Showing posts with label # योग ग्रंथ. Show all posts
Showing posts with label # योग ग्रंथ. Show all posts

Sunday, September 22, 2024

  योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 6 .  Path 23  dt 14 August 2024 .



सारांश 

शरीरशास्त्र हे शरीराच्या अभ्यासाचे शास्त्र आहे. शरीरशास्त्र या दृष्टीने, लिंग विचार, कामग्रंथी विचार करावाच लागतो. पण शरीरात कामवासना आहे हे योगशास्त्राला मान्य आहे आणि शरीरशास्त्राला आहेच आहे. म्हणून आपण या सर्वाचा अनुकूल विचार कसा करता येईल ते पाहू. योगातील षडचक्रे गुदद्वाराच्या परिसरातच सुरु होतात आणि त्याचे दुसरे टोक मेंदूच्या भागातच जोडले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने कामविकाराचा संबंध गुदद्वाराच्या परिसरात सुरु होतो आणि त्याचे दुसरे टोक म्हणजे ज्या मेंदूत विकाराची निर्मिती होते तिथे आहे. योगशास्त्रात शरीरामध्ये ६ चक्रे आहेत तर शरीरशास्त्रामध्ये ६ विशेष स्थाने आहेत. (त्यात चार प्लेक्सस आहेत). 

शरीर शस्त्राच्या अभ्यासात मुळात काम विकाराची इच्छा का होते  (किंवा माणसाला कुठलीही इच्छा का होते) याचे कारण दिलेले दिसत नाही. अध्यात्म विचारवंतांची या बाबत स्पष्टता आहे. 

इंद्रिये आणि विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा (कामनेचा) हात धरून जी वृत्ती (इम्पल्स) वेगाने उठते, जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते, व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खुपसतात, ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते, व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे!  अर्जुना ती इच्छा असे समज, (गीता). 

जीवनाचा शेवटचा क्षण आला की आत्मा जीवनाची शिल्लक आठवू लागतो. सर्व जीवनाचा संकुल कार्य-परिणाम म्हणजे ही शेवटची आठवण असते. व त्या संकुल वासने प्रमाणे जीवाचा पुढील प्रवास ठरतो. अंतकालीचे स्मरण हे सर्व जीवनाची फलित होय. जीवनाचे अंतिम सार मधुर निघावे म्हणून जीवनभर प्रयत्न असावा. मरणाच्या वेळेस जो संस्कार उमटावा अशी इच्छा असेल त्याला अनुसरून सर्व जीवनाचा ओघ वळवा. तिकडे अहोरात्र कल असावा. या जन्माचा अंत ती पुढील जन्माची सुरुवात, म्हणून मरणाचे स्मरण सदैव राखून वागावे. असा अध्यात्माचा सल्ला आहे. 

हा सर्व समन्वय कसा साधावा हा योग्य ग्रंथांचा विषय आहे. 


विजय रा जोशी. 






 

Monday, September 9, 2024

  

योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 3.  दिनांक 0 4 July 2024. पाठ २०. 





सारांश :

आपल्याला नेहमी सत्य दिसते का ? सत्याचे ज्ञान आकलन होते का?

आकलन - संवेदनक्षमता, संवेदन, जाणीव. एखादी गोष्ट समजण्याची विशिष्ट तऱ्हा किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन. 

धारणा - ही आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल माहिती प्राप्त करण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये कोणती माहिती लक्षात घ्यायची, या माहितीचे वर्गीकरण कसे करायचे आणि विद्यमान ज्ञानाच्या चौकटीत त्याचा अर्थ कसा लावायचा हे ठरवणे समाविष्ट आहे.

What is an example of perception?

Perception: The Sensory Experience of the World . One person may perceive a dog jumping on them as a threat, while another person may perceive this action as the pup just being excited to see them. Our perceptions of people and things are shaped by our prior experiences our interests,  and how carefully we process information. 

प्रतिमा … अपेक्षाभंगाचे क्लेश .

आपल्या मनात आपल्या स्वतःच्या काही प्रतिमा आपण बनवतो, उपाधी, लेबल्स तयार होतात. तशी इतरांच्या मनात आपल्या प्रतिमा तयार होतात. मग त्या प्रमाणे एकमेकांकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि बऱ्याच वेळा या अपेक्षातून अपेक्षा भंगाचे क्लेश निर्माण होतात. या सर्व त्रासाचे मूळ  इतरांकडून आपण केलेल्या अपेक्षेत असते..म्हणून अपेक्षा रहित वागा, इतरांवर प्रेम करा  पण अपेक्षा ठेऊ नका, असे संत सांगतात. आपले कर्म करा आणि अलिप्त व्हा.   हाच कर्म योग आहे. 

आपण दृश्य शक्ती व द्रष्टृत्व  यांची गल्लत केली आहे. 

जेव्हा आपण म्हणतो की "माझ्या मनाला अमुक आवडते आणि तमुक आवडत नाही" किंवा " अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला आकलन होते किंवा होत नाही" तेव्हा, आपल्या बुद्धीच्या अथवा मनाच्या जाणण्याच्या मार्गातील अडथले समजू शकणारी कोणी एक  (मनबुद्धींहून वेगळी अशी) द्रष्ट शक्ती आहे. (साक्षी , आत्मा) 

मनाच्या प्रवृत्ती त्याचे दृष्टिकोन, त्याच्या आवडीनिवडींचे अग्रक्रम, त्याच्या पसंती, त्याचे पूर्वग्रह, सर्वांतून त्या मनाचा भूतकाळ व्यक्त होत असतो व त्याच्या वर्तमान क्षणावर तो प्रभाव पाडत असतो; आणि हे सर्व पहाणारी वेगळी कोणी एक द्रष्ट शक्ती तिथे कार्यरत असते .

तेव्हा आपण हे स्पष्ट जाणून घेऊ या की आपला देह, इंद्रिये, आपले प्राण व त्यांच हालचाली; मन आणि त्यातील विचार-भावना, इत्यादि रूपाने होणारी चित्तवृत्तींच खळबळ आणि मेंदूचे अथवा बुद्धीचे कामकाज हे सगळेच ह्या स्थूल, दृश्य, इंद्रियगम भौतिक जगाचे भाग आहेत, 

म्हणजेच ती 'दृश्य' शक्ती आहे, ती काही द्रष्ट शक्ती होऊ  शकत नाही. जेव्हा आपण म्हणतो की "माझ्या मनाला अमुक आवडत आणि तमुक आवडत नाही" किंवा " अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला आकलन होते / होत नाही" तेव्हा, आपल्या बुद्धीच्या अथवा मनाच्या जाणण्याच्या मार्गातील अडथळा समजू शकणारी कोणी एक (मनबुद्धींहून वेगळी अशी) द्रष्ट शक्ती आहे. (साक्षी , आत्मा) . 

योगसूत्रे आपल्याला अत्यंत धाडसीपणे, संवेदनाच्या एका नव्या चेतनेची, नव्या आयामाच सूचना करतात, शिफारस करतात :  "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" हीच ती सूचना आहे .चित्त वृत्ती शुध्द करां,  म्हणजेच स्मृतींचा चित्ता वरील प्रभाव दूर करा. चित्त शांत करा.ही ध्यानाची पूर्व सूचना आहे. योग दर्शनातील १ ल्या पादातील सूत्रे 

अथ योगानुशासनं १ ले सूत्र          योगश्चित्तवृत्तिनिरोधः, २ रे सूत्र.

“चित्त वृत्ती निरोध” झाल्यांनतर शुद्ध चित्त जेव्हा द्रष्टा रूपाने विश्व (दृश्य) पाहते, तेव्हा सत्याचे दर्शन घडते. सत्याची जाणीव होते. शुद्ध आकलन होते . 

पण आपले आकलन वृती ज्ञानाने होत असते. ते subjective असते. शुद्ध नसते. 

या जीवनात, या देहात अशी सोय आहे, उधार घेण्याची सोय आहे.आज सुख पाहिजे असेल तर आता घ्या आणि त्याचं जे दुःख नावाचं देणं आहे, ते नंतर फेडलं तरी चालेल. आम्ही कर्ज काढू न शकतो. म्हणून आपण सारे लोक देह धारण करुन सुख भोगत कर्जबाजारी होतो. हेही आपल्याला कळत नाही. पण हे कर्ज आपल्याला आज ना उद्या फेडावं लागणार आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण असे का वागतो ?' तर अज्ञानाने.  परिणामाबद्दलच्या अज्ञानामुळे आपण वागतो. त्यासाठी आपल्याला योग "यम -नियम " वर्तन सुचवितो. चित्त शुद्ध झाले कि आकलन शुद्ध होते. 

योग आणि व्यवहार याचा मेळ घालून वर्तन कसे करावे ते आपल्याला योग ग्रंथ सांगतात. 


विजय रा. जोशी