Showing posts with label श्लोक 146 ते 150 :. Show all posts
Showing posts with label श्लोक 146 ते 150 :. Show all posts

Thursday, July 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 146 ते 150 :  ध्वनिफीत.







सारांश - श्लोक १४६ - १५०. 


मनुष्य जीवनात जे  शोधायचे आहे ते  अनंत, शाश्वत तत्व आहे. 

मना ! त्याचा शोध घे. 

या मनुष्य जीवनाचा उपयोग करून जे सत्य आहे ते शोधून काढ. त्याची भेट घेण्यात खरं  तर जीवनाचे कल्याण

आहे.  आणि तेच करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण आपल्या देहापुरते संकुचित झाले

आहोत, मर्यादित झालो आहोत. आपली दृष्टी, भाव विकसित केला पाहिजे.  देहाचा त्याग नको, 

पण देह म्हणजे मी,  हि देहबुद्धी कमी होत गेली पाहिजे.

विश्वातील सर्व संबंध त्या एका सर्व-व्यापी महाकारणाच्या सत्तेखाली वावरतात. ते  कारण कशाचेही कार्य

असत नाही. ते सर्व कारणांचे कारण असून स्वयंभू असते. स्वयंभू म्हणजे ते स्वतःच स्वतःचे कारण असते.

स्वतः कशाचेही कारण नसलेल्या या आदिकारणासच  ईश्वर म्हणतात.

जे सर्व सगुण जे आहे ते निराकारातून आलेले आहे. जडाची निर्मिती अजड अशा ऊर्जेतून झाली आहे.

त्या निराकाराचा जाणण्यासाठी साधकाला  स्वरूपात विलीन व्हायला लागते. स्व हा शून्यरूप

करून तो महाशुन्यात विसर्जित करावा लागतो. किंवा तो अति-विशाल ब्रह्मव्यापी व्हावा लागतो. यालाच

मनोलय म्हणतात, अहंकार मुक्ती म्हणतात. कर्म शुद्धी म्हणतात. 

अध्यात्मात हा व्यक्तिगत अनुभव साधनेने सिद्ध , प्रगत  होत जातो. तो विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सिद्ध

करणे अजून तरी शक्य झालेले नाही. 

(पण अंतिम सत्या पर्येंत पोहोचावयाचे असेल तर विज्ञानाला आवश्यक

ते सर्व प्रयत्न करावेच लागतील, किंवा स्व-मर्यादा मान्य कराव्या लागतील).            श्रीराम !!


विजय रा. जोशी.