Showing posts with label ध्यान. Show all posts
Showing posts with label ध्यान. Show all posts

Monday, October 28, 2024

  योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 10 .  Path 27 ,    25 September 2024.






सारांश : 

मेंदूतील निओकॉर्टेक्सला व्हेटोची सत्ता आहे असे मानले तर सर्टिफिकेशनचा अधिकार त्यालाच असलापाहिजे. जर ती सत्ता लिम्बिक बळकावू पहात असेल तर ते सर्व दृष्टीने अयोग्य आहे. म्ह्णून त्यास ताळ्यावरआणून योग्यमार्गी  लावण्याचे,  सतस्पर्श काम निओकॉर्टेक्सचे आहे, वस्तुतः त्या पलीकडे असलेल्या मनशक्तीचे आहे. 

निओकॉर्टेक्सचा सल्ला मानून ध्यानाला बसण्याची सवय करा म्हणायचे तर ती कशी करायची हा प्रश्न आहे.ध्यानाला बसले तर मन शांत न होता, सैरा वैरा फिरण्याचा जोर करते. मग काय करावे? कसे करावे. ??म्हणून येथे अनुभवाचा प्रांत सुरु होतो.  यावर कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे म्हंटले तर या प्रांतात कोणी उठून काहीही बोलावे, असा प्रकार आसल्याने त्यातून धोके निर्माण होऊ शकतात. 

म्हणून समोरच्या माणसाचे म्हणणे पत्करतांना विज्ञानाच्या (तर्कशुध्दतेच्या) ज्ञात अशा मर्यादेपर्येत तरी विषयव्यवस्थित तर्कशुद्ध मांडला आहे की नाही, हे पाहिले पाहिजे. तसा तो मांडला गेला असेल तर , जास्तीत जास्त त्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने प्रयोग केले पाहिजेत. त्यात कोठे काही फरक पडत आले तर त्यात योग्यदुरुस्त्या केल्या पाहिजेत. काही फरक “व्यक्ती तेवढ्या प्रकृती” या नुसारही पडू शकतात हेही लक्षात घेतले पाहिजे . 

स्वामीजी स्पष्टपणे लिहितात की - या सर्व मर्यादा लक्षात घेऊन मी माझे विवेचन केले पाहिजे आणि  त्या मर्यादेतच तुम्ही ते वाचले/ऐकले पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे ते विवेचन तर्कशुद्ध वाट असेल तर त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे. 

अधिक माहिती साठी पाठ ऐकावा. 



विजय. रा. जोशी. 







Sunday, June 16, 2024

 .योग ग्रंथ पाठ १३, ध्यान पाठ २, शरीराशी संवाद , १५ मे  २०२४. 





“शरीराशी संवाद”  बद्दल थोडक्यात महत्वाचे. 


शरीराशी सुचविलेला संवाद , ध्यानासाठी बसल्यावर तुमच्या मनात फक्त पार्श्वभूमीवर ठेवा. 

नंतर मन तटस्थ करून राहा. कोणते तरी एक माध्यम निश्चित  करा. 

उदाहरणार्थ श्वास, वर्ण , चक्र इत्यादी. किंवा जे दिसेल , जे ऐकू येईल ते तटस्थपणे पहा. ऐका .

कसलाच हट्ट धरू नका. ऐकलेल्या किंवा वाचलेल्या पार्श्वभूमीवर तुमच्या शरीरात उमटेल ते उमटू

द्या. न उमटले तरी आत परिणाम होत असेल. कसलीही चिंता बाळगू नका. 

फक्त दिलेली पथ्य पाळा . 

ध्यान हे मनाच्या अस्थिरतेत साधत नाही. अशा वेळी पुन्हा, पुन्हा आपल्या मनाची समजूत काढावी.

मनाशी बोलावे. स्वतःशी बोलणे, स्वतःशी नीट (समतेच्या) वागण्याचे आश्वासन देणे म्हणजे ध्यान

आहे.   शरीरातल्या ध्यानासाठी, संवाद साधण्यासाठी तुम्ही रोज उत्सुकतेने बसले पाहिजे. 

या कल्पनेचा नवा आनंद तुम्हाला खूप सुखावेल.  दुसऱ्या बाजूने तुम्ही (सांसारिक जीवनात असताना) ध्यानात

अतिशय गुंतून गेलात तर तो अतिरेक ठीक नव्हे. 

तुमच्या बुद्धीस पटवीत पटवीत शक्ती मिळविण्याची ही एक स्वावलंबी प्रक्रिया आहे. नीट घेतली तर धोक्याचा प्रश्न

उरत नाही. थोडेसे त्याग पथ्य, थोडेसे चिंतन पथ्य निश्चय पूर्वक केलेत तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुखाच्या

शिखरावर जाल. जगातील सुखे तुम्हीं जिंकाल पण ती सुखे तुम्हाला जिंकू शकणार नाहीत , 

अशी एक गोड अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. 

एक अनुभव घेऊन पाहा. 



विजय रा. जोशी