Monday, April 1, 2024

 

 योग ग्रंथ  :  पाठ 1.



वरील ओळीवर क्लिक करा , आपल्याला ध्वनीफीत ऐकू येईल. 




मागाल ते मिळेल , पण......


ज्ञानेश्वरी मधील पसायदान , सगळ्या जगाच्या सुखासाठी मागणी मागते,  तेथेही अट 

“सत्कर्मी रती वाढो” अशा सत्कर्म व्रताची आहे. 

“मनाच्या श्लोक” मधेही हे पथ्य चुकलेले नाही. सुख भोगण्यासाठी माणूस सतत उतावीळ असतो,

इच्छुक असतो. त्यासाठी आयुष्यभर जीवतोड प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात खर्च होणाऱ्या शक्तीपैकी

जरी निम्मी शक्ती त्याने सुख प्राप्तीचे नियम समजून घेण्यात खर्च केली तर त्याचे 

खरेखुरे कल्याण होईल. याबद्दल मार्गदर्शन मनाच्या श्लोकात आहे.  

इतरांच्या  कल्याणातच आपले खरे कल्याण आहे हे कळते पण वळत नाही .

आत्मचिंतनाच्या, आत्मपरीक्षणाच्या काही सुवर्ण-क्षणांना हे आपल्याला पटते पण दुर्दैवाने त्या क्षणांचे

ते ज्ञान क्षणभंगुर ठरते. 

याला उपाय म्हणजे सतत सत्संग, अभ्यास, त्यावर चिंतन आणि त्याप्रमाणे वर्तन …. सद्वर्तन. 

हे एकट्याने करतांना दुबळाई वाटते, आळस डोकावतो, हातून सहज होत नाही, म्हणून 

श्री रामदासांनी मनाच्या एकांत साधने बरोबरच समाज बांधणीचा सामुदायिक कार्यक्रम सांगितला.

त्यावेळी आवश्यकअसलेली राष्ट्र उभारणी केली.  

ते सर्व करण्याची  गरज आजही आहे, चिरंतन आहे. मागील पाठमालांमध्ये आपण हे विस्ताराने 

पाहिले.  स्वामीजी लिखित योग ग्रंथावरील हि नवीन पाठमाला सुरु होत आहे. 

आपला जीवनातील साधक म्हणून क्रमविकास आपापल्या ध्येया  प्रमाणे करण्यासाठी जी 

जीवनशैली साधकांना उपयुक्त आहे या विषयी मार्गदर्शन योग ग्रंथात मनशक्ती केंद्राचे संस्थापक

स्वामी विज्ञानानंद करतात   

शक्ती आणि शांती  याचा मेळ जीवनात आवश्यक असतो. त्यावर ध्यान हा उपाय आहे. 

शरीर आणि मनाचे संतुलन साधणारी "शरीराशी संवाद" हि ध्यान पद्धती देखील योग ग्रंथात 

आपल्याला शिकायला मिळते. 

हे सर्व विषय आपण क्रमाने या पाठमालेत अभ्यासण्याचा प्रयत्न करणार  आहोत, त्यावर चिंतन

 करणार आहोत. यापुढील काही पाठ यासंबंधी आवश्यक अशा प्राथमिक माहिती / तपशिलाचे

 होतील. त्यातील हा सुरवातीचा पाठ !


तत्सत ब्रह्मार्पण मस्तू I I   हरी ओम !!


विजय रा. जोशी. 




 

No comments:

Post a Comment