Wednesday, September 18, 2024

 GANESH CHATURTH, ४ सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी पाठ १/२)







आपण या पाठांत  भक्ती संकल्पना सर्व साधारणपणे, गणेश भक्ती विशेषपणे समजून घेण्यासाठी

काही अभ्यास आणि चिंतन करणार आहोत. त्यातून आपली गणेश पूजा अधिक अर्थपूर्ण 

आणि उपयुक्त घडेल अशी अशा आहे. 

सगुण भक्ती, श्री गणेशाची.

श्री गणेश - ईश्वराचे एक सगुण / साकार रूप (अवतार). 

भक्त (मी), 

ईश्वर/देव/गणेश -  गणेश देवता – उच्च गुणांचा आदर्श.

भक्ती संकल्पना . विभक्त नाही तो भक्त.,  देवाशी पूर्ण एकरूपता.

 देव गुणांचा अभ्यास,  उपासना म्हणजे काय ?

सुख कर्ता दु:ख हर्ता वार्ता विघ्नाची ।

ही आरती परिचयाची असली तरी तिचा जो आशय आहे, त्याकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. 

अथर्वशीर्षाच्या अनुषंगाने पाहिले तर 

त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । 

गणपती हा प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. तत्त्वमसिचे तो लक्ष्य आहे. या खऱ्या गणपतीचे जेव्हा ‘आत्मदर्शन’

होईल, तेव्हाच दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती हा विचार पूर्ण होईल. 


वरील काही भाग आणि त्यावरील अनुशांगिक चिंतन आपणास आवडेल अशी अशा आहे. 


विजय  रा. जोशी 







.



 GANESH BHAKTI, गणेश उपासना 11 सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी पाठ 2/2)











भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण कांहीच नव्हे । समाधान ॥ (दास. ४.९.६)
भावनांच्या कल्लोळाला विचारांच्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन तो कल्लोळ भगवंतामध्ये विलीन होणे
हे भक्तीचे स्वरूप आहे. जीवभाव त्या प्रवाहातून आत्मभावात विसर्जित व्हावा. 
भगवंतभाव व आत्मभाव एकच आहेत हे विचाराने निश्चित झालेले असावे.

भक्ती ह्या शब्दाचे उपासना, उपासक, उपास्य व यांचे ऐक्य असे चार घटक होतात. 
ह्यातील उपास्य   किंवा देव हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. 

ब्रह्म, ईश्वर, सगुण-अवतार व मूर्ती असे देवाचे चार स्तर समर्थ सांगतात. ह्यातील मूर्ती हा स्तर उपासकांसाठी उपास्य म्हणून उपलब्ध असतो. त्या मूर्तीच्या माध्यमातून उपासकाला ब्रह्मानुभवापर्यंत वाटचाल करावयाची असते. 
प्रत्येक उपासकाने ह्याचे सतत भान ठेवले पाहिजे. 

परमेश्वर इच्छेने जी स्थिती प्राप्त होते त्या (प्रत्येक) स्थितीत सुखी, उपकृत, संतुष्ट रहाणे. यास ईश्वर शरणागती म्हणतात. भक्ती हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाहीत. त्यांच्या मताने त्यांना झेपेल
व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून
मिळणारा आनंद दूर राहतो. निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादींचा अनुभव येत नाही.

‘मी कर्ता’ या भावाबरोबर दोन गोष्टी येतात: वासना आणि अभिमान. जितक्या प्रमाणात वासना व अभिमान कमी  होतो तितक्या प्रमाणात निस्सीम भक्तीला सुरवात होते. 

कर्ममय भक्ती  गीतेस मान्य असून आपल्यास प्राप्त झालेली कर्मे केलीच पाहिजेत पण ती स्वतःची 
म्हणून न करता परमेश्वराला स्मरून त्याने निर्मिलेल्या जगाच्या संग्रहार्थ त्याचीच हि कर्मे होत , 
अशा निर्मम बुद्धीने करावीत. म्हणजे कर्म-लोप न होता उलट त्या कर्मांनीच परमेश्वराची सेवा, 
भक्ती किंवा उपासना घडून त्याचे पाप-पुण्य आपणास न लागता अखेर पूर्ण सद्गतीही मिळते असे 
गीतेचे सांगणे आहे. 

भक्तीच्या पाण्याशिवाय मनाचे सूक्ष्म मल धुतले जात नाहीत. भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुले लागली पाहिजेत. 


सविस्तर विचार/चिंतन पाठात ऐकावे ही विनंती. 




विजय रा. जोशी. 



















Friday, September 13, 2024

 योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 4 .  Path 21  dt 31 July 2024 





सारांश :

अखिल मानव जातीचा विचार , उत्क्रांती सुटण्यासाठी की अडकण्यासाठी ?

अज्ञानामुळे जन्म-मरणाच्या बोगद्यात अजड (मन) कसे / का अडकले ?

आपण पाहातो, एखादं घराणं, राजघराणं, संस्कृती,  उंचावर चढली; मोठी झाली की ती परत - खाली आली, परत वर चढली, परत खाली आली, असं का झालं हे कळण्यासाठी, 'विश्वाचे  मूलभूत नियम (fundamental laws) जे आहेत, निसर्गाचे मूळ नियम, ते लक्षात घेतले पाहिजेत.

आपल्या आयुष्यात. त्यागाने पुष्कळ भोग निर्माण होतात असं करत करत आपण पुढे गेलो, तर एकदम निराळे आपल्याला प्रत्यय येतील. खाली-वर, असं होत जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये, मूळ प्रक्रिया ज्या आहेत, त्या समजून घेणे महत्वाचे असते. 

विकारयुक्त मन हे हे जिवाच्या पहिल्या अवस्थेपासून माणसाच्या तथाकथित प्रगत अवस्थेपर्येत प्रेरक म्हणून पुढे पुढे होत गेलेले आहे, ही गोष्ट निश्चित. त्यामुळे कामविकार हा सुद्धा मुळापासूनच मनात असल्याशिवाय  तो वळणे, वळणे घेत माणसाच्या सध्याच्या अवस्थेपर्येत आलेला नाही. 

ष‌ड्विकारामुळे पेशी दुःखी , सहा सुखविकारात पेशींना धक्के बसतात. गती नियमाप्रमाणे पेशींकडून प्रतिधक्के सुरु झाले की व्यक्तीमन त्याला रोग म्हणते.

उत्क्रांती प्रक्रियेत मनाची अधिकाधिक सुखाची इच्छा  ही  एकमेव स्वार्थ प्रक्रिया प्रेरणा , म्हणून शारीरिक उत्क्रांती ही मनाच्या प्रेरणेवर घडली असं तर्क सांगतो. 


विजय रा. जोशी. 




Monday, September 9, 2024

  

योग ग्रंथ अभ्यास : विषयोग - 3.  दिनांक 0 4 July 2024. पाठ २०. 





सारांश :

आपल्याला नेहमी सत्य दिसते का ? सत्याचे ज्ञान आकलन होते का?

आकलन - संवेदनक्षमता, संवेदन, जाणीव. एखादी गोष्ट समजण्याची विशिष्ट तऱ्हा किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन. 

धारणा - ही आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल माहिती प्राप्त करण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये कोणती माहिती लक्षात घ्यायची, या माहितीचे वर्गीकरण कसे करायचे आणि विद्यमान ज्ञानाच्या चौकटीत त्याचा अर्थ कसा लावायचा हे ठरवणे समाविष्ट आहे.

What is an example of perception?

Perception: The Sensory Experience of the World . One person may perceive a dog jumping on them as a threat, while another person may perceive this action as the pup just being excited to see them. Our perceptions of people and things are shaped by our prior experiences our interests,  and how carefully we process information. 

प्रतिमा … अपेक्षाभंगाचे क्लेश .

आपल्या मनात आपल्या स्वतःच्या काही प्रतिमा आपण बनवतो, उपाधी, लेबल्स तयार होतात. तशी इतरांच्या मनात आपल्या प्रतिमा तयार होतात. मग त्या प्रमाणे एकमेकांकडून अपेक्षा निर्माण होतात. आणि बऱ्याच वेळा या अपेक्षातून अपेक्षा भंगाचे क्लेश निर्माण होतात. या सर्व त्रासाचे मूळ  इतरांकडून आपण केलेल्या अपेक्षेत असते..म्हणून अपेक्षा रहित वागा, इतरांवर प्रेम करा  पण अपेक्षा ठेऊ नका, असे संत सांगतात. आपले कर्म करा आणि अलिप्त व्हा.   हाच कर्म योग आहे. 

आपण दृश्य शक्ती व द्रष्टृत्व  यांची गल्लत केली आहे. 

जेव्हा आपण म्हणतो की "माझ्या मनाला अमुक आवडते आणि तमुक आवडत नाही" किंवा " अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला आकलन होते किंवा होत नाही" तेव्हा, आपल्या बुद्धीच्या अथवा मनाच्या जाणण्याच्या मार्गातील अडथले समजू शकणारी कोणी एक  (मनबुद्धींहून वेगळी अशी) द्रष्ट शक्ती आहे. (साक्षी , आत्मा) 

मनाच्या प्रवृत्ती त्याचे दृष्टिकोन, त्याच्या आवडीनिवडींचे अग्रक्रम, त्याच्या पसंती, त्याचे पूर्वग्रह, सर्वांतून त्या मनाचा भूतकाळ व्यक्त होत असतो व त्याच्या वर्तमान क्षणावर तो प्रभाव पाडत असतो; आणि हे सर्व पहाणारी वेगळी कोणी एक द्रष्ट शक्ती तिथे कार्यरत असते .

तेव्हा आपण हे स्पष्ट जाणून घेऊ या की आपला देह, इंद्रिये, आपले प्राण व त्यांच हालचाली; मन आणि त्यातील विचार-भावना, इत्यादि रूपाने होणारी चित्तवृत्तींच खळबळ आणि मेंदूचे अथवा बुद्धीचे कामकाज हे सगळेच ह्या स्थूल, दृश्य, इंद्रियगम भौतिक जगाचे भाग आहेत, 

म्हणजेच ती 'दृश्य' शक्ती आहे, ती काही द्रष्ट शक्ती होऊ  शकत नाही. जेव्हा आपण म्हणतो की "माझ्या मनाला अमुक आवडत आणि तमुक आवडत नाही" किंवा " अमुक गोष्ट माझ्या बुद्धीला आकलन होते / होत नाही" तेव्हा, आपल्या बुद्धीच्या अथवा मनाच्या जाणण्याच्या मार्गातील अडथळा समजू शकणारी कोणी एक (मनबुद्धींहून वेगळी अशी) द्रष्ट शक्ती आहे. (साक्षी , आत्मा) . 

योगसूत्रे आपल्याला अत्यंत धाडसीपणे, संवेदनाच्या एका नव्या चेतनेची, नव्या आयामाच सूचना करतात, शिफारस करतात :  "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" हीच ती सूचना आहे .चित्त वृत्ती शुध्द करां,  म्हणजेच स्मृतींचा चित्ता वरील प्रभाव दूर करा. चित्त शांत करा.ही ध्यानाची पूर्व सूचना आहे. योग दर्शनातील १ ल्या पादातील सूत्रे 

अथ योगानुशासनं १ ले सूत्र          योगश्चित्तवृत्तिनिरोधः, २ रे सूत्र.

“चित्त वृत्ती निरोध” झाल्यांनतर शुद्ध चित्त जेव्हा द्रष्टा रूपाने विश्व (दृश्य) पाहते, तेव्हा सत्याचे दर्शन घडते. सत्याची जाणीव होते. शुद्ध आकलन होते . 

पण आपले आकलन वृती ज्ञानाने होत असते. ते subjective असते. शुद्ध नसते. 

या जीवनात, या देहात अशी सोय आहे, उधार घेण्याची सोय आहे.आज सुख पाहिजे असेल तर आता घ्या आणि त्याचं जे दुःख नावाचं देणं आहे, ते नंतर फेडलं तरी चालेल. आम्ही कर्ज काढू न शकतो. म्हणून आपण सारे लोक देह धारण करुन सुख भोगत कर्जबाजारी होतो. हेही आपल्याला कळत नाही. पण हे कर्ज आपल्याला आज ना उद्या फेडावं लागणार आहे. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण असे का वागतो ?' तर अज्ञानाने.  परिणामाबद्दलच्या अज्ञानामुळे आपण वागतो. त्यासाठी आपल्याला योग "यम -नियम " वर्तन सुचवितो. चित्त शुद्ध झाले कि आकलन शुद्ध होते. 

योग आणि व्यवहार याचा मेळ घालून वर्तन कसे करावे ते आपल्याला योग ग्रंथ सांगतात. 


विजय रा. जोशी