Friday, June 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 131 ते 135 :  ध्वनिफीत.



सारांश श्लोक  131-135. 

संत संगतीमुळे, सत्संगतीमुळे  जे सर्वोत्कृष्ठ फळ आपल्याला मिळू शकेल, त्याचे वर्णन या  श्लोकांत आहे.

रामाच्या चारित्र्याच्या संदेश, आणि त्यातून विविध संकटे, आपत्तीत स्वतः श्रीरामाने निर्माण केलेले वर्तन

आदर्श यांचा अभ्यास , त्यावर चिंतन म्हणजेच “जानकीनायकाचा विवेकू” धारण करायला समर्थ सांगत

आहेत. आणि तो धारण करणे हे अवघड काम ज्याने साध्य होऊ शकेल तो उपाय म्हणजे “संत संगती,

सत्संगती” हाच आहे. असेही आपल्याला समजावत आहेत.  

संत म्हणजे कोण ? संतांचे १३ प्रमुख गुण :

हरिभक्त, विरक्ती, विज्ञानराशी (ज्ञानी),  निश्चयी, निगर्वी, वीतरागी (शाश्वत वैराग्य) , क्षमाशील, शांतीस्वरूप,

अभोगी, दयाघन, लोभ नाही, क्षोभ नाही, दैन्यवाणा नसलेला . 

आपण आत्मपरीक्षण करून आपल्यातील सद्गुण आणि दुर्गुण जर समजून घेतले तर कुठल्या क्षेत्रात आपली

प्रगती करणे आवश्यक आहे याचा बोध होईल आणि मग आपल्याला आपली सुधारणा करण्याचा उपाय दिसू

लागेल. त्यासाठी गुणी, बोध असलेल्या सज्जनांची संगती आपण केली पाहिजे. हा उपाय दोन्ही ठिकाणी

म्हणजे व्यवहार आणि अध्यात्मिक क्षेत्रात करण्यासारखा आहे. मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग

सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे

मार्गदर्शन केलेले आहे.  याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक

प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

स्वतःची आणि आपल्या पुढील पिढीची सर्वांगीण मानसिकता घडविण्यास मदत करू शकणारे , 

हे समर्थ विचार सर्वानी ऐकावे असे आहेत. 

कृपया ऐका , आवडल्यास like आणि share करा, ही विनंती. 


विजय रा. जोशी. 

 


No comments:

Post a Comment