Monday, June 27, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 136 ते 140 :  ध्वनिफीत.




सारांश श्लोक  136 -140. 

ब्रह्माण्डातील जीवन भयाने ग्रासलं आहे. अस्तित्व-नाशाचे भय. जेथपर्येत ‘मी ’ आणि ‘तू’ अशी भूमिका आहे

तेथपर्येंत भय आहे, पण ‘मैं’ नही ‘तुही’ सही. अशी मनाची पक्की धारणा होते, तेव्हा हे भय नाहीसे होते.

अनेक संत सद्गुरू कितीतरी पद्धतीने हे सनातन सत्य आपल्या समोर मांडत आहेत. त्या त्या वेळेच्या

आवश्यकतेनुसार प्रबोधन करीत आहेत. संत हे सांगतात पण आपल्यला ते कळत नाही, कळले तरी वळत

नाही. देहबुद्धी सरत नाही, अहंकार सुटत नाही. 

आपण स्वतः, स्व -स्वरूपापासून दूर का जातो, याची कारण मीमांसा समर्थ करत आहेत. एकीकडे धोके

दाखवीत आहेत, एकीकडे सोपे उपाय सांगत आहेत. आपल्या जीवनाचे प्रयोजन (purpose) आपण विसरलेले

आहोत. बहिर्मुख वृत्ती आपला घात करत आहे, आपल्याला अंतर्मुख बनून आपल्या संकल्पाने अंतर्यामी शोध

घ्यायला सांगत आहेत. मायेचे भ्रम सोडून खऱ्या वास्तवाकडे जायला सांगत आहेत.  

माणसाची वृत्ती आणि त्रिगुण याचा संबंध जवळचा आहे. गुणातीत होणे म्हणजे मूळ रूपात जाणे हि साधना

अत्यंत प्रखर निश्चयाने आणि दीर्घ सातत्याने करणे हि दिशा आहे आणि या मानवी जन्मातच झाले तर ते

शक्य आहे. त्यासाठी ‘गुणावेगळी वृत्ति’ घडायला हवी. पण अज्ञानी माणसाकडून ते घडत नाही, हे वास्तव

सांगून समर्थ आपल्याला सावध करीत आहोत. “जुने ठेवणे मीपणे आकळेना”. या चरणांच्या श्लोकाच्या

माध्यमातून आत्मज्ञानाचे महत्व, प्राप्तीचे मार्ग आणि ते झाल्याने अंतरंगात होणारी क्रान्ति याबद्दल 

माहिती सांगितली आहे.  

हे सर्व जरूर ऐका , आणि योग्य वाटल्यास like आणि share करा. 


विजय रा जोशी 




No comments:

Post a Comment