. 





“शरीराशी संवाद”  बद्दल थोडक्यात महत्वाचे. 


शरीराशी सुचविलेला संवाद , ध्यानासाठी बसल्यावर तुमच्या मनात फक्त पार्श्वभूमीवर ठेवा. 

नंतर मन तटस्थ करून राहा. कोणते तरी एक माध्यम निश्चित  करा. 

उदाहरणार्थ श्वास, वर्ण , चक्र इत्यादी. किंवा जे दिसेल , जे ऐकू येईल ते तटस्थपणे पहा. ऐका .

कसलाच हट्ट धरू नका. ऐकलेल्या किंवा वाचलेल्या पार्श्वभूमीवर तुमच्या शरीरात उमटेल ते उमटू

द्या. न उमटले तरी आत परिणाम होत असेल. कसलीही चिंता बाळगू नका. 

फक्त दिलेली पथ्य पाळा . 

ध्यान हे मनाच्या अस्थिरतेत साधत नाही. अशा वेळी पुन्हा, पुन्हा आपल्या मनाची समजूत काढावी.

मनाशी बोलावे. स्वतःशी बोलणे, स्वतःशी नीट (समतेच्या) वागण्याचे आश्वासन देणे म्हणजे ध्यान

आहे.   शरीरातल्या ध्यानासाठी, संवाद साधण्यासाठी तुम्ही रोज उत्सुकतेने बसले पाहिजे. 

या कल्पनेचा नवा आनंद तुम्हाला खूप सुखावेल.  दुसऱ्या बाजूने तुम्ही (सांसारिक जीवनात असताना) ध्यानात

अतिशय गुंतून गेलात तर तो अतिरेक ठीक नव्हे. 

तुमच्या बुद्धीस पटवीत पटवीत शक्ती मिळविण्याची ही एक स्वावलंबी प्रक्रिया आहे. नीट घेतली तर धोक्याचा प्रश्न

उरत नाही. थोडेसे त्याग पथ्य, थोडेसे चिंतन पथ्य निश्चय पूर्वक केलेत तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुखाच्या

शिखरावर जाल. जगातील सुखे तुम्हीं जिंकाल पण ती सुखे तुम्हाला जिंकू शकणार नाहीत , 

अशी एक गोड अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. 

एक अनुभव घेऊन पाहा. 



विजय रा. जोशी 




Saturday, June 8, 2024

योग ग्रंथ पाठ 12, दिनांक ०८/०५/२०२४,  ध्यान पाठ १. 







अभ्यास , चिंतन सूत्र . 

इच्छापूर्ती सुखासाठी. .... सुखासाठी वर्तन महत्व. ...... वर्तनाने समता, 

ती स्वार्थ वृत्तीने सहज साधत नाही म्हणून छोट्या त्याग संकल्प ने सुरवात करून  त्यात हळूहळू प्रगती साधणे . 

समतेचा संकल्प म्हणजे समतेसाठी वर्तन (आपल्या पलीकडे बघणे)

बाह्य आणि अंतर समता. .... बाह्य जगात समता, निरपेक्ष त्यागाने (श्रम, धन) .... अंतर जगात समता, 

पेशी विज्ञानाने. ध्यान साधनेने. 

संघटित मनाने पेशी मनाचा विचार करून आपला अनावश्यक अहंकार , सुख कल्पना,  

(इंद्रिये सुख , सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा,  हव्यास) हे  क्रमाने कमी करणे.

 संकल्प सुरवात ६.२५ % ने करून त्यात वाढ. ... त्याने स्वार्थाकडून निस्वार्थ,

स्व केंद्रित वृत्तींकडून सर्व गामी वृत्ती करणे. 

मनाचे हव्यास आणि अहंकार कमी करून अंतर्गत समता स्वतःच्या जीवनात प्रस्थापीत करणे.

अंतर्गत समते साठी ध्यान, शरीराशी संवाद........ बाह्य समतेसाठी निष्काम कर्म 

सुखाच्या शोधार्थ माणूस सर्वत्र भटकत … असतो.  पण स्वतःच्या घराची ओढ, मांगल्य आणि स्वथता ही काही
 
वेगळीच असते. 

ध्यानावस्थेत माणूस असाच जणू घराच्या ओढीने स्वस्थ होतो.  स्वाभाविक सुख-शांती अनुभवतो, 

आपण कोण आहोत ते आनंदाने  पाहू लागतो. …    बाहेरच्या सुखावर अवलंबून रहात नाही. 

ध्यान आणि झोप.

दोन्ही विचार शून्य स्थिती.

झोपेत सुद्धा एक तऱ्हेची ध्यानावस्था. (शांत झोपेनंतर समाधान).

झोप म्हणजे नाईलाजाने झालेले ध्यान तर ध्यान म्हणजे सकाळी उठल्यावर  घेतलेली हेतुशुद्ध शांत जागृत-झोप. 


ध्यानाचे शारीरिक, मानसिक अनेक लाभ .... 

हे सर्व या पाठात सविस्तर ऐका ..... 




विजय  जोशी. 
 


Friday, May 31, 2024

  योग ग्रंथ पाठ ११, दिनांक ०१/०५/२०२४,  इच्छा पूर्ती ३/३ null




सारांश 

शरीराचे आरोग्य विविध parameters माध्यमातून डॉक्टर तपासून सांगू शकतात, 

मनाचे आरोग्य कसे तपासायचे?

मनाचे आरोग्य, चारित्र्यामधून, व्यक्तिमत्त्वातून, व्यक्तीचा नेहमीच्या वर्तनातून प्रकट होते. 

ते चांगले कि वाईट आहे त्या प्रमाणे परिणाम त्या त्या व्यक्तीस भोगावे लागतात.   

हे जे वर्तन घडते ते कसे घडते. ते चांगले होण्यासाठी काय करावे? कसे करावे? 

 सामाजिक प्रकृती आणि मनाचे आरोग्य.  

मानसिक शारीरिक प्रकृती प्रमाणे सामाजिक प्रकृतीही असते आणि ती सुदृढ नसली म्हणजे 

त्याचे व्यक्तीवर नकळत परिणाम होतात.  मानसिक आरोग्य नसले तर त्यामुळे व्यक्ती आणि समाज असे दोन्ही

 पातळींवर विघातक परिणाम होतात. स्व-केंद्रित वृत्ती असणे हे सामाजिक प्रकृती बिघडण्याचे मूळ कारण आहे.   

वैज्ञानिक संशोधनातून अनेक सोयी, यंत्रे , रोग निवारक औषधे यांची निर्मिती झाली,  अनेक रोगांचे उच्चाटन झाले

हे खरे असले तरी काही नवीन आजारही  निर्माण झाले असून हे आजार जेथे समृद्धी, प्रगती, तेथे वाढत आहेत 

हे ही खरे आहे. 

त्यासाठी मनाच्या प्रशिक्षणाने वर्तन बदल घडवून व्यक्ती-व्यक्तीतील सहकार्य आणि समर्पणाची भावना निर्माण

करण्याची गरज आज सर्वत्र  आहे. त्यातून बाह्य समता साधेल. 

पेशी विज्ञान आणि मनाचा शरीराशी संवाद. 

शरीरातील पेशींचे बंड तणावाचे बीज रोवते

मानवी शरीर लक्षावधी पेशींचे बनलेले आहे. यातील प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व असते. शिवाय प्रत्येक पेशीला

 तिचे स्वतःचे मन, इच्छा व जीवित हेतू असतो. आपल्या 'माईंड पॉवर' या ग्रंथात स्वामी विज्ञानानंदांनी हा विषय

 सविस्तर हाताळला आहे. यासाठी मनाचा शरीराशी संवाद ध्यान प्रक्रियेतून साधता येतो. त्याने अंतर्गत समता

 साध्य होते. 

सविस्तर एका.... 


विजय रा जोशी,. 

 

Monday, May 27, 2024

 योग ग्रंथ पाठ १०, दिनांक २४/४/२०२४,  इच्छा पूर्ती २/३.   





सारांश . 

मृत्यू समयी इच्छा बाकी असल्यास , जीव दुसरे शरीर घेऊन जन्म घेतो. (पुनर्जन्म). 

अनेक लोकांच्या अनेक इच्छा असू शकतात, त्या क्षणो क्षणी बदलू शकतात. 

इच्छा पूर्ती म्हणजे अशा सर्व इच्छा पूर्ण होणे. हे साध्य अशक्यप्राय आहे. 

आपण असे पाहिले की, इच्छा असंख्य असल्या तरी त्या सर्व इच्छा या एकाच गोष्टीच्या प्राप्तीसाठी असतात.

ती गोष्ट म्हणजे सुख. 

सुख प्राप्तीसाठी ३ गोष्टी लागतात. 

1) संपत्ती, 2) आरोग्य (शरीरिक स्वास्थ्य)   3) स्वभाव  / वर्तन (मानसिक स्वास्थ्य)

या पैकी आपण संपत्ती प्राप्तीसाठी खूप कष्ट घेतो, आरोग्यासाठी काही प्रमाणात. पण स्वभाव या गोष्टीकडे

आपले विशेष लक्ष नसते. यावर सविस्तर विचार केल्यानंतर आपण असे पाहिले की योग्य पद्धतीने

आत्मपरीक्षण आणि उत्कृष्ठ स्वभाव घडविणारे शिक्षण याची आवश्यकता आहे. 

मनाच्या योग्य इच्छा आणि त्या प्रत्यक्षात येण्यासाठी शरीराचा योग्य उपयोग हे आपल्याला अधिक समजून घेणे

आवश्यक आहे. याचा सविस्तर, सखोल शास्त्रशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ विचार स्वामीजींनी योग ग्रंथात मांडला

आहे. 

श्रेयस  प्रेयस . 

माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते 

ज्यात काही सोपे सुखदायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. 

अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक 

मार्ग निवडते आणि सोपा व सुखदायक मार्ग डावलतो. 

मनाची ठेवण बदलल्याशिवाय सुधारणा नाही

आपल्या मध्ये अनेक वाईट गोष्टी असू शकतात. 

पाप कळत/नकळत घडलेले असू शकते. या सर्वाचा सकारात्मकतेने 

आपण स्वतः शोध घेतला पाहिजे. वाईट कमी करण्यासाठी

सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. 

स्वतःची वर्तन शुद्धी (आचार) व या ज्ञानाची माहिती इतरांना देण्याचा 

श्रामानंद (प्रचार) या दोन पावलांनी चालत राहिले तर आपली प्रगती होते. 


मानव हा विश्वाचा अतिसूक्ष्म घटक. आणि म्हणून विश्व नियम मानवी जीवनास लागू होतात. 

विश्व हे नियमांनी चालते. विज्ञानातील खाली दिलेले दोन सिद्धांत मानवी जीवनास कसे लागू पडतात, याचा विचार

 हे स्वामीजींच्या कार्याचे एक वैशिष्ठय आहे. 

१. कार्य कारण भाव , गतीस प्रतिगती. (न्यूटन चे गती नियम). 

Every action has a reaction equal and opposit . 

२. समता (कृतज्ञता),. Entropy  २ nd law of  Thermodynamics 

Energy flows from higher to lower level till it attains Entropy. 


विश्व नियम पालनाने मानव जीवन सुखी होऊ शकेल का ? आणि त्यासाठी काय करावे.. 

हा विचार या पाठात ऐका. 



विजय रा. जोशी.