Tuesday, March 16, 2021


गीता अध्याय ११, भाग 2 , ध्वनी फीत



गीता जीवनाचे रहस्य समजावून देते. 


पहिली गोष्ट भगवंत सांगतात  - तुझ्या शिवाय सर्व होणार आहे. ज्याला जीवनात, ज्ञानात वर जायचे असेल त्याने समजून घेतले पाहिजे. माझ्याशिवाय हे सर्व चालू रहाणार आहे. माणसाने लक्षात ठेवले पाहिजे , तो नव्हता तेव्हा हे जग अव्याहत सुरु होते, तो नसला तरी जगाचे काही अडणार नाही. जे नाटक करण्यासाठी आपल्याला पाठविले आहे ते नाटक व ती भूमिका आपण फक्त करत असतो. 



विराट,  विश्वरूप दर्शनाने अर्जुन वेगळ्याच मनस्थितीत जातो. 

तो म्हणतो: कधी न पाहिलेले रूप पाहून मला हर्ष झाला आहे व भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. हे जगन्निवासा देवाधिदेवा ! प्रसन्न व्हा. आणि आपले ते पूर्वीचे रूप दाखवा. किरीट व  गदा धारण करणारे , हातात चक्र घेतलेले, पूर्वीप्रमाणेच मी तुम्हाला पाहू इच्छितो. म्हणून हे सहस्रबाहो विश्वमूर्ते ! त्याच चतुर्भुज रूपात प्रकट व्हा. 

देवाला; चतुर्भुज रूप दाखविण्याची अर्जुनाची मागणी; आवडली नाही. पण त्याच्या वरील प्रेमाखातर पुन्हा देव चतुर्भुज झाला. सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रकट होतात ,  त्याप्रमाणे अर्जुनाला पुन्हा सर्व दृश्य पूर्ववत दिसू लागले. शेवटी देवाने अर्जुनास महत्वाचा उपदेश केला की , ‘गाय जरी डोंगरात चरावयाला गेली , तरी तिचे चित्त घरांतील तिच्या वासरावरच असते ; तसे तू विश्वरूपावरच आपले खरे प्रेम ठेऊन चतुर्भुज मर्यादित रुपावर वरवरचे बाह्यात्कारी प्रेम ठेव. 

भक्तीसाठी आवश्यक गोष्टी ,  भक्ती कशी करावी ? 

भगवन्ताला भजणारे लोक एकाच कक्षेतले आहेत असे समजू नये. वसिष्ठही फुले समर्पण करीत होते आणि शंकरराव हि फुले चढवतात.  एक गुणश्रेष्ठता समजून फुले चढवत असतो तर दुसरा श्रेष्ठता समजून फुले चढवत असतो. भगवंताची महानता व आपली सामान्यत कळते त्यातून इंद्रिये नमतात त्याला दीनता म्हणतात.  तूच महान आहेस,  तूच महान आहेस,, आम्ही तुझ्यापर्येत पोचू शकतनाही , आम्ही तुझ्या पायातल्या धूळींचेही लायक नाही, अशी भावना मनात झाल्यावर इंद्रिये नमतात पण मन नम्र होत नाही. ह्याला हिनता म्हणतात. तू महान आहेस हि तुझी शक्ती आहे व तू माझ्यासाठी सामान्य झाला आहेस हि तुझी कला आहे. शक्ती व माया ह्या दोहोंचेही ज्ञान ज्यावेळी मनाला होते त्यावेळी मन नमते, त्याला लीनता म्हणतात. तुला खरेतर काहीही नको असून सुद्धा माझ्याकडून तुला काही अपेक्षा आहे, इच्छा , वासना आहे असे तू नाटक करीत आहेस , हे ज्यावेळी बुद्धीला पटते, त्यावेळी बुद्धी नमते व तिला नम्रता म्हणतात. 

नमस्कार म्हणजे इंद्रिये, मन, बुद्धी ह्यांची नम्रता.

ज्या ठिकाणी इंद्रिये  मन  व बुद्धी हि सर्व पूर्ण  एक होऊन नम्र भाव निर्माण होतो.  म्हणून भगवंताचे :

१. सर्वज्ञत्व 

२. सर्वाश्रयत्व

३. सर्व व्यापकत्व 

४. सर्व सुखत्व 

ह्याचे भान, ज्ञान  रहायला हवे. ज्ञानपूर्वक भक्तीत थोडा कंटाळा येण्याची शक्यता आहे. पण ज्ञानोत्तर भक्तीत ‘तुष्यन्ति च रमनति च’ अशी स्थिती येते. तिलाच नम्रता म्हणतात. भगवंताला कुठल्याही रूपात स्वीकारायची मनाची पूर्ण तयारी म्हणजे  ज्ञानोत्तर भक्ती.  या बद्दल सविस्तर माहिती  ध्वनिफितीत ऐका . 

भक्ती वर्णन - १२  वा अध्याय 

अर्जुनास सगुण रूप हवे होते, त्यावर तो भाळला होता. देवांनी तर ते कमी योग्यतेचे ठरविले होते. म्हणून कोणते रूप श्रेष्ठ आहे ? असा प्रश्न देव रागावणार नाहीत अशा चातुर्याने तो देवापुढे मांडणार आहे. आणि त्यातूनच १२ वा अध्याय निर्माण होत आहे. 


विजय रा जोशी 




गीता अध्याय ११, भाग 2 , ध्वनी फीत


No comments:

Post a Comment