Wednesday, August 25, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक १ ते ५.  : ध्वनिफीत 




श्लोक १ - ५. सारांश 

शक्तिरूप शारदा आणि बुद्धीरूप गणेश यांच्या भक्तीच्या सहायाने परमात्म्याचा शोध घ्यावा असा उपदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला करीत आहेत. 

मनाला हळू हळू वळवायचे आहे, त्यास जी गोडी लावू तशी लागते. दिवसाची  सुरुवात मन्गलमय झाली की दिवस चांगला जायला मदत होते. याला दिवसभर सदाचाराची जोड द्यावी, दुराचार कमी करावा आणि मग या साधनेच्या वाटचालीत कधीतरी धन्यता आपल्या जीवनात येईल, निदान त्या दिशेने आपली प्रगती घडत राहील. 

रामदास स्वामी मनाला उपदेश करतात - वासना/ इच्छा चांगल्या आहेत, बुद्धी स्वतःसकट सर्वांना न्याय देणारी आहे, आपल्या कर्मात नीतीचा विचार झाला आहे हे सर्व काळजी पूर्वक आयुष्यभर पहा. म्हणजे संचित चांगले घडेल. आत्म विकास घडेल आणि मग प्रत्येक जन्मात उत्तरोत्तर प्रगती होत होत मोक्षाच्या मार्गावर प्रगती घडेल. 

देहबुद्धीपोटी स्वार्थ येतो. कळत नकळत कृती घडते , इतरांना त्रास होतो. पुण्यकर्म जाणीवपूर्वक करत राहिले पाहिजे. इतरांना त्रास देण्याची, पीडा देण्याची, इतरांविषयी बेफिकीर रहाण्याची वृत्ती / बुद्धी , हे टाळण्यासाठी सदैव जागृत रहायला हवे. देव आपल्या सर्व कृती पाहात असतो हि जाणीव, हे भान ठेवायचे म्हणजे मग सत्यसंकल्पात मन/ बुद्धी स्थिर राहील. उपासना आणि व्यवहार, प्रपंच आणि परमार्थ  याची सांगड घालणारे उपाय मनाचे श्लोक आपल्यासमोर मांडतात. 

या श्लोकांची मांडणी करणारे हे विवेचन ऐकून आपल्यास आवडले तर लिंक share करा आणि मनाच्या श्लोकांचा ज्ञान गुणाकार करा ही नम्र विनंती.. 


विजय रा. जोशी. 




No comments:

Post a Comment