Sunday, March 7, 2021


गीता अध्याय ११, भाग १ , ध्वनी फीत .




“निसर्ग दयाळू नसतो, अन्यायी भासेल एवढा क्रूर असतो, हे समजून 
जगात राहावे. जर तुम्हाला भांडायचे असेल तर निसर्ग नियमा प्रमाणे भांडा, तो नियम समजून घ्या”... हा अकराव्या अध्यायाचा आशय आहे असे मी समजतो. (स्वामीजी,जीवन गीता).



११ वा अध्याय २ ऱ्या अध्यायाला पूरक आहे.

विश्व नियमा प्रमाणे “समता” हे एकदा ध्येय ठरले की, ती समता मोडणाऱ्याचे काय होईल ? याच्या बद्दल विचार करणारा हा ‘अकरावा’ अध्याय आहे.

हा अकरावा अध्याय दुसऱ्या अध्यायाचा पूरक असा आहे. समता हे एकदा ध्येय ठरले (एंट्रोपी - उष्णता गतिशास्त्र २ रा नियम) कि ती समता मोडणाऱ्याच काय होईल याचा विचार करणारा हा  अध्याय आहे. 


बारावा श्लोक आहे , जर आकाशात हजारो सूर्याची एकाच वेळी उत्पन्न झालेली कांती असेल तर मात्र ती कांती त्या महात्म्याच्या कांतीशी बरोबर होऊ शकेल. नुसती कांती, कृष्ण लांबच राहिला.कृष्णाच्या बाह्यांगाच्या पडछाया, म्हणजे हजारो सूर्याची कांती. 


मग सतराव्या श्लोकात तो म्हणतो : सर्व बाजूनी पहायला कठीण, प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे व अतिप्रखर सूर्याप्रमाणे तेजस्वी.. इतक्याच प्रमाणात आहे असा निश्चय न करता येण्यासारखा. म्हणजे अमुक इथे कृष्ण सुरु झाला आणि इथे संपला असा सांगता येणार नाही. एवढ्या अफाट दिव्यत्वाचं अनंत रूप त्या कृष्णाच्या ठिकाणी अर्जुनास दिसत आहे. एकोणिसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतोय की , हे आकाश आणि पृथ्वी यातील अंतर तू एकट्याने भरून काढलं आहेस, इतकेच नव्हे तर सर्व दिशाही व्याप्त केल्या आहेस. तुझे हे अद्भुत उग्र रूप बघून सर्व त्रैलोक्य भयाने गडबडून गेले आहे. थरथर कापत तो म्हणतो आहे , ‘माझे धैर्य आणि स्थिरता नाहीशी झाली आहे. चोविसाव्या श्लोकात शेवटी तो म्हणतो आहे की , मला सुखच वाटत नाहीसे झाले आहे. अठ्ठाविसाव्या श्लोकात त्यांनी म्हंटल आहे ‘पेटलेल्या तोंडात झरझर राजे, लढवय्ये शिरत आहेत. काळाच्या तोंडात लोक कसे शिरतात हे मी प्रत्यक्ष आज पहातो आहे. 


कोणाला वाटेल कृष्णाच्या रूपाबद्दल अर्जुनाच्या मनात भ्रम निर्माण झाला असेल, श्लोक ३२ मध्ये कृष्ण स्वतः सांगत आहेत :हे अर्जुना ! मी सर्व लोकांचा नाश  करण्यासाठी, अत्युग्र रूप म्हणजे काळ; जो अंतकाळाचा सुद्धा अंत करेल एवढा क्रूर आहे. पहिल्यांदा कृष्णाच्या कराल दाढेत सगळे कौरव शिरत होते आणि मागोमाग पांडवही शिरत होते. भांडणारे दोन्ही पक्ष शेवटी याच गतीला मिळतात. शत्रू, मित्र तुम्हाला जे काही मानायचं असेल ते माना. शेवटी दोघांना मरण येणारच आहे. बाहेर कदाचित दुर्जनांचा प्रथम विजय झालेला दिसेल पण आत कत्तल प्रथम दुर्जनाचीच होणार आहे. 

फार पुण्य नसत. थोडं जमा झालं तर लगेच त्याचा अहंकार होतो.  पापाच फळ तर शेवटी वाईट मिळणारच आहे, पण पुण्याचाही फळ पहिल्यन्दा परिक्षा घेतल्याशिवाय पदरात पडणार नाही. 

प्रत्येक अहंकाराची गर्जना हि आंतून आर्त  किंकाळी असते. 

खरा देव न्यायी असतो त्याचाकडे जाणे. त्याच दर्शन घेणं सोपं नसत. कारण देवाला समता पाहिजेआणि आम्हाला मात्र विषमता हवी. आम्हला अनुकूल विषमता पाहिजे. आम्ही मोठे आणि इतर छोटे. इतरांना कोणाला मोठं मानायला आपण सहसा तयार नसतो. अकराव्या अध्यायाचा हा अर्थ आहे आणि तो अर्थ जेव्हा पहाण्याची आपल्यास शक्ती येईल तेव्हा सर्व सोपं असेल. 

विस्वरूप दर्शनाचा कथाभाग या ध्वनिफितीमध्ये आपल्यासमोर उलगडत जाईल , शुभेच्छा !


विजय रा जोशी. 



गीता अध्याय ११, भाग १ , ध्वनी फीत .

No comments:

Post a Comment