Monday, June 13, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 126 ते 130 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक  १२६-१३०

अनेक रूपांनी प्रभू आपल्या भोवती घुटमळत असतात. पण आपण त्याला ओळखत नाही, हे आपले दुर्दैव आहे. विष्णूचे दशावतार हे तर पूर्ण अवतार आहेत पण प्रत्येक जीव हा देखील भगवन्ताचा अंश रूप आहे. 

श्लोक १२७ - १३५.  यात सत्संगतीचे महत्व आणि त्याने होणारे लाभ समर्थ आपल्याला समजवून सांगत आहेत.

तू मनाच्या, मनातील वासनांच्या अधीन न होता, मनापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न कर, आणि हे साध्य होण्यासाठी तुला एकच गोष्ट उपयुक्त आहे, ती म्हणजे, सत्कृत्य, संत संगती, सदाचाराचे पालन. आपला संकल्प बहुतेक वेळा नश्वर गोष्टींबद्दल असतो. तर चिरंतन शांती, सत्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा आणि त्या स्थितीत स्थिर रहाण्याचा संकल्प असावा. संत सांगत असतात कि रिकामा वेळ मिळाला तर नामस्मरण करावे, सारासार विवेकाच्या चिंतनात डुबून जावे, चांगल्या ग्रंथांचा, संत चरित्रांचा, थोर व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करावा.

मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

कृपया विवेचन ऐका , आवडल्यास like , share करा. 


विजय रा. जोशी. 




No comments:

Post a Comment