Showing posts with label शरीराशी संवाद. Show all posts
Showing posts with label शरीराशी संवाद. Show all posts

Sunday, June 16, 2024

 .योग ग्रंथ पाठ १३, ध्यान पाठ २, शरीराशी संवाद , १५ मे  २०२४. 





“शरीराशी संवाद”  बद्दल थोडक्यात महत्वाचे. 


शरीराशी सुचविलेला संवाद , ध्यानासाठी बसल्यावर तुमच्या मनात फक्त पार्श्वभूमीवर ठेवा. 

नंतर मन तटस्थ करून राहा. कोणते तरी एक माध्यम निश्चित  करा. 

उदाहरणार्थ श्वास, वर्ण , चक्र इत्यादी. किंवा जे दिसेल , जे ऐकू येईल ते तटस्थपणे पहा. ऐका .

कसलाच हट्ट धरू नका. ऐकलेल्या किंवा वाचलेल्या पार्श्वभूमीवर तुमच्या शरीरात उमटेल ते उमटू

द्या. न उमटले तरी आत परिणाम होत असेल. कसलीही चिंता बाळगू नका. 

फक्त दिलेली पथ्य पाळा . 

ध्यान हे मनाच्या अस्थिरतेत साधत नाही. अशा वेळी पुन्हा, पुन्हा आपल्या मनाची समजूत काढावी.

मनाशी बोलावे. स्वतःशी बोलणे, स्वतःशी नीट (समतेच्या) वागण्याचे आश्वासन देणे म्हणजे ध्यान

आहे.   शरीरातल्या ध्यानासाठी, संवाद साधण्यासाठी तुम्ही रोज उत्सुकतेने बसले पाहिजे. 

या कल्पनेचा नवा आनंद तुम्हाला खूप सुखावेल.  दुसऱ्या बाजूने तुम्ही (सांसारिक जीवनात असताना) ध्यानात

अतिशय गुंतून गेलात तर तो अतिरेक ठीक नव्हे. 

तुमच्या बुद्धीस पटवीत पटवीत शक्ती मिळविण्याची ही एक स्वावलंबी प्रक्रिया आहे. नीट घेतली तर धोक्याचा प्रश्न

उरत नाही. थोडेसे त्याग पथ्य, थोडेसे चिंतन पथ्य निश्चय पूर्वक केलेत तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुखाच्या

शिखरावर जाल. जगातील सुखे तुम्हीं जिंकाल पण ती सुखे तुम्हाला जिंकू शकणार नाहीत , 

अशी एक गोड अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. 

एक अनुभव घेऊन पाहा. 



विजय रा. जोशी