Thursday, August 8, 2024

 योग ग्रंथ पाठ १७, अभ्यास दिशा, दि  १२ /६/ २०२४. 




सारांश. 


योग ग्रंथ : अनुबंध चतुष्ट्य 

1.     अधिकारी : ज्यांना आपली प्रापंचिक तसेच पारमार्थिक प्रगती करून साधनेचा क्रम विकास 

        साधत अंतिमतः मोक्ष प्राप्ती करायची इच्छा असलेले साधक.

         विष योग हा ग्रंथ फक्त विवाहित वाचकां करीता आहे. 

2.    विषय काय? :  साधकांचा भौतिक तसेच अध्यात्मिक क्रमविकास स्वावलंबी उपायांनी साधण्यासाठी 

         बुद्धी / श्रद्धा आधारित मार्गदर्शन.

3.     प्रयोजन काय ? : साधकत्वातील क्रमविकासाने व्यक्ती कल्याण साधणे  

         आणि अशा साधकांच्या  एकत्रित प्रयत्नांमुळे समष्टी कल्याण साधणे. 

४. संबंध काय ?  प्रयोजन साध्य होण्यासाठी अधिकारी साधकांनी काय साधना करावी  याचे सर्वांगीण मार्गदर्शन

 योग ग्रंथात स्वामीजींनी केले आहे. 

आपण बुद्धियोग आणि श्रद्धा  योग्  यांचा अभ्यास सविस्तर करणार आहोत. 

विषयोंग आणि भाग्य योग यांच्यातील महत्वाच्या भागाचा अभ्यास / चिंतन करणार आहोत. 

माझी भूमिका एक अभ्यासक आणि केलेल्या अभ्यासाचा ज्ञान गुणाकार एवढीच आहे, 

तज्ज्ञाची नाही , हे सुरवातीपासून स्पष्ट केले आहे, 

विषयोग -- दृष्टिकोन विधायक आहे. काम शक्तीचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्यातील धोके टाळले

पाहिजेत. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

भाग्य योग -- माणसाचा काळ आणि स्वभाव यावरुन भविष्य सांगता येते.. योगाने हे भविष्य सुधारता येईल. 

भारतीय प्राचीन विचारवंतांनी अनेक सुंदर समन्वय केले. सुखी आयुष्य, पराक्रमी आयुष्य, वैभवशाली आयुष्य

मिळविण्यासाठी त्यांनी चेतावणी दिली. परंतु . तेच आयुष्य त्याग आणि शांती यांच्या, समतोलाने शापमुक्त

राखण्याची योजनाही केली आहे. 

बुद्धी योग -- तुमच्या सुखाचे 'कारण', तुम्ही, बुद्धी आहे, असे मानता. बुद्धी हीच युक्ती तुमच्या सुखासाठी तुम्ही

 वापरता. बुद्धीनेच तुमची समाधान स्थिती निर्माण होते. या सगळ्या प्रक्रियेचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. 

सबंध ग्रंथात, शक्य तेवढ्या विस्ताराने जे ज्ञान दिले आहे. 

श्रद्धा योग. -- तुमचे कारण तुम्हीच.    निष्कर्ष सरळ आहेत -

१) सुखासाठी तळमळणारे मन तुम्हीच निर्माण केले आहे.

२) ती तळमळ कधीही पुरी होणार नाही, हे लक्षात आणून ती हळूहळू कमी करत नेणे हे तुमचे काम आहे

३) ती कमी होत होत शून्यावर आली, सम अवस्थेवर आली तरीही प्रचंड सुख आहे, असा ज्ञात्यांचा 

   अनुभव आहे.

 पैकी दुसऱ्या व तिसऱ्या प्रक्रियेत योगाभ्यासाचा विशेष संबंध येतो.त्यातून उत्पन्न होणारी मोक्षस्थिती मिळाल्यावर

 सुख मिळेल यावर श्रद्धा बसली म्हणजे  हा योग सहजतेने जमेल. सारांश,  मोक्ष अनुभव घेतला पाहिजे. 


विजय रा. जोशी 













No comments:

Post a Comment